मुंबई- एक वेळ होती जेव्हा झी मराठी वाहिनी प्रेक्षकांची अत्यंत आवडती होती. संध्याकाळ झाली की बहुतेकांच्या घरात केवळ झी मराठी वाहिनी सुरू असलेली दिसायची. झी वरील असे कित्येक कार्यक्रम आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. केवळ मराठी भाषिकच नाही तर इतर भाषेतील प्रेक्षकही हे कार्यक्रम आवडीने पाहायचे. मालिकांचा दर्जा आणि कलाकार यांमुळे प्रेक्षक इतर वाहिन्याकडे ढुंकूनही पाहत नसत. मग त्या मालिका असोत किंवा कथाबाह्य कार्यक्रम. झीची प्रत्येकावर मक्तेदारी असे. मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र झपाट्याने बदललेलं दिसलं. झी मराठीवरील मालिकांची लोकप्रियता प्रचंड कमी झालेली पाहायला मिळाली. त्याचा फटका आता 'फू बाई फू' या कार्यक्रमाला देखील बसलेला दिसतोय.
काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या कार्यक्रमातील विनोद आणि कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक ठरला होता. त्यामुळेच निर्मात्यांनी आणि वाहिनीने या कार्यक्रमाचा पुढील सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे चाहते भलतेच खुशीत होते. कार्यक्रमात निर्मिती सावंत आणि उमेश कामत परीक्षकाच्या भूमिकेत होते तर वैदेही परशुरामी निवेदिकेच्या भूमिकेत होती. मात्र इतक्या वर्षांनी सुरू झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अनेक सीझन गाजवणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली.
ओमकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर अशा अनेक हरहुन्नरी कलाकारांना सोबत घेऊन 'फू बाई फू' ची गाडी सुरू झाली खरी पण कार्यक्रमातील पांचट विनोद आणि घसरलेला दर्जा पाहून प्रेक्षकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा कार्यक्रम टीआरपी यादीत कुठेही स्थान मिळवू शकला नाही. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सूरू झालेला हा कार्यक्रम आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग चित्रित होत आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात या कार्यक्रमाने आपला गाशा गुंडाळला आहे.
काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'फू बाई फू' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या कार्यक्रमातील विनोद आणि कलाकारांचा अभिनय यांच्या जोरावर हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक ठरला होता. त्यामुळेच निर्मात्यांनी आणि वाहिनीने या कार्यक्रमाचा पुढील सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे चाहते भलतेच खुशीत होते. कार्यक्रमात निर्मिती सावंत आणि उमेश कामत परीक्षकाच्या भूमिकेत होते तर वैदेही परशुरामी निवेदिकेच्या भूमिकेत होती. मात्र इतक्या वर्षांनी सुरू झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अनेक सीझन गाजवणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली.
ओमकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर अशा अनेक हरहुन्नरी कलाकारांना सोबत घेऊन 'फू बाई फू' ची गाडी सुरू झाली खरी पण कार्यक्रमातील पांचट विनोद आणि घसरलेला दर्जा पाहून प्रेक्षकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा कार्यक्रम टीआरपी यादीत कुठेही स्थान मिळवू शकला नाही. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सूरू झालेला हा कार्यक्रम आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग चित्रित होत आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात या कार्यक्रमाने आपला गाशा गुंडाळला आहे.