नवी दिल्ली : व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्यास अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल (K K Venugopal) यांनी परवानगी दिली आहे. 'रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना जामीन दिल्याप्रकरणी तनेजा यांनी दोन ट्वीट केले होते. हे ट्वीट न्यायालयाचा अवमान करणारी असल्याची तक्रार विधी शाखेचा विद्यार्थी आदित्य कश्यप यांनी केली होती. त्यावर वेणुगोपाल यांनी कारवाई करण्यास परवानगी दिली. (Contempt Proceedings Against Cartoonist rachita taneja)
रचिता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोन कार्टुन रेखाटले होते. त्यांनी हे कार्टुन सोशल मीडियावर 'सॅनिटरी पॅनल्स' नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केले होते. हा न्यायालयावर हल्ला आणि न्यायालयीन संस्थेचा अवमान असल्याचं सांगत अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कारवाई करण्यात हिरवा कंदील दिलाय.
वाचा : शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा चहा नाकारला, नेत्यांना 'लंगर'चं आमंत्रण
वाचा : पीएम केअर्स फंडमधील पैसा कुठे गेला?, ममतांचा पुन्हा एकदा सवाल
'रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अर्णव गोस्वामी यांना जामीन देतानाच महाराष्ट्र सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 'जर आपणच एका संविधानिक न्यायालयाच्या रुपात कायद्याचा सन्मान आणि त्याच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणार नाही तर कोण करणार' असा प्रश्नही यावेळी न्यायालयानं विचारला होता.
यापूर्वी, अॅटर्नी जरनल के के वेणुगोपाल यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधातही कारवाई करण्याची परवानगी दिली होती. कुणाल कामरा यानंही अर्णव गोस्वामी यांना जामीन देण्यावर सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी केली होती. 'आज लोक निर्लज्जपणे सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांची निंदा करत आहेत. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं त्यांना वाटतं. अन्यायकारक पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्यासाठी शिक्षा भोगण्यासाठी तयार राहायला हवं, अशी वेळ आलीय' असंही यावेळी वेणुगोपाल यांनी म्हटलं होतं.
वाचा : आंदोलन करणारे बहुतेकजण शेतकरी वाटत नाहीतः व्हीके. सिंह
वाचा : शेतकरी आंदोलनाची 'चिंता'; जस्टिन ट्रुडोंना भारताचं प्रत्यूत्तर
रचिता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोन कार्टुन रेखाटले होते. त्यांनी हे कार्टुन सोशल मीडियावर 'सॅनिटरी पॅनल्स' नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केले होते. हा न्यायालयावर हल्ला आणि न्यायालयीन संस्थेचा अवमान असल्याचं सांगत अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कारवाई करण्यात हिरवा कंदील दिलाय.
वाचा : शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा चहा नाकारला, नेत्यांना 'लंगर'चं आमंत्रण
वाचा : पीएम केअर्स फंडमधील पैसा कुठे गेला?, ममतांचा पुन्हा एकदा सवाल
'रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अर्णव गोस्वामी यांना जामीन देतानाच महाराष्ट्र सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 'जर आपणच एका संविधानिक न्यायालयाच्या रुपात कायद्याचा सन्मान आणि त्याच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणार नाही तर कोण करणार' असा प्रश्नही यावेळी न्यायालयानं विचारला होता.
यापूर्वी, अॅटर्नी जरनल के के वेणुगोपाल यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधातही कारवाई करण्याची परवानगी दिली होती. कुणाल कामरा यानंही अर्णव गोस्वामी यांना जामीन देण्यावर सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी केली होती. 'आज लोक निर्लज्जपणे सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांची निंदा करत आहेत. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं त्यांना वाटतं. अन्यायकारक पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्यासाठी शिक्षा भोगण्यासाठी तयार राहायला हवं, अशी वेळ आलीय' असंही यावेळी वेणुगोपाल यांनी म्हटलं होतं.
वाचा : आंदोलन करणारे बहुतेकजण शेतकरी वाटत नाहीतः व्हीके. सिंह
वाचा : शेतकरी आंदोलनाची 'चिंता'; जस्टिन ट्रुडोंना भारताचं प्रत्यूत्तर