हमीद दलवाई आणि मेहरून्निसा दलवाई यांचे सहजीवन हे आंदोलन, चळवळी आणि संघर्षाने भरलेले होते. मेहरून्निसा यांनी ‘मी भरून पावले आहे’ या स्मृतिग्रंथात त्याविषयी सविस्तर लिहिले आहे. ‘साधना’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणामधील हा अंश...
नोकरी सोडल्यानंतर फुलटाइम चळवळीचं काम सुरू झालं. तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांची परिषद पुण्यामध्ये झाली, ७३ मध्ये. त्यात मी होते. त्यांच्या जवळजवळ सगळ्या प्रोग्राम्समध्ये मी होते. पहिली मीटिंग बांद्र्याला झाली. विषयाची माहिती नाही. कसं बोलतात, माहिती नाही. महंमद दलवाई म्हणजे ह्यांच्या आतेभावाचा मुलगा, पहिल्या मीटिंगमध्ये ते मला घेऊन गेले बांद्र्याला. त्या मीटिंगमध्ये हे बोलले. लोक म्हणायला लागले, ‘‘काय छान बोलतो रे! काय हा माणूस चांगलं बोलतो रे!’’ आम्ही मागं बसलेले असल्यामुळे महंमददा म्हणाले, ‘‘बघा, काकी बघा- काय लोक हमीदबद्दल बोलतात!’’ त्यांना पण खूप कौतुक वाटायचं. त्या मीटिंगनंतर दलवाईंनी मला विचारलं, ‘‘मेहरू, कशी झाली ग मीटिंग?’’ म्हटलं, ‘‘खूप चांगली झाली. लोक असं-असं म्हणत होते. पण मला एक अक्षरही कळलं नाही, तुम्ही काय बोलता त्यातलं. कशाबद्दल बोलला, काही कळलं नाही. तुम्ही बोलत होता खूप चांगलं. लोक तुमची तारीफ करत होते. त्यावरून तुम्ही चांगलंच बोलत असाल, असं मला वाटलं.’’ मग आम्ही रस्त्यानं गेल्यानंतर लोक म्हणायचे, ‘‘बघ-बघ, हमीद दलवाई चाललेत. काय छान बोलतात.’’ हे म्हणायचे, ‘‘बघ तुझ्या नवऱ्याची कशी तारीफ करताहेत, ऐक तू. तुला काहीच वाटत नाही?’’ असं ते चेष्टा-बिष्टा करत विचारायचे.
त्यांचा विषय असे मुस्लिम समाज. मुसलमानांचे राजकारण-समाजकारण काय आहे? त्यांचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे? ते म्हणत, ज्या माणसाला भूगोल समजत नाही, त्याला इतिहासही कळणार नाही. मुसलमानांची चूक इथंच आहे की, त्यांना भूगोल कळलेला नाही. त्यांनी त्याच काळामध्ये पुस्तक पण लिहिलं. अजून ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही.
‘इंधन’ कादंबरी छापली गेली. महाराष्ट्र सरकारचं पहिलं बक्षीस तिला मिळालं. त्यानंतर गाववाल्यांनी यांना वाळीत टाकलं आणि तिथं गोंधळ घातला. कुळवाडी लोकांना भडकवलं तिकडे- तुमच्याबद्दल हमीदखाननी असं-असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तिथे वाद झाला. दंगल झाली. आमच्या घरावर दोन महिने बहिष्कार टाकला. आमच्या बाबांची दाढी करायला न्हावी येत नसे. डोंगरावर घर होतं. आमच्या बायका खालून पाणी वर न्यायच्या, तर त्यांना गडी मिळत नसे. बायकांचे आमच्या हालच झाले. खूप त्रास झाला. इथे आमच्या घरावर दगडफेक झाली. निनावी पत्रं आली. म्हणजे मारण्याच्या धमक्या आल्या.
