राजेश टोपे
जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. करोनाचे संकट दूर होऊन, सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी मी मनोकामना करतो. जागतिक आरोग्य दिनाचे ध्येय नजरेसमोर ठेवून, राज्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली. त्याचे नियोजनही झाले; मात्र जगाला भेडसावणारे करोनाचं संकट आपल्या राज्यात येऊन धडकले आणि त्याला रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणाच जुंपली गेली.
आज आरोग्यदिनाच्या निमित्ताने डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना विशेष शुभेच्छा देताना, मी त्यांचे आभारही मानतो; कारण आज या सर्वांमुळेच राज्यातील सर्वसामान्य नागरिक सुरक्षित असल्याची माझी भावना आहे. आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार न करता ही मंडळी करोनाच्या रुग्णांची सेवा निष्ठेने आणि धीराने करताना दिसतात. सैनिकाप्रमाणे त्यांची करोनाशी लढाई सुरू आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा!
एरवी सरकारी आरोग्यसेवा ही कायमच टीकेचा विषय असते. मुळात आतापर्यंत आरोग्य विभागासाठी अर्थसंकल्पात जी तरतूद केली जायची, ती खूप तुटपुंजी होती; त्यामुळेच आरोग्यसेवा कुठे तरी कमी पडते. राज्यात निधी अभावी अनेक ठिकाणी आरोग्यसंस्थांची बांधकामेही अर्धवट आहेत. या साऱ्या बाबी समजून घेऊन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर, राज्यात पहिल्यांदाच आरोग्य विभागासाठी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. अर्धवट बांधकामे पूर्णत्वाला नेण्यासाठी 'एशियन डेव्हलपमेंट बँके'कडून कर्ज घेण्याचा निर्णय झाला. या वर्षी ५० टक्के जुन्या रुग्णवाहिका बदलण्याचा निर्णय झाला. विभागातील रिक्त पदे भरतीलाही चालना देण्यात आली आहे.
हे सगळे टप्प्याटप्याने सुरू असतानाच, करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे लागले. आपल्या राज्याने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून ज्या काही उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे आज देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्याकडे आढळत असतानाही, त्याचा ताण यंत्रणेवर आलेला नाही. साधारणपणे जानेवारीच्या १८ तारखेपासून करोनाबाधित भागांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यास सुरुवात केली. त्यात केंद्र शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांनुसार बदल करीत, प्रवाशांची तपासणी, त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात आला.
याच दरम्यान विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असताना, नऊ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिले करोनाबाधित रुग्ण आढळले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी अधिवेशन लवकर संपविण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबर मॉल, चित्रपटगृहे, शाळा, कार्यालये बंद करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेतला. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरबरोबर मुंबईतही करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर, महाराष्ट्र लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. अगदी गेल्या किमान १०० वर्षांत मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल सेवा बंद झाली. हे सगळे आपल्याला माहीत आहेच.
करोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे आणि बरे होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. आपण सध्या तरी करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. सामूहिक संसर्ग झाला आहे, अशी परिस्थिती नाही. भाजीपाला, औषधे, किराणा आदी जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. दररोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही सगळे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधत आहोत. मुख्यमंत्रीही नागरिकांना दिलासा देत आहेत. राज्याच्या परिस्थितीवर मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली सचिवांचा गट नियंत्रण ठेवून आहे.
आज आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो, की कुणीही घाबरून जाऊ नका. सरकारने या संकटाला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. करोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये राज्यभरात उभी केली आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेत सुमारे १५०० व्हेंटिलेटर्स आहेत. ते केवळ करोना रुग्णांसाठी स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहेत. ३५ हजार पीपीई किटस् आहेत. तीन लाख एन ९५ मास्क आहेत. ११ हजार ६७० एवढे आयसोलेशन बेडस् आहेत, तर ९५०० क्वारंटाइन बेडस् आहेत. करोनाबाधित रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचारांचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी असलेल्या खासगी रुग्णालयांच्या माध्यमांतूनही दोन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध होतील. राज्याने संपूर्ण आरोग्य सज्जता केली आहे. करोना चाचण्यांची क्षमता आज महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
सुरुवातीला केवळ पुणे, मुंबई, नागपूर येथे असणाऱ्या या सुविधेचा विस्तार होऊन, आज २३ शासकीय आणि खासगी लॅबमध्ये चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सातत्याने चर्चा केली. पाठपुरावा केल्यामुळे आयसीएमआरकडून तातडीने राज्यातील अन्य भागांतही लॅब सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे आज राज्याची दिवसाला चाचण्या करण्याची क्षमता पाच हजार एवढी आहे.
