नवी दिल्ली: मानवी उत्क्रांतीबाबतच्या डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देणारे भाजपचे खासदार सत्यपाल सिंग यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत, 'मानवाची उत्क्रांती माकडांपासून झालेली नसून आपण सर्वजण ऋषींचे वंशज आहोत', असे विधान थेट लोकसभेत केले.
लोकसभेत मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत बोलताना सत्यपाल सिंग यांनी आपला 'सिद्धांत' मांडला. 'आपण ऋषींचे वंशज आहोत असे भारतीय संस्कृती मानते. पण, काहीजण आपण माकडांचे वंशज असल्याचे म्हणतात. मी अशा व्यक्तींच्या भावना दुखवू इच्छित नाही', असे विधान त्यांनी चर्चेत बोलताना केले. त्यावरून गदारोळ उडाला. 'दुर्दैवाने माझे पूर्वज ऋषी नाहीत. शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ते माकडच होते. माझे आईवडील शूद्र आहेत. त्यांचा जन्म कोणा देवापासून झालेला नाही', अशा कठोर शब्दांत द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांनी सत्यपाल यांना टोला लगावला.
लोकसभेत मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयकावरील चर्चेत बोलताना सत्यपाल सिंग यांनी आपला 'सिद्धांत' मांडला. 'आपण ऋषींचे वंशज आहोत असे भारतीय संस्कृती मानते. पण, काहीजण आपण माकडांचे वंशज असल्याचे म्हणतात. मी अशा व्यक्तींच्या भावना दुखवू इच्छित नाही', असे विधान त्यांनी चर्चेत बोलताना केले. त्यावरून गदारोळ उडाला. 'दुर्दैवाने माझे पूर्वज ऋषी नाहीत. शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ते माकडच होते. माझे आईवडील शूद्र आहेत. त्यांचा जन्म कोणा देवापासून झालेला नाही', अशा कठोर शब्दांत द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांनी सत्यपाल यांना टोला लगावला.