वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील एकूण २९ शहरे गंभीर आणि अतिगंभीर भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्यामध्ये दिल्लीसह नऊ राज्यांच्या राजधान्यांचाही समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान या संस्थेने दिली आहे. भूकंपप्रवण हिमालयीन विभागातील बहुतेक शहरांचा यात समावेश आहे. महाराष्ट्राचा अतिभूकंपप्रवण क्षेत्रात समावेश होतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
दिल्ली, पाटणा (बिहार), श्रीनगर (जम्मू काश्मीर), कोहिमा (नागालॅँड), पुद्दुचेरी, गुवाहाटी (आसाम), गंगटोक (सिक्कीम), सिमला (हिमाचल प्रदेश), देहराडून (उत्तराखंड), इम्फाळ (मणिपूर) आणि चंडीगड ही शहरे भूकंपप्रवण क्षेत्राच्या चार आणि पाच श्रेणीत येतात. या शहरांची एकूण लोकसंख्या तीन कोटींच्या घरात आहे.
भारतीय मानक विभागाने देशभरातील वेगवेगळी ठिकाणे माहितीच्या आधारे विभाजित केली असून, भूकंपप्रवण क्षेत्र, आजवरच्या भूकंपाच्या नोंदी आणि झालेले नुकसान आदी नोंदींच्या आधारे ही विभागणी केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान संस्थेचे संचालक विनित गुल्हाटी यांनी दिली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे देशातील शहरांची लघुविभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भूकंपाच्या परिणामांचा विचार करून हे लघुविभाग तयार करण्यात आले आहेत. त्यातील दोन हा विभाग सर्वांत कमी पातळीवरील असून, विभाग पाच हा सर्वांत धोकादायक भूकंपप्रवण आहे.
देशातील एकूण २९ शहरे गंभीर आणि अतिगंभीर भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्यामध्ये दिल्लीसह नऊ राज्यांच्या राजधान्यांचाही समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान या संस्थेने दिली आहे. भूकंपप्रवण हिमालयीन विभागातील बहुतेक शहरांचा यात समावेश आहे. महाराष्ट्राचा अतिभूकंपप्रवण क्षेत्रात समावेश होतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
दिल्ली, पाटणा (बिहार), श्रीनगर (जम्मू काश्मीर), कोहिमा (नागालॅँड), पुद्दुचेरी, गुवाहाटी (आसाम), गंगटोक (सिक्कीम), सिमला (हिमाचल प्रदेश), देहराडून (उत्तराखंड), इम्फाळ (मणिपूर) आणि चंडीगड ही शहरे भूकंपप्रवण क्षेत्राच्या चार आणि पाच श्रेणीत येतात. या शहरांची एकूण लोकसंख्या तीन कोटींच्या घरात आहे.
भारतीय मानक विभागाने देशभरातील वेगवेगळी ठिकाणे माहितीच्या आधारे विभाजित केली असून, भूकंपप्रवण क्षेत्र, आजवरच्या भूकंपाच्या नोंदी आणि झालेले नुकसान आदी नोंदींच्या आधारे ही विभागणी केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान संस्थेचे संचालक विनित गुल्हाटी यांनी दिली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे देशातील शहरांची लघुविभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भूकंपाच्या परिणामांचा विचार करून हे लघुविभाग तयार करण्यात आले आहेत. त्यातील दोन हा विभाग सर्वांत कमी पातळीवरील असून, विभाग पाच हा सर्वांत धोकादायक भूकंपप्रवण आहे.