साधनसामुग्रीची उपलब्धता करतानाच, करोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्याची सुरुवात केली पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट देण्यापासून. या ठिकाणी काम करणाऱ्या तज्ज्ञांना मी भेटलो. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. देशातली एकमेव असणारी ही संस्था आपल्या राज्यात कार्यरत आहे, याचा मला नक्कीच अभिमान आहे. पुण्याचे नायडू हॉस्पिटल, मुंबईचे कस्तुरबा रुग्णालय येथेही भेट दिली. तिथले डॉक्टर्स, नर्स यांना अभिवादन केले. विलगीकरणातील रुग्णांसाठी टीव्ही, वायफाय, पोषक आहार यांचीही सोय केली. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांचे काम पाहिले, तर खरोखर तुम्ही नतमस्तक व्हाल. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली जाते, त्या विमानतळावर जाऊन त्याचीही मी माहिती घेतली. मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. तेथे चालणाऱ्या कामाचा आढावा घेतला. कंटेन्मेंट क्लस्टरमधील सर्वेक्षणाची माहिती घेतली. मुंबईत जे साडेपाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.
आपण स्वत: पुढाकार घेतला आणि काम केले, की लोकांना बळ मिळते. अब्राहम लिंकन यांच्या सिव्हिल वॉरवरील पुस्तकातून ही प्रेरणा मिळते. शरद पवार यांनी किल्लारी येथे भूकंप पुनर्वसनाच्या काळात केलेले काम आजही प्रेरणादायी आहे. शरद पवार तेव्हा किल्लारीला जाऊन, गावात मुक्काम करत. यामुळे प्रशासनाला व सर्वसामान्यांना बळ मिळायचे.
'फाइट फ्रॉम फ्रंट' हे तत्त्व करोनाच्या विरोधातल्या लढाईत कायम लक्षात ठेवायला हवे. करोनाच्या व्याधीमुळे एक गोष्ट आवर्जून लक्षात आली, ती म्हणजे सरकारी आरोग्यसेवेवरचा लोकांचा विश्वास वाढला. या संकट काळात भीतीपोटी अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले. वारंवार आवाहन करूनही ते सुरू केले नाहीत. यामुळे शासकीय आरोग्यसेवेचे महत्त्व लोकांना पटले; परंतु एवढ्यावरच समाधान न मानता, आता शासकीय आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी, पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, प्रयत्न करायला हवेत.
राज्याचा आरोग्यमंत्री या नात्याने करोनापासून तुमचा बचाव करण्यासाठी मी व आम्ही सारे सदैव सज्ज आहोत. तुम्हीही सरकारला साथ द्या, 'मी घरी थांबणार, मी करोनाला हरवणार,' ही शपथ घ्या!
(लेखक महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत.)
जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. करोनाचे संकट दूर होऊन, सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी मी मनोकामना करतो. जागतिक आरोग्य दिनाचे ध्येय नजरेसमोर ठेवून, राज्यात आरोग्याच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली. त्याचे नियोजनही झाले; मात्र जगाला भेडसावणारे करोनाचं संकट आपल्या राज्यात येऊन धडकले आणि त्याला रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणाच जुंपली गेली.
आज आरोग्यदिनाच्या निमित्ताने डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना विशेष शुभेच्छा देताना, मी त्यांचे आभारही मानतो; कारण आज या सर्वांमुळेच राज्यातील सर्वसामान्य नागरिक सुरक्षित असल्याची माझी भावना आहे. आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार न करता ही मंडळी करोनाच्या रुग्णांची सेवा निष्ठेने आणि धीराने करताना दिसतात. सैनिकाप्रमाणे त्यांची करोनाशी लढाई सुरू आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा!
एरवी सरकारी आरोग्यसेवा ही कायमच टीकेचा विषय असते. मुळात आतापर्यंत आरोग्य विभागासाठी अर्थसंकल्पात जी तरतूद केली जायची, ती खूप तुटपुंजी होती; त्यामुळेच आरोग्यसेवा कुठे तरी कमी पडते. राज्यात निधी अभावी अनेक ठिकाणी आरोग्यसंस्थांची बांधकामेही अर्धवट आहेत. या साऱ्या बाबी समजून घेऊन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर, राज्यात पहिल्यांदाच आरोग्य विभागासाठी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. अर्धवट बांधकामे पूर्णत्वाला नेण्यासाठी 'एशियन डेव्हलपमेंट बँके'कडून कर्ज घेण्याचा निर्णय झाला. या वर्षी ५० टक्के जुन्या रुग्णवाहिका बदलण्याचा निर्णय झाला. विभागातील रिक्त पदे भरतीलाही चालना देण्यात आली आहे.
हे सगळे टप्प्याटप्याने सुरू असतानाच, करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे लागले. आपल्या राज्याने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून ज्या काही उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे आज देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्याकडे आढळत असतानाही, त्याचा ताण यंत्रणेवर आलेला नाही. साधारणपणे जानेवारीच्या १८ तारखेपासून करोनाबाधित भागांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यास सुरुवात केली. त्यात केंद्र शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांनुसार बदल करीत, प्रवाशांची तपासणी, त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात आला.