पहिला ‘लाट’ कथासंग्रह निघाला. रुबिनाच्या वेळेला, ५८-५९ मध्ये. ‘इंधन’ ६६ला निघाली. इलाच्या वेळेला. तर तेव्हा मी पुण्याला येणार होते डिलिव्हरीला, ती आलेच नाही. मुंबईत राहिले. घरावर दगडफेक झाली. मारण्याच्या धमक्यांची निनावी पत्रं मला आली. त्याच्यात माझी डिलिव्हरी झाली. गावातील परिस्थिती खूप खराब झाली. मग काय करायचं? मग इथल्या २०० पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन इथून गेले तिकडे. तिथं मग काही लोकांनी मिळून त्यांचा मोठा सत्कार केला नि तो वाद मिटला मिरजोळीला.
वर्ष आठवत नाही, पण ‘मुस्लिम पर्सनल लॉ’वर दुसरा मोर्चा झाला. ऑल इंडिया लेव्हलवर. मुंबईच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये गुप्त मीटिंग घेतलेली होती मुस्लिमांची. तिथं फोटोग्राफर्स, रिपोटर्स अलाऊड नव्हते. मुसलमानांनी घेतलेली मीटिंग हो; त्यामध्ये दलवाईंना बंदी. त्यामुळं आमची माणसं गुप्तपणे आत शिरू शकली नाहीत. काही ठिकाणी मीटिंगमध्ये आमची माणसं अशी गुप्तपणे जाऊन रिपोर्ट आणत असत. त्या वेळी हे झालं नाही. त्या मीटिंगला प्रोटेस्ट म्हणून आम्ही मोर्चा काढला.... बॉम्बे सेंट्रलला एस.टी.च्या डेपोच्या बाहेर सगळ्यांनी जमा व्हायचं.... युवादलाची काही मुलं होती. राष्ट्र सेवा दलाची काही आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची काही होती. तर याच्यामध्ये २५ जण होतो. त्याच्यात आम्ही दोन-तीनच बायका होतो. मी आणि अॅडव्होकेट नजमा होती. एक-दोन आणखी बायका होत्या. तर आम्ही तिथं जमा झालो दुपारपर्यंत. मोर्चाला ये, असं यांनी मला सांगितलं नाही. मोर्चा आहे, असं मला माहिती होतं. आमच्याकडे सगळे जमा झाले, जेवणं झाली. सगळे निघाले तेव्हा हे मला म्हणाले, ‘‘असा असा मोर्चा आहे. तुला यायचं असेल तर ये. तुला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागेल.’’ मी म्हटलं, ‘‘मी येणारच.’’ ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि मी तिथं मोर्चाला गेले. पहिल्या मोर्चाचा अनुभव होता ना! चुपचाप गेलो-आलो, काहीच झालं नाही ही कल्पना घेऊन या मोर्चात गेले. तिथं गेल्यानंतर आमचे लोक उभे सगळे लायनीत. हातात फलक घेऊन. तिथं, त्या एरियात मुसलमानांची २००० घरं आहेत. आणि जागोजागी चार-पाच माणसं जमा झालेली मला दिसली. असे गट जमा झालेले. ते बघून मी थोडी घाबरले. अब्दुल कादिर मुकादम नावाचे आमचे एक कार्यकर्ते होते. ते आधी बी.ई.एस.टी.मध्ये होते. त्यांना मी म्हटलं, ‘‘मुकादम, हे लोक का हो जमा झाले आहेत?’’ ते म्हणाले, ‘‘भाभी, तुम्ही लक्ष नका देऊ त्याकडे.’’ यांनी मुकादमला सांगितले होतं का- तू भाभीला सांभाळ, तिला कसलीच कल्पना नाहीये. आणि ते पुढे आले. मी म्हटलं, ‘‘बोलता-बोलता इथे गडबड झाली मुकादम, तर जायला जागा कुठली? आपण कुठल्याही घरात शिरलो, तरी मुसलमानांच्याच घरात शिरणार. तो तर आपल्याला ठेवणार नाही. मग आपण काय करायचं अशा प्रसंगात?’’ तर त्यांनी सांगितलं, ‘‘पुढे बेस्टचा डेपो आहे. तिथं आमचा चौकीदार बसलेला आहे. त्याला मी सांगितलं आहे आमचं कोणी आलं तर त्याला प्रोटेक्शन द्यायचं. तुम्ही काही घाबरू नका.’’
