नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची नवी दिल्लीत पत्रकार परिषद सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे निवडणुकीची तयारी आणि मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देत आहेत.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याआधी राजीव कुमार यांनी एक मोठी घोषणा केली. देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोग लोकांच्या घरी जाऊन मत घेणार आहेत. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीचे वय ८५ पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे अशा व्यक्तींच्या घरी जाऊन आयोगाचे कर्मचारी त्यांचे मत घेतली. अशा व्यक्ती फॉर्म डीच्या माध्यमातून मत देऊ शकतील.
याआधी काही विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारे मतदान घेण्यात आले होते. पण लोकसभेत प्रथम आणि संपूर्ण देशात आम्ही यावेळी ही गोष्ट करणार आहोत असे राजीव यांनी सांगितले. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत. अशा वेळी ज्यांच्या घराजवळ मतदान केंद्र आहे तेच मतदान करत नाहीत असे अनेकदा दिसून येते. अशा लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार १७व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपणार आहे. त्याच बरोबर काही विधानसभसाठी देखील निवडणुका होतील यात जम्मू्-काश्मीरचा देखील समावेश आहे. यावेळी लोकसभेसाठी ९७ कोटी मतदार पात्र आहेत. यातील १.८२ कोटी नवे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी गेल्या २ वर्षापासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याआधी राजीव कुमार यांनी एक मोठी घोषणा केली. देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोग लोकांच्या घरी जाऊन मत घेणार आहेत. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीचे वय ८५ पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे अशा व्यक्तींच्या घरी जाऊन आयोगाचे कर्मचारी त्यांचे मत घेतली. अशा व्यक्ती फॉर्म डीच्या माध्यमातून मत देऊ शकतील.
याआधी काही विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारे मतदान घेण्यात आले होते. पण लोकसभेत प्रथम आणि संपूर्ण देशात आम्ही यावेळी ही गोष्ट करणार आहोत असे राजीव यांनी सांगितले. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत. अशा वेळी ज्यांच्या घराजवळ मतदान केंद्र आहे तेच मतदान करत नाहीत असे अनेकदा दिसून येते. अशा लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार १७व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपणार आहे. त्याच बरोबर काही विधानसभसाठी देखील निवडणुका होतील यात जम्मू्-काश्मीरचा देखील समावेश आहे. यावेळी लोकसभेसाठी ९७ कोटी मतदार पात्र आहेत. यातील १.८२ कोटी नवे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी गेल्या २ वर्षापासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.