मुंबई : उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात भारत झपाट्याने उदयास येत आहे. कोरोनाच्या काळानंतर जिथे जगभरातील बाजारात खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सातत्याने पुढे जात आहे. याचाच परिणाम म्हणजे सर्व जागतिक दिग्गजांच्या नजरेत भारत गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ बनत आहे. अनेक मोठ्या कंपन्या इतर देशांतून आपला व्यवसाय काढून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तयारीत आता यामध्ये टेक जायंट अॅपलचे देखील नाव देखील समाविष्ट होण्याच्या आहे. अॅपल आपले उत्पादन चीनमधून दुसऱ्या देशात हस्तांतरित करण्याचा विचार करत आहे आणि ते भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहे.
सोने-चांदी तेजीत; सोन्याने ओलांडला हा महत्वाचा टप्पा, जाणून घ्या नवा दर
भारताला पहिली पसंती
अॅपलने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. अॅपल भारत आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार आणि अभ्यास करत असल्याचे कळले आहे. अॅपलच्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. अंदाजानुसार आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक कॉम्प्युटर यांसारखी 90 टक्के अॅपल उत्पादने चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की त्यांची पुरवठा साखळी खरोखरच जागतिक आहे आणि त्यामुळे उत्पादने सर्वत्र तयार केली जातात. इतर देशांतील शक्यता आपण सतत पाहत असतो असेही ते म्हणाले.
वाचा - KYC Based Feature: फेक कॉल करणाऱ्यांची खैर नाही, फोनवर दिसणार खरी ओळख, TRAI आणत आहे नवे
कारण काय आहे?
तज्ज्ञांच्या मतानुसार अलीकडच्या काळात अॅपलचे वरिष्ठ अधिकारी या विषयावर सातत्याने चर्चा करत आहेत. तज्ज्ञ बीजिंगची दडपशाही आणि अमेरिकेसोबतचा वाढता वाद हे चीनमधून आपला व्यवसाय काढून घेण्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षकांच्या मते, अॅपलचे चीनवरील अवलंबित्व मोठ्या जोखमीने भरलेले आहे. अॅपलच्या उत्पादन योजनांशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, मोठी लोकसंख्या आणि कमी किमतीमुळे कंपनी भारताकडे पुढील चीन म्हणून पाहू शकते.
इंधन झालंय स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
२०२० च्या सुरुवातीला कोविड महामारीचा जगभरात प्रसार होण्याआधीच अॅपल चीनपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करत होते, परंतु महामारीने त्यांचे नियोजन थांबवले. तथापि अॅपल पुन्हा दबाव आणत आहे आणि नवीन उत्पादन क्षमता शोधण्यासाठी कंत्राटदारांना सूचना देत आहे. तसेच २०२१ मध्ये वीज कपातीमुळे चीनचे अवलंबित्व आणखीनच वाढले. कोविड महामारीमुळे चीनने येथे अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे, अॅपलने गेल्या दोन वर्षांत केवळ काही अधिकारी आणि अभियंते चीनला पाठवले आहेत, ज्यामुळे उत्पादन स्थानांची वैयक्तिकरित्या तपासणी करणे कठीण झाले आहे.
सोने-चांदी तेजीत; सोन्याने ओलांडला हा महत्वाचा टप्पा, जाणून घ्या नवा दर
भारताला पहिली पसंती
अॅपलने त्यांच्या अनेक कंत्राटी उत्पादकांना चीनबाहेर उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. अॅपल भारत आणि व्हिएतनाममध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यतांचा विचार आणि अभ्यास करत असल्याचे कळले आहे. अॅपलच्या जागतिक उत्पादनात सध्या भारत आणि व्हिएतनामचा वाटा फारच कमी आहे. अंदाजानुसार आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक कॉम्प्युटर यांसारखी 90 टक्के अॅपल उत्पादने चीनमध्ये स्वतंत्र उत्पादक तयार करतात.
वाचा - KYC Based Feature: फेक कॉल करणाऱ्यांची खैर नाही, फोनवर दिसणार खरी ओळख, TRAI आणत आहे नवे
कारण काय आहे?
तज्ज्ञांच्या मतानुसार अलीकडच्या काळात अॅपलचे वरिष्ठ अधिकारी या विषयावर सातत्याने चर्चा करत आहेत. तज्ज्ञ बीजिंगची दडपशाही आणि अमेरिकेसोबतचा वाढता वाद हे चीनमधून आपला व्यवसाय काढून घेण्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षकांच्या मते, अॅपलचे चीनवरील अवलंबित्व मोठ्या जोखमीने भरलेले आहे. अॅपलच्या उत्पादन योजनांशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, मोठी लोकसंख्या आणि कमी किमतीमुळे कंपनी भारताकडे पुढील चीन म्हणून पाहू शकते.
इंधन झालंय स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
२०२० च्या सुरुवातीला कोविड महामारीचा जगभरात प्रसार होण्याआधीच अॅपल चीनपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करत होते, परंतु महामारीने त्यांचे नियोजन थांबवले. तथापि अॅपल पुन्हा दबाव आणत आहे आणि नवीन उत्पादन क्षमता शोधण्यासाठी कंत्राटदारांना सूचना देत आहे. तसेच २०२१ मध्ये वीज कपातीमुळे चीनचे अवलंबित्व आणखीनच वाढले. कोविड महामारीमुळे चीनने येथे अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे, अॅपलने गेल्या दोन वर्षांत केवळ काही अधिकारी आणि अभियंते चीनला पाठवले आहेत, ज्यामुळे उत्पादन स्थानांची वैयक्तिकरित्या तपासणी करणे कठीण झाले आहे.