आता मोर्चा सुरू झाला. आजूबाजूने २०० पोलिसांचा पहारा उभा आणि समोर २०००चा मॉब उभा. मॉब आम्हाला मारण्यासाठी, लोकांची गर्दी मोर्चावर हल्ला करायचा नि तुटून पडायचं म्हणून. तशात आमच्याजवळ थोडी माणसं आली. जेव्हा आम्ही स्लोगन्स द्यायला सुरुवात केली, तेव्हा येऊन अंगावर तुटून पडायला लागली. तेव्हा पोलिसांनी खूप प्रोटेक्शन दिलं. म्हणजे बेस्टचा डेपो येईपर्यंत पोलीस त्यांना बाजूला-बाजूला करत गेले. आणि मॉब जमा झाला खूप. पोलिसांच्या आटोक्यात राहिला नाही. सगळे इकडे-तिकडे झाले. नजमा शेख जी होती, ती ४-५ महिन्यांची प्रेग्नंट होती. तिनं माझा हात घट्ट धरलेला होता. गंमत अशी की- दलवाई असे चाललेले होते... आणि ते समोरचे जे लोक होते, त्यांना हे माहिती नाही की हमीद कोण! हे पुढे चालले सिगरेट फुंकत. त्यांच्या चेहऱ्ययावर जरासुद्धा भीती नाही. त्यांचा तो चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. पोलीस मागे ओढतील, तर हे पुढे. पोलिसांना मागं सारून हा मनुष्य बेफिकीरपणे पुढेच चाललेला आहे. पोलिसांना जड जात होतं त्यांना थोपवणं. पण त्यांनी खूप चांगलं प्रोटेक्शन दिलं.
हे लोक जेव्हा आमच्यावर तुटून पडले, तेव्हा मी व नजमा धावून बेस्टच्या डेपोमध्ये गेलो. त्यानंतर इथं बाहेर काठ्या, लाठ्या, तलवारी, सोडावॉटरच्या बाटल्या अन् काय काय... असा धुमाकूळ घातला. आम्हाला वाटलं, आमच्या सगळ्या लोकांच्या कत्तली झाल्या! आम्ही आत लपून बसलो दोन तास. इथं लढाई चालू होती. तिथं काय झालं? असं म्हणतात का, तिथं पोलिसांची व्हॅन झाली. त्यांनी आमच्या सगळ्या लोकांना भराभर आत बसवलं. व्हॅन बंद असते. व्हॅन बंद केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, मी व नजमा दिसत नाही. हे म्हणाले, ‘‘बाबा रे, या दोघी बाहेर राहिलेल्या. मी काही जात नाही. मला खाली उतरू द्या, मला त्यांना शोधायला पाहिजे.’’ सगळे म्हणाले, ‘‘तुम्हाला तर मारायला लोकं जमा झाली आहेत खाली.’’ अब्दुल कादिर मुकादम म्हणाले, ‘‘भाभींनी असं-असं विचारलं होतं. भाभी नक्कीच डेपोमध्ये गेल्या असतील...’’ आणि मग ते उतरले. पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये आत आले. मग पायधुनीला मोर्चा नेण्यात आला. आम्हाला मागच्या दाराने प्रायव्हेट गाडीतून पायधुनीला नेण्यात आलं. मधुभाई पंडित वगैरेंना किरकोळ मार लागला होता. मग तिथं विचारपूस झाली. रात्री १२ ला आम्हाला घरी आणून सोडलं.
नंतर २-३ महिने आमच्या घरावर पोलिसांचा पहारा असायचा. आणि मला अशी दहशत बसलेली होती की, बास. पहिला मोर्चा आणि दुसरा मोर्चा एकदम विरुद्ध. इतकी दहशत बसली की- बाहेर जाताना भीती वाटायची की कोणी आपल्याला मारेल का? आणि मग यांच्या कामाचं स्वरूप माझ्या लक्षात आलं. हे जे करतात, ते अशा टाइपचे कामच. बोहरी लोकांच्या, त्यांच्या धर्मगुरू सय्यदनांच्या विरोधात जो व्हीटीला मोर्चा काढण्यात आला होता, त्यात दलवाईंनी पुढाकार घेतला होता. त्या मोर्च्यात मीसुद्धा होते. मला आठवतंय, खूप गडबड झाली होती. ही चळवळ जवळजवळ दलवाईंनीच सुरू केली- असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल त्यांनी मारही खाल्ला आहे.
