मुंबई :
झी टीव्हीवरील 'ग्रहण' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. रमा ही वसुधा असल्याचं तिची मैत्रीण सांगते, आणि आता रमाचा नवरा 'अभय पोतदार' परत येतोय. सुनील बर्वेही मागच्या भागात प्रेक्षकांना मालिकेत दिसला आहे. सुनील बर्वेच अभय पोतदार आहे का? रमाचा वसुधा आणि मंगलशी काय संबंध आहे? या इतर प्रश्नांचीही मालिकेच्या पुढील काही भागांत उकल होणार आहे.
'ग्रहण'च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर अभिनेत्री पल्लवी जोशीचं छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ग्रहण ही मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येत नाही आणि प्रेक्षक आतुरतेने पुढील भागाची वाट पाहतात. कथेतील गूढता प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. जसजशी मालिका अंतिम टप्प्यात येते आहे, तसं मालिकेला एक वेगळाच वळण मिळत आहे, मालिकेतील गूढ उकलतंय असं वाटत असतानाच रमा ही रमा नसून वसुधा असल्याचं तिची मैत्रीण सांगते आणि मालिकेला वेगळं वळण मिळतं.
पहिल्या भागात रमाचं घर हरवतं आणि ती आपल्या घराच्या शोधात निरंजनकडे येऊन रहाते आणि सगळेजण तिला निरंजनची मृत पत्नी 'मंगल' समजतात. रमाच्या अवतीभोवती अनेक रहस्यमय घटना घडत जातात आणि त्याचा आरोप रमावर येतो. पण रमा ही वसुधा असल्याचा तिची मैत्रीण सांगते, आणि आता रमाचा नवरा 'अभय पोतदार' परत येतोय.
कोण आहे हा अभय पोतदार? रमाचा वसुधा आणि मंगलशी काय संबंध आहे? रमाला तिचं हरवलेलं घर मिळेल? हे सगळं येत्या काही भागांत आपल्याला पाहता येणार आहे.
झी टीव्हीवरील 'ग्रहण' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. रमा ही वसुधा असल्याचं तिची मैत्रीण सांगते, आणि आता रमाचा नवरा 'अभय पोतदार' परत येतोय. सुनील बर्वेही मागच्या भागात प्रेक्षकांना मालिकेत दिसला आहे. सुनील बर्वेच अभय पोतदार आहे का? रमाचा वसुधा आणि मंगलशी काय संबंध आहे? या इतर प्रश्नांचीही मालिकेच्या पुढील काही भागांत उकल होणार आहे.
'ग्रहण'च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर अभिनेत्री पल्लवी जोशीचं छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ग्रहण ही मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येत नाही आणि प्रेक्षक आतुरतेने पुढील भागाची वाट पाहतात. कथेतील गूढता प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. जसजशी मालिका अंतिम टप्प्यात येते आहे, तसं मालिकेला एक वेगळाच वळण मिळत आहे, मालिकेतील गूढ उकलतंय असं वाटत असतानाच रमा ही रमा नसून वसुधा असल्याचं तिची मैत्रीण सांगते आणि मालिकेला वेगळं वळण मिळतं.
पहिल्या भागात रमाचं घर हरवतं आणि ती आपल्या घराच्या शोधात निरंजनकडे येऊन रहाते आणि सगळेजण तिला निरंजनची मृत पत्नी 'मंगल' समजतात. रमाच्या अवतीभोवती अनेक रहस्यमय घटना घडत जातात आणि त्याचा आरोप रमावर येतो. पण रमा ही वसुधा असल्याचा तिची मैत्रीण सांगते, आणि आता रमाचा नवरा 'अभय पोतदार' परत येतोय.
कोण आहे हा अभय पोतदार? रमाचा वसुधा आणि मंगलशी काय संबंध आहे? रमाला तिचं हरवलेलं घर मिळेल? हे सगळं येत्या काही भागांत आपल्याला पाहता येणार आहे.