वृत्तसंस्था, बेंगळुरू
देशातील बहुसंख्य शांतता पाळत असून, बहुसंख्यकांनी धीर सोडू नये. तसे झाल्यास देशात गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती कर्नाटकचे पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते यू. टी. खदर यांना रवी यांनी हा इशारा दिला आहे. मंगळुरूमध्ये गुरुवारी निर्माण झालेल्या स्थितीची तुलना रवी यांनी गोध्रामधील स्थितीशी केली.
रवी म्हणाले, अल्पसंख्यकांनी त्यांच्या मानसिकतेमुळे गोध्रा शहरात आग लावली गेली. त्यांच्यामुळे कारसेवकांना जिवंत जाळले गेले. यामुळे उसळलेला हिंसाचार खदर यांनी आठवावा आणि राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यास कर्नाटक जळेल अशी प्रक्षोभक विधाने करू नयेत. बहुसंख्यकांचा धीर म्हणजे त्यांची हतबलता कृपया कुणी समजू नये, असेही रवी यांनी सांगितले आहे.