वृत्तसंस्था, चेन्नई
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदासाठी जंगजंग पछाडणाऱ्या शशिकला यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मंगळवारी सुरूंग लागला. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह आरोपी असलेल्या बेहिशेबी मालमत्ता खटल्यात शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांची कैद सुनावली. शशिकला यांना तातडीने कर्नाटक पोलिसांसमोर शरण येण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
१९ वर्षांपूर्वीच्या सुमारे ६० कोटींच्या बेहिशेबी खटल्यातील ५७० पानांच्या निकालाचा अंश न्या. पी. सी. घोष व अमिताव रॉय यांनी आठ मिनिटांत सुनावत शशिकला व त्यांचे दोन नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन व इलावरसी यांनाही दोषी धरले. मात्र जयललिता यांचे निधन झाल्याने त्यांच्याविरुद्धच्या खटल्याची प्रक्रिया वगळण्यात आली. मात्र या निकालामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार तुरुंगातून सुटका झाल्यानंतरही सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी असल्याने एकप्रकारे शशिकला यांचा राजकीय विजनवास सुरू झाला आहे.
शशिकलांचे नवे प्यादे ‘पळनीस्वामी’
निकालानंतर शशिकला यांनी अण्णाद्रमुकच्या आमदारांची बैठक घेऊन एडापड्डी पळनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. सायंकाळी त्यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.
कोण आहेत पळनीस्वामी?
शशिकला यांचे निष्ठावंत असलेल्या पळनीस्वामींकडे पन्नीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती. यापूर्वी त्यांनी महामार्ग आणि छोटी बंदरे ही मंत्रालयेही सांभाळली आहेत. तमिळनाडूतील प्रबळ अशा गौंडर समाजातील पळनीस्वामी हे सालेम जिल्ह्यातील एडाप्पाडी मतदारसंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. जयललिता रुग्णालयात असताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्वम आणि पळनीस्वामी अशी दोन नावे पुढे आली होती. पनीरसेल्वम जयललितांचे, तर पळनीस्वामी शशिकलांचे विश्वासू मानले जातात. जयललितांच्या मंत्रिमंडळात पळनीस्वामी तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते.
पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी
पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा मिळू लागल्याने शशिकला यांनी त्यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी केली. मात्र काळजीवाहू सरचिटणीस शशिकला यांना हा अधिकार नसल्याचा दावा पन्नीरसेल्वम यांनी केला आहे.
तमिळनाडूचे फासे आता राज्यपालांच्या हाती
शशिकला यांना शिक्षा झाल्याने आता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या निर्णयाकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राव आता पळनीस्वामी यांना सत्तास्थापनेची संधी देतात का, यावर शशिकला यांचे अस्तित्व अवलंबून आहे.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदासाठी जंगजंग पछाडणाऱ्या शशिकला यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मंगळवारी सुरूंग लागला. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह आरोपी असलेल्या बेहिशेबी मालमत्ता खटल्यात शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांची कैद सुनावली. शशिकला यांना तातडीने कर्नाटक पोलिसांसमोर शरण येण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
१९ वर्षांपूर्वीच्या सुमारे ६० कोटींच्या बेहिशेबी खटल्यातील ५७० पानांच्या निकालाचा अंश न्या. पी. सी. घोष व अमिताव रॉय यांनी आठ मिनिटांत सुनावत शशिकला व त्यांचे दोन नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन व इलावरसी यांनाही दोषी धरले. मात्र जयललिता यांचे निधन झाल्याने त्यांच्याविरुद्धच्या खटल्याची प्रक्रिया वगळण्यात आली. मात्र या निकालामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार तुरुंगातून सुटका झाल्यानंतरही सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी असल्याने एकप्रकारे शशिकला यांचा राजकीय विजनवास सुरू झाला आहे.
शशिकलांचे नवे प्यादे ‘पळनीस्वामी’
निकालानंतर शशिकला यांनी अण्णाद्रमुकच्या आमदारांची बैठक घेऊन एडापड्डी पळनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. सायंकाळी त्यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.
कोण आहेत पळनीस्वामी?
शशिकला यांचे निष्ठावंत असलेल्या पळनीस्वामींकडे पन्नीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती. यापूर्वी त्यांनी महामार्ग आणि छोटी बंदरे ही मंत्रालयेही सांभाळली आहेत. तमिळनाडूतील प्रबळ अशा गौंडर समाजातील पळनीस्वामी हे सालेम जिल्ह्यातील एडाप्पाडी मतदारसंघातून चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. जयललिता रुग्णालयात असताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्वम आणि पळनीस्वामी अशी दोन नावे पुढे आली होती. पनीरसेल्वम जयललितांचे, तर पळनीस्वामी शशिकलांचे विश्वासू मानले जातात. जयललितांच्या मंत्रिमंडळात पळनीस्वामी तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते.
पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी
पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा मिळू लागल्याने शशिकला यांनी त्यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी केली. मात्र काळजीवाहू सरचिटणीस शशिकला यांना हा अधिकार नसल्याचा दावा पन्नीरसेल्वम यांनी केला आहे.
तमिळनाडूचे फासे आता राज्यपालांच्या हाती
शशिकला यांना शिक्षा झाल्याने आता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या निर्णयाकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राव आता पळनीस्वामी यांना सत्तास्थापनेची संधी देतात का, यावर शशिकला यांचे अस्तित्व अवलंबून आहे.