याच दरम्यान विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असताना, नऊ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिले करोनाबाधित रुग्ण आढळले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी अधिवेशन लवकर संपविण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबर मॉल, चित्रपटगृहे, शाळा, कार्यालये बंद करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेतला. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरबरोबर मुंबईतही करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर, महाराष्ट्र लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. अगदी गेल्या किमान १०० वर्षांत मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल सेवा बंद झाली. हे सगळे आपल्याला माहीत आहेच.
करोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे आणि बरे होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. आपण सध्या तरी करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. सामूहिक संसर्ग झाला आहे, अशी परिस्थिती नाही. भाजीपाला, औषधे, किराणा आदी जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. दररोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही सगळे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधत आहोत. मुख्यमंत्रीही नागरिकांना दिलासा देत आहेत. राज्याच्या परिस्थितीवर मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली सचिवांचा गट नियंत्रण ठेवून आहे.
आज आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो, की कुणीही घाबरून जाऊ नका. सरकारने या संकटाला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. करोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये राज्यभरात उभी केली आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेत सुमारे १५०० व्हेंटिलेटर्स आहेत. ते केवळ करोना रुग्णांसाठी स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहेत. ३५ हजार पीपीई किटस् आहेत. तीन लाख एन ९५ मास्क आहेत. ११ हजार ६७० एवढे आयसोलेशन बेडस् आहेत, तर ९५०० क्वारंटाइन बेडस् आहेत. करोनाबाधित रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचारांचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी असलेल्या खासगी रुग्णालयांच्या माध्यमांतूनही दोन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध होतील. राज्याने संपूर्ण आरोग्य सज्जता केली आहे. करोना चाचण्यांची क्षमता आज महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
सुरुवातीला केवळ पुणे, मुंबई, नागपूर येथे असणाऱ्या या सुविधेचा विस्तार होऊन, आज २३ शासकीय आणि खासगी लॅबमध्ये चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी सातत्याने चर्चा केली. पाठपुरावा केल्यामुळे आयसीएमआरकडून तातडीने राज्यातील अन्य भागांतही लॅब सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे आज राज्याची दिवसाला चाचण्या करण्याची क्षमता पाच हजार एवढी आहे.
साधनसामुग्रीची उपलब्धता करतानाच, करोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स तसेच अन्य आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्याची सुरुवात केली पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट देण्यापासून. या ठिकाणी काम करणाऱ्या तज्ज्ञांना मी भेटलो. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. देशातली एकमेव असणारी ही संस्था आपल्या राज्यात कार्यरत आहे, याचा मला नक्कीच अभिमान आहे. पुण्याचे नायडू हॉस्पिटल, मुंबईचे कस्तुरबा रुग्णालय येथेही भेट दिली. तिथले डॉक्टर्स, नर्स यांना अभिवादन केले. विलगीकरणातील रुग्णांसाठी टीव्ही, वायफाय, पोषक आहार यांचीही सोय केली. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांचे काम पाहिले, तर खरोखर तुम्ही नतमस्तक व्हाल. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली जाते, त्या विमानतळावर जाऊन त्याचीही मी माहिती घेतली. मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. तेथे चालणाऱ्या कामाचा आढावा घेतला. कंटेन्मेंट क्लस्टरमधील सर्वेक्षणाची माहिती घेतली. मुंबईत जे साडेपाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.
आपण स्वत: पुढाकार घेतला आणि काम केले, की लोकांना बळ मिळते. अब्राहम लिंकन यांच्या सिव्हिल वॉरवरील पुस्तकातून ही प्रेरणा मिळते. शरद पवार यांनी किल्लारी येथे भूकंप पुनर्वसनाच्या काळात केलेले काम आजही प्रेरणादायी आहे. शरद पवार तेव्हा किल्लारीला जाऊन, गावात मुक्काम करत. यामुळे प्रशासनाला व सर्वसामान्यांना बळ मिळायचे.
'फाइट फ्रॉम फ्रंट' हे तत्त्व करोनाच्या विरोधातल्या लढाईत कायम लक्षात ठेवायला हवे. करोनाच्या व्याधीमुळे एक गोष्ट आवर्जून लक्षात आली, ती म्हणजे सरकारी आरोग्यसेवेवरचा लोकांचा विश्वास वाढला. या संकट काळात भीतीपोटी अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले. वारंवार आवाहन करूनही ते सुरू केले नाहीत. यामुळे शासकीय आरोग्यसेवेचे महत्त्व लोकांना पटले; परंतु एवढ्यावरच समाधान न मानता, आता शासकीय आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी, पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, प्रयत्न करायला हवेत.
राज्याचा आरोग्यमंत्री या नात्याने करोनापासून तुमचा बचाव करण्यासाठी मी व आम्ही सारे सदैव सज्ज आहोत. तुम्हीही सरकारला साथ द्या, 'मी घरी थांबणार, मी करोनाला हरवणार,' ही शपथ घ्या!
(लेखक महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत.)