बडोदा: गुजरातच्या बडोद्यातील वाघोडिया परिसरात मुसळधार पावसानंतर चार फुटाची मगर आढळून आली. मगर पाहून स्थानिकांना धक्काच बसला. कारण वाघोडिया परिसर विश्वामित्री नदीपासून बराच दूर आहे. या नदीत ३०० पेक्षा अधिक मगरी आहेत. मात्र मगरींनी आता त्यांचा मुक्काम हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक चिंतेत आहेत.
मुसळधार पावसामुळे बडोद्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पाण्यात मगरी आढळून येत आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये आणि जमिनीखालील नाल्यांमध्ये मगरींनी वास्तव्य केलं आहे. पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी संपूर्ण शहरात नाल्यांचं मोठं नेटवर्क आहे. याच नाल्यांच्या नेटवर्कचा वापर मगरी स्थलांतर करण्यासाठी करत आहेत.
मगरी कोणाच्याही दृष्टीस न पडता नाल्यांमधून कित्येक किलोमीटर प्रवास करतात, अशी माहिती प्राणी मित्र नेहा पटेल यांनी दिली. शहरात असलेल्या नाल्यांमध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी मगरी आढळून आल्या आहेत, असं पटेल यांनी सांगितलं. बडोदा आणि आसपासच्या परिसरातून मगरींची सुटका करण्याचं काम पटेल करतात.
बडोद्यामध्ये जवळपास ४१० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. शहरातील बहुतांश भागांना हे नाले जोडलेले आहेत. शहरात साचलेलं पावसाचं पाणी विश्वामित्री नदीपर्यंत सोडण्याचं काम नाले करतात. आम्हाला प्रत्येक पावसाळ्यात नाल्यांमध्ये मगर दिसल्याचं किमान २५ ते ३० कॉल येतात, अशी माहिती पटेल यांनी दिली. मगरी सातत्यानं प्रवास करत असल्यानं त्यांच्या ठावठिकाण्याची नेमकी माहिती ठेवणं अवघड असल्याचं पटेल म्हणाल्या.
मुसळधार पावसामुळे बडोद्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पाण्यात मगरी आढळून येत आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये आणि जमिनीखालील नाल्यांमध्ये मगरींनी वास्तव्य केलं आहे. पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी संपूर्ण शहरात नाल्यांचं मोठं नेटवर्क आहे. याच नाल्यांच्या नेटवर्कचा वापर मगरी स्थलांतर करण्यासाठी करत आहेत.
मगरी कोणाच्याही दृष्टीस न पडता नाल्यांमधून कित्येक किलोमीटर प्रवास करतात, अशी माहिती प्राणी मित्र नेहा पटेल यांनी दिली. शहरात असलेल्या नाल्यांमध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी मगरी आढळून आल्या आहेत, असं पटेल यांनी सांगितलं. बडोदा आणि आसपासच्या परिसरातून मगरींची सुटका करण्याचं काम पटेल करतात.
बडोद्यामध्ये जवळपास ४१० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. शहरातील बहुतांश भागांना हे नाले जोडलेले आहेत. शहरात साचलेलं पावसाचं पाणी विश्वामित्री नदीपर्यंत सोडण्याचं काम नाले करतात. आम्हाला प्रत्येक पावसाळ्यात नाल्यांमध्ये मगर दिसल्याचं किमान २५ ते ३० कॉल येतात, अशी माहिती पटेल यांनी दिली. मगरी सातत्यानं प्रवास करत असल्यानं त्यांच्या ठावठिकाण्याची नेमकी माहिती ठेवणं अवघड असल्याचं पटेल म्हणाल्या.