नोकरी सोडल्यानंतर फुलटाइम चळवळीचं काम सुरू झालं. तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांची परिषद पुण्यामध्ये झाली, ७३ मध्ये. त्यात मी होते. त्यांच्या जवळजवळ सगळ्या प्रोग्राम्समध्ये मी होते. पहिली मीटिंग बांद्र्याला झाली. विषयाची माहिती नाही. कसं बोलतात, माहिती नाही. महंमद दलवाई म्हणजे ह्यांच्या आतेभावाचा मुलगा, पहिल्या मीटिंगमध्ये ते मला घेऊन गेले बांद्र्याला. त्या मीटिंगमध्ये हे बोलले. लोक म्हणायला लागले, ‘‘काय छान बोलतो रे! काय हा माणूस चांगलं बोलतो रे!’’ आम्ही मागं बसलेले असल्यामुळे महंमददा म्हणाले, ‘‘बघा, काकी बघा- काय लोक हमीदबद्दल बोलतात!’’ त्यांना पण खूप कौतुक वाटायचं. त्या मीटिंगनंतर दलवाईंनी मला विचारलं, ‘‘मेहरू, कशी झाली ग मीटिंग?’’ म्हटलं, ‘‘खूप चांगली झाली. लोक असं-असं म्हणत होते. पण मला एक अक्षरही कळलं नाही, तुम्ही काय बोलता त्यातलं. कशाबद्दल बोलला, काही कळलं नाही. तुम्ही बोलत होता खूप चांगलं. लोक तुमची तारीफ करत होते. त्यावरून तुम्ही चांगलंच बोलत असाल, असं मला वाटलं.’’ मग आम्ही रस्त्यानं गेल्यानंतर लोक म्हणायचे, ‘‘बघ-बघ, हमीद दलवाई चाललेत. काय छान बोलतात.’’ हे म्हणायचे, ‘‘बघ तुझ्या नवऱ्याची कशी तारीफ करताहेत, ऐक तू. तुला काहीच वाटत नाही?’’ असं ते चेष्टा-बिष्टा करत विचारायचे.
त्यांचा विषय असे मुस्लिम समाज. मुसलमानांचे राजकारण-समाजकारण काय आहे? त्यांचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे? ते म्हणत, ज्या माणसाला भूगोल समजत नाही, त्याला इतिहासही कळणार नाही. मुसलमानांची चूक इथंच आहे की, त्यांना भूगोल कळलेला नाही. त्यांनी त्याच काळामध्ये पुस्तक पण लिहिलं. अजून ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही.
‘इंधन’ कादंबरी छापली गेली. महाराष्ट्र सरकारचं पहिलं बक्षीस तिला मिळालं. त्यानंतर गाववाल्यांनी यांना वाळीत टाकलं आणि तिथं गोंधळ घातला. कुळवाडी लोकांना भडकवलं तिकडे- तुमच्याबद्दल हमीदखाननी असं-असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तिथे वाद झाला. दंगल झाली. आमच्या घरावर दोन महिने बहिष्कार टाकला. आमच्या बाबांची दाढी करायला न्हावी येत नसे. डोंगरावर घर होतं. आमच्या बायका खालून पाणी वर न्यायच्या, तर त्यांना गडी मिळत नसे. बायकांचे आमच्या हालच झाले. खूप त्रास झाला. इथे आमच्या घरावर दगडफेक झाली. निनावी पत्रं आली. म्हणजे मारण्याच्या धमक्या आल्या.
पहिला ‘लाट’ कथासंग्रह निघाला. रुबिनाच्या वेळेला, ५८-५९ मध्ये. ‘इंधन’ ६६ला निघाली. इलाच्या वेळेला. तर तेव्हा मी पुण्याला येणार होते डिलिव्हरीला, ती आलेच नाही. मुंबईत राहिले. घरावर दगडफेक झाली. मारण्याच्या धमक्यांची निनावी पत्रं मला आली. त्याच्यात माझी डिलिव्हरी झाली. गावातील परिस्थिती खूप खराब झाली. मग काय करायचं? मग इथल्या २०० पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन इथून गेले तिकडे. तिथं मग काही लोकांनी मिळून त्यांचा मोठा सत्कार केला नि तो वाद मिटला मिरजोळीला.
