मुंबई : देशावर आलेल्या करोना संकाटाचा मनोरंजन विश्वावर खूपच परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेमुळे सर्व मालिका आणि सिनेमांची चित्रीकरणे बंद होती. मध्यंतरी ती पुन्हा सुरू झाली परंतु करोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा त्यावर बंदी घातली गेली. यामुळे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ यांच्याकडे काम नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका ' ये रिश्ता क्या कहलता है' मालिकेतील लोकप्रिय कलाकार संजय गांधी यांनी देखील गेल्या १० महिन्यांपासून काम नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती एका मुलाखतीमध्ये दिली आहे. Video शाहरुखसारखा रागट आहे अब्राम, फोटोग्राफरवर चिडला
अभिनेता संजय गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'करोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून सर्व मालिकांचे, सिनेमांचे चित्रीकरण थांबले आहेत. यामुळे गेल्या १० महिन्यांपासून माझ्याकडे काम नाही. ज्या भूमिका येत आहेत, त्याचे मानधन अतिशय कमी आहे.' ते या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले की, 'करोनामुळे घराबाहेर पडायचीही भीती वाटूल लागली आङे. पण जेव्हा तुमच्याकडे कोणताही पर्याय रहात नाही तेव्हा तुम्हाला कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी बाहेर पडावेच लागते.'
आर्थिक अडचणी
संजय पुढे म्हणाले की, 'रोज माझ्या परिचयातील व्यक्ती करोनामुळे गेल्याची बातमी मी ऐकत आहे. मलाही लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. परंतु मी असहाय्य आहे. मी गर्भश्रीमंत नाही आणि आता सध्या मलाच आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. जुलै २०२० मध्ये नागिन ४ मध्ये काम केले होते, त्यानंतर काम केलेले नाही. मी येथे भाड्याच्या घरात रहात आहे. हातातले पैस संपत आले असून नवं कामही नाही. भविष्यात काय करायचे हे देखील ठरवलेले नाही.'
माधुरी दीक्षितचा मुलगा झाला पदवीधर पाहा Family Photo
संजय एवढ्यावरच थांबले नाहीत. आपली अगतीकता सांगते ते म्हणाले, 'मध्यंतरी एक लहानशा खलनायकाची भूमिका करण्यासाठी विचारणा केली होती. परंतु हा रोल अतिशय लहान होता. आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत त्या पहाता अशा भूमिका करणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे. अशा भूमिका करण्यापेक्षा मी घरात बसून राहीन.' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अभिनेता संजय गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'करोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून सर्व मालिकांचे, सिनेमांचे चित्रीकरण थांबले आहेत. यामुळे गेल्या १० महिन्यांपासून माझ्याकडे काम नाही. ज्या भूमिका येत आहेत, त्याचे मानधन अतिशय कमी आहे.' ते या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले की, 'करोनामुळे घराबाहेर पडायचीही भीती वाटूल लागली आङे. पण जेव्हा तुमच्याकडे कोणताही पर्याय रहात नाही तेव्हा तुम्हाला कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी बाहेर पडावेच लागते.'
आर्थिक अडचणी
संजय पुढे म्हणाले की, 'रोज माझ्या परिचयातील व्यक्ती करोनामुळे गेल्याची बातमी मी ऐकत आहे. मलाही लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. परंतु मी असहाय्य आहे. मी गर्भश्रीमंत नाही आणि आता सध्या मलाच आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. जुलै २०२० मध्ये नागिन ४ मध्ये काम केले होते, त्यानंतर काम केलेले नाही. मी येथे भाड्याच्या घरात रहात आहे. हातातले पैस संपत आले असून नवं कामही नाही. भविष्यात काय करायचे हे देखील ठरवलेले नाही.'
माधुरी दीक्षितचा मुलगा झाला पदवीधर पाहा Family Photo
संजय एवढ्यावरच थांबले नाहीत. आपली अगतीकता सांगते ते म्हणाले, 'मध्यंतरी एक लहानशा खलनायकाची भूमिका करण्यासाठी विचारणा केली होती. परंतु हा रोल अतिशय लहान होता. आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत त्या पहाता अशा भूमिका करणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे. अशा भूमिका करण्यापेक्षा मी घरात बसून राहीन.' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.