नवी दिल्ली : करांमध्ये वाढ करण्याचे संकेत सरकारने दिल्यामुळे आगामी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर फास्टफूड आणि साखरेचा अंतर्भाव असणारी शीतपेये महागण्याची शक्यता आहे. जीवनशैलीशी संबंधित विकारांची लागण होण्यासाठी फास्टफूड आणि शीतपेये कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार या पदार्थांवरील करांमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
बँकांमध्ये गुंतवणूक
नवी दिल्ली : सरकारी बँकांची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे चालू आठवड्यात बँकांमध्ये २५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. या भांडवली गुंतवणुकीमुळे बँकांकडे पुरेसा निधी येऊन कर्जे देण्याचे प्रमाण वाढेल, असा सरकारचा अंदाज आहे. यापूर्वी केंद्र सरकारने तेरा सार्वजनिक बँकांमध्ये २२ हजार ९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.