वर्ष आठवत नाही, पण ‘मुस्लिम पर्सनल लॉ’वर दुसरा मोर्चा झाला. ऑल इंडिया लेव्हलवर. मुंबईच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये गुप्त मीटिंग घेतलेली होती मुस्लिमांची. तिथं फोटोग्राफर्स, रिपोटर्स अलाऊड नव्हते. मुसलमानांनी घेतलेली मीटिंग हो; त्यामध्ये दलवाईंना बंदी. त्यामुळं आमची माणसं गुप्तपणे आत शिरू शकली नाहीत. काही ठिकाणी मीटिंगमध्ये आमची माणसं अशी गुप्तपणे जाऊन रिपोर्ट आणत असत. त्या वेळी हे झालं नाही. त्या मीटिंगला प्रोटेस्ट म्हणून आम्ही मोर्चा काढला.... बॉम्बे सेंट्रलला एस.टी.च्या डेपोच्या बाहेर सगळ्यांनी जमा व्हायचं.... युवादलाची काही मुलं होती. राष्ट्र सेवा दलाची काही आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची काही होती. तर याच्यामध्ये २५ जण होतो. त्याच्यात आम्ही दोन-तीनच बायका होतो. मी आणि अॅडव्होकेट नजमा होती. एक-दोन आणखी बायका होत्या. तर आम्ही तिथं जमा झालो दुपारपर्यंत. मोर्चाला ये, असं यांनी मला सांगितलं नाही. मोर्चा आहे, असं मला माहिती होतं. आमच्याकडे सगळे जमा झाले, जेवणं झाली. सगळे निघाले तेव्हा हे मला म्हणाले, ‘‘असा असा मोर्चा आहे. तुला यायचं असेल तर ये. तुला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागेल.’’ मी म्हटलं, ‘‘मी येणारच.’’ ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि मी तिथं मोर्चाला गेले. पहिल्या मोर्चाचा अनुभव होता ना! चुपचाप गेलो-आलो, काहीच झालं नाही ही कल्पना घेऊन या मोर्चात गेले. तिथं गेल्यानंतर आमचे लोक उभे सगळे लायनीत. हातात फलक घेऊन. तिथं, त्या एरियात मुसलमानांची २००० घरं आहेत. आणि जागोजागी चार-पाच माणसं जमा झालेली मला दिसली. असे गट जमा झालेले. ते बघून मी थोडी घाबरले. अब्दुल कादिर मुकादम नावाचे आमचे एक कार्यकर्ते होते. ते आधी बी.ई.एस.टी.मध्ये होते. त्यांना मी म्हटलं, ‘‘मुकादम, हे लोक का हो जमा झाले आहेत?’’ ते म्हणाले, ‘‘भाभी, तुम्ही लक्ष नका देऊ त्याकडे.’’ यांनी मुकादमला सांगितले होतं का- तू भाभीला सांभाळ, तिला कसलीच कल्पना नाहीये. आणि ते पुढे आले. मी म्हटलं, ‘‘बोलता-बोलता इथे गडबड झाली मुकादम, तर जायला जागा कुठली? आपण कुठल्याही घरात शिरलो, तरी मुसलमानांच्याच घरात शिरणार. तो तर आपल्याला ठेवणार नाही. मग आपण काय करायचं अशा प्रसंगात?’’ तर त्यांनी सांगितलं, ‘‘पुढे बेस्टचा डेपो आहे. तिथं आमचा चौकीदार बसलेला आहे. त्याला मी सांगितलं आहे आमचं कोणी आलं तर त्याला प्रोटेक्शन द्यायचं. तुम्ही काही घाबरू नका.’’
