नवी दिल्लीः हरयाणातील करनालमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर ( lathicharge on farmers ) मेघालयचे राज्य सत्यपाल मलिक यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांवर लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्वरीत बडतर्फ करावं, असं मलिक म्हणाले. मलिक पश्चिम उत्तर प्रदेशातून येत असलेले मलिक हे कायम शेतकऱ्यांच्या समर्थनात आवाज उठवत आहेत.
आरोपी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) पदारवर राहण्यास पात्र नाही. तरीही हरयाणा सरकार त्यांना संरक्षण देत आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात आतापर्यंत एकूण ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण अजूनही सरकारकडून सांत्वनाचा एक शब्दही आलेला नाही. मी शेतकरी पुत्र आहे आणि त्यांच्या वेदना जाणतो, असं सत्यपाल मलिक म्हणाले.
हरयाणाचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर लाठीमार करवत आहेत. पण केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर बळाचा कुठलाही वापर केलेला नाही. शेतकरी आंदोलन पाहता बळाचा वापर करू नये, अशी मागणी आपण वरिष्ठ नेतृत्वाकडे केली होती, असं मलिक यांनी सांगितलं. आपल्याच सरकाविरोधात बोलत आहात, असं त्यांना विचारण्यात आलं. आपलं राज्यपाल पदावर प्रेम नाही. आपण मनापासून बोलतो आणि आता आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जायचं आहे, असं मलिक बोलले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
दंडाधिकाऱ्यांचंही डोकं फुटू शकतं आणि त्यांच्यावर असलेल्यांचंही फुटू शकतं. मुख्यमंत्री खट्टर यांच्या इशाऱ्याशिवाय शेतकऱ्यांवर लाठीमार होणं शक्य नाही. आपल्या लोकांसाठी बोलतो. मग त्याचे परिणाम काहीही असतो, असं मलिल म्हणाले.
indian security agencied issue alerts : तालिबानसोबत जैशची बैठक; दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सुरक्षा
pm modi in mann ki baat : PM मोदी म्हणाले, 'ऑलिम्पिकचा मोठा प्रभाव, घराघरात खेळावर चर्चा'
'राकेश टिकैत देशद्रोही, तिहार तुरुंगातच टाकल्यावरच डोकं ठिकाणावर येईल'
शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गंभीर टीका केली होती. देशात सरकारी तालिबानी कमांडर आहेत, अशी टीका टिकैत यांनी केली होती. यावरून भारतीय किसान युनीयनच्या भानु गटाचे अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी राकेश टिकैत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुठल्याही सरकारला तालिबानी सरकार म्हणणं हे बौद्धीक दिवाळखोरीचं लक्षण आहे. राकेश टिकैतना वेड लागलं आहे. राकेश टिकैत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तिहार तुरुंगात टाकल्यावर टिकैत यांच डोकं ठिकाणावर येईल, असं भानु प्रताप सिंह म्हणाले.
आरोपी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) पदारवर राहण्यास पात्र नाही. तरीही हरयाणा सरकार त्यांना संरक्षण देत आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात आतापर्यंत एकूण ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण अजूनही सरकारकडून सांत्वनाचा एक शब्दही आलेला नाही. मी शेतकरी पुत्र आहे आणि त्यांच्या वेदना जाणतो, असं सत्यपाल मलिक म्हणाले.
हरयाणाचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर लाठीमार करवत आहेत. पण केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर बळाचा कुठलाही वापर केलेला नाही. शेतकरी आंदोलन पाहता बळाचा वापर करू नये, अशी मागणी आपण वरिष्ठ नेतृत्वाकडे केली होती, असं मलिक यांनी सांगितलं. आपल्याच सरकाविरोधात बोलत आहात, असं त्यांना विचारण्यात आलं. आपलं राज्यपाल पदावर प्रेम नाही. आपण मनापासून बोलतो आणि आता आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जायचं आहे, असं मलिक बोलले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
दंडाधिकाऱ्यांचंही डोकं फुटू शकतं आणि त्यांच्यावर असलेल्यांचंही फुटू शकतं. मुख्यमंत्री खट्टर यांच्या इशाऱ्याशिवाय शेतकऱ्यांवर लाठीमार होणं शक्य नाही. आपल्या लोकांसाठी बोलतो. मग त्याचे परिणाम काहीही असतो, असं मलिल म्हणाले.
indian security agencied issue alerts : तालिबानसोबत जैशची बैठक; दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सुरक्षा
pm modi in mann ki baat : PM मोदी म्हणाले, 'ऑलिम्पिकचा मोठा प्रभाव, घराघरात खेळावर चर्चा'
'राकेश टिकैत देशद्रोही, तिहार तुरुंगातच टाकल्यावरच डोकं ठिकाणावर येईल'
शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गंभीर टीका केली होती. देशात सरकारी तालिबानी कमांडर आहेत, अशी टीका टिकैत यांनी केली होती. यावरून भारतीय किसान युनीयनच्या भानु गटाचे अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी राकेश टिकैत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुठल्याही सरकारला तालिबानी सरकार म्हणणं हे बौद्धीक दिवाळखोरीचं लक्षण आहे. राकेश टिकैतना वेड लागलं आहे. राकेश टिकैत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तिहार तुरुंगात टाकल्यावर टिकैत यांच डोकं ठिकाणावर येईल, असं भानु प्रताप सिंह म्हणाले.