म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
पदवी अंतिम वर्षाची किंवा सत्राची परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी, अशा सुधारित मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला पुन्हा धक्का बसला आहे. यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने २९ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारने पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय किंवा परीक्षा देऊन पदवी देण्याबाबचा निर्णय घेतला. यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निर्णय अद्याप झाला नव्हता. याबाबत संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांची मान्यता घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार होता.
दरम्यान, देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुलैमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का? याबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना आयोगाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या.
डीयू ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी
UGC च्या या सूचना पुढीलप्रमाणे -
- विद्यापीठांना सप्टेंबमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षा विद्यापीठांनी ऑफलाइन, ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतींचा अवलंब करून घ्याव्यात अशी सूचना आयोगाने केली आहे.
- प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात जागतिक पातळीवर टीकाव धरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या संपूर्ण कौशल्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे, असे समितीने यात स्पष्ट केले आहे.
- या नवीन मार्गदर्शक सूचना आल्या तरी २९ एप्रिलच्या सूचना कायम राहतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या सध्याच्या निर्णयाला धक्का बसला आहे.
दहावी, बारावीसाठी शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
एटीकेटीचीही संधी द्या
ज्या विद्यार्थ्यांना आधीच्या वर्षांत एटीकेटी आहेत, अशांना एटीकेटी सोडविण्यासाठी त्या परीक्षांचेही आयोजन करावे असे आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील लाखो एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पदवी अंतिम वर्षाची किंवा सत्राची परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी, अशा सुधारित मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला पुन्हा धक्का बसला आहे. यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने २९ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राज्य सरकारने पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय किंवा परीक्षा देऊन पदवी देण्याबाबचा निर्णय घेतला. यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निर्णय अद्याप झाला नव्हता. याबाबत संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांची मान्यता घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार होता.
दरम्यान, देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुलैमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का? याबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचना आयोगाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या.
डीयू ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी
UGC च्या या सूचना पुढीलप्रमाणे -
- विद्यापीठांना सप्टेंबमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षा विद्यापीठांनी ऑफलाइन, ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतींचा अवलंब करून घ्याव्यात अशी सूचना आयोगाने केली आहे.
- प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात जागतिक पातळीवर टीकाव धरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या संपूर्ण कौशल्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे, असे समितीने यात स्पष्ट केले आहे.
- या नवीन मार्गदर्शक सूचना आल्या तरी २९ एप्रिलच्या सूचना कायम राहतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या सध्याच्या निर्णयाला धक्का बसला आहे.
दहावी, बारावीसाठी शासनाच्या तीन शैक्षणिक वाहिन्या
एटीकेटीचीही संधी द्या
ज्या विद्यार्थ्यांना आधीच्या वर्षांत एटीकेटी आहेत, अशांना एटीकेटी सोडविण्यासाठी त्या परीक्षांचेही आयोजन करावे असे आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील लाखो एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.