आता मोर्चा सुरू झाला. आजूबाजूने २०० पोलिसांचा पहारा उभा आणि समोर २०००चा मॉब उभा. मॉब आम्हाला मारण्यासाठी, लोकांची गर्दी मोर्चावर हल्ला करायचा नि तुटून पडायचं म्हणून. तशात आमच्याजवळ थोडी माणसं आली. जेव्हा आम्ही स्लोगन्स द्यायला सुरुवात केली, तेव्हा येऊन अंगावर तुटून पडायला लागली. तेव्हा पोलिसांनी खूप प्रोटेक्शन दिलं. म्हणजे बेस्टचा डेपो येईपर्यंत पोलीस त्यांना बाजूला-बाजूला करत गेले. आणि मॉब जमा झाला खूप. पोलिसांच्या आटोक्यात राहिला नाही. सगळे इकडे-तिकडे झाले. नजमा शेख जी होती, ती ४-५ महिन्यांची प्रेग्नंट होती. तिनं माझा हात घट्ट धरलेला होता. गंमत अशी की- दलवाई असे चाललेले होते... आणि ते समोरचे जे लोक होते, त्यांना हे माहिती नाही की हमीद कोण! हे पुढे चालले सिगरेट फुंकत. त्यांच्या चेहऱ्ययावर जरासुद्धा भीती नाही. त्यांचा तो चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे. पोलीस मागे ओढतील, तर हे पुढे. पोलिसांना मागं सारून हा मनुष्य बेफिकीरपणे पुढेच चाललेला आहे. पोलिसांना जड जात होतं त्यांना थोपवणं. पण त्यांनी खूप चांगलं प्रोटेक्शन दिलं.
हे लोक जेव्हा आमच्यावर तुटून पडले, तेव्हा मी व नजमा धावून बेस्टच्या डेपोमध्ये गेलो. त्यानंतर इथं बाहेर काठ्या, लाठ्या, तलवारी, सोडावॉटरच्या बाटल्या अन् काय काय... असा धुमाकूळ घातला. आम्हाला वाटलं, आमच्या सगळ्या लोकांच्या कत्तली झाल्या! आम्ही आत लपून बसलो दोन तास. इथं लढाई चालू होती. तिथं काय झालं? असं म्हणतात का, तिथं पोलिसांची व्हॅन झाली. त्यांनी आमच्या सगळ्या लोकांना भराभर आत बसवलं. व्हॅन बंद असते. व्हॅन बंद केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, मी व नजमा दिसत नाही. हे म्हणाले, ‘‘बाबा रे, या दोघी बाहेर राहिलेल्या. मी काही जात नाही. मला खाली उतरू द्या, मला त्यांना शोधायला पाहिजे.’’ सगळे म्हणाले, ‘‘तुम्हाला तर मारायला लोकं जमा झाली आहेत खाली.’’ अब्दुल कादिर मुकादम म्हणाले, ‘‘भाभींनी असं-असं विचारलं होतं. भाभी नक्कीच डेपोमध्ये गेल्या असतील...’’ आणि मग ते उतरले. पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये आत आले. मग पायधुनीला मोर्चा नेण्यात आला. आम्हाला मागच्या दाराने प्रायव्हेट गाडीतून पायधुनीला नेण्यात आलं. मधुभाई पंडित वगैरेंना किरकोळ मार लागला होता. मग तिथं विचारपूस झाली. रात्री १२ ला आम्हाला घरी आणून सोडलं.
नंतर २-३ महिने आमच्या घरावर पोलिसांचा पहारा असायचा. आणि मला अशी दहशत बसलेली होती की, बास. पहिला मोर्चा आणि दुसरा मोर्चा एकदम विरुद्ध. इतकी दहशत बसली की- बाहेर जाताना भीती वाटायची की कोणी आपल्याला मारेल का? आणि मग यांच्या कामाचं स्वरूप माझ्या लक्षात आलं. हे जे करतात, ते अशा टाइपचे कामच. बोहरी लोकांच्या, त्यांच्या धर्मगुरू सय्यदनांच्या विरोधात जो व्हीटीला मोर्चा काढण्यात आला होता, त्यात दलवाईंनी पुढाकार घेतला होता. त्या मोर्च्यात मीसुद्धा होते. मला आठवतंय, खूप गडबड झाली होती. ही चळवळ जवळजवळ दलवाईंनीच सुरू केली- असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल त्यांनी मारही खाल्ला आहे.