मुंबई : गुंतवणूकदारांनी खरेदीचा उत्साह कायम ठेवल्याने बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजीची दौड कायम आहे. बाजार उघडताच सकारात्मक सुरुवात करणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७० अंकांनी वधारला असून त्याने ४१ हजार ५०० अंकांचा निर्णायक टप्पा पार केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० अंकाच्या वाढीसह १२ हजार २०० अंकावर आहे.
बाजारात ऑटो, मेटल,टेक, फायनान्स या क्षेत्रात खरेदी सुरु आहे.पिरामल एन्टरप्राइज, मारुती सुझुकी, एनबीसीसी, आयआरबी इन्फ्रा, आरकॉम, डीएचएफएल, येस बँक या शेअरमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले. एमएमटीसी, जिंदाल स्टील, एचडीएफसी बँक, विप्रो या शेअरमध्ये वाढ झाली.
ई-कॉमर्स धोरण लवकरच
जीएसटी कौन्सिलची ३८ वी बैठक अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी दिल्लीत होणार आहे. या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी गोव्यात २० सप्टेंबर रोजी पार पडलेलया जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी कर सवलत आणि करदात्यांसाठी आधार बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू वर्षात दुसऱ्या तिमाहीत विकासदर ४.५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. औद्योगिक उत्पादनात घसरण झाली आहे.
रिलायन्सने २५ हजार कोटींना विकला जिओचे टॉवर
चालू वर्ष संपत असताना सरकारी बँकांकडून विक्रमी कर्जवसुली केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्जे थकवणाऱ्या चार कंपन्यांची थकबाकी दिवाळखोरीविरोधी कायद्याच्या माध्यमातून वसूल होण्याची औपचारिकताच बाकी आहे. कर्जवसुलीची ही रक्कम सुमारे ५४ हजार कोटी रुपये असल्याने चालू तिमाहीअखेरीस सरकारी बँकांच्या एनपीएमध्ये (अनुत्पादित मालमत्ता) कमालीची घट होणार आहे. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
बाजारात ऑटो, मेटल,टेक, फायनान्स या क्षेत्रात खरेदी सुरु आहे.पिरामल एन्टरप्राइज, मारुती सुझुकी, एनबीसीसी, आयआरबी इन्फ्रा, आरकॉम, डीएचएफएल, येस बँक या शेअरमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले. एमएमटीसी, जिंदाल स्टील, एचडीएफसी बँक, विप्रो या शेअरमध्ये वाढ झाली.
ई-कॉमर्स धोरण लवकरच
जीएसटी कौन्सिलची ३८ वी बैठक अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी दिल्लीत होणार आहे. या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी गोव्यात २० सप्टेंबर रोजी पार पडलेलया जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटी कर सवलत आणि करदात्यांसाठी आधार बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू वर्षात दुसऱ्या तिमाहीत विकासदर ४.५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. औद्योगिक उत्पादनात घसरण झाली आहे.
रिलायन्सने २५ हजार कोटींना विकला जिओचे टॉवर
चालू वर्ष संपत असताना सरकारी बँकांकडून विक्रमी कर्जवसुली केली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्जे थकवणाऱ्या चार कंपन्यांची थकबाकी दिवाळखोरीविरोधी कायद्याच्या माध्यमातून वसूल होण्याची औपचारिकताच बाकी आहे. कर्जवसुलीची ही रक्कम सुमारे ५४ हजार कोटी रुपये असल्याने चालू तिमाहीअखेरीस सरकारी बँकांच्या एनपीएमध्ये (अनुत्पादित मालमत्ता) कमालीची घट होणार आहे. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले.