म.टा.प्रतिनिधी,नगर
‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ या योजनेत १५ डिसेंबरअखेर नगर जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या अख्यारितील ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९२.५५ टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने या माहितीबद्दल संभ्रम निर्माण होत आहे.
पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी खड्डेमुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यभरात मोहीम हाती घेण्यात आली. १५ डिसेंबर ही यासाठी शेवटची तारीख ठरविण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी पाटील यांनी राज्यातील खड्ड्यांची स्थिती जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यात ४५५६ किलोमीटर लांबीचे राज्य व जिल्हा मार्ग असून त्यावर ३५५९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. खासगीकरणातून २७८ किलोमीटरचा रस्ता असून त्यावर ५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. यातील सर्व मिळून ९२.५५ टक्के खड्डे शुक्रवारअखेरपर्यंत बुजविण्यात आले असून अन्य खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
ही मोहीम केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांसाठी होती. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
बायपास खड्डेयुक्तच
नगरच्या बायपासवरील खड्डे ही प्रमुख समस्या मात्र, सुटलेली नाही. यासाठी अनेक आंदोलने झाली, घोषणा झाल्या प्रत्यक्षात काम झाले नाही. विशेष म्हणजे या रस्त्याच्या हस्तांतराच्या प्रश्नामुळे खड्डेमुक्त अभियानातही याचे काम होऊ शकले नाही. या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी तो केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचे घाटत आहे. त्यामुळे या अभियानात त्यावर काम झाले नसल्याने जिल्हा खड्डेमुक्त झाला तरी बायपास मात्र खड्डेयुक्तच राहणार आहे. यासंबंधी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खड्डेमुक्त बायपास समितीतर्फे शनिवारी दुपारी तीन वाजता नगरच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे.
‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’ या योजनेत १५ डिसेंबरअखेर नगर जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या अख्यारितील ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९२.५५ टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने या माहितीबद्दल संभ्रम निर्माण होत आहे.
पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी खड्डेमुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यभरात मोहीम हाती घेण्यात आली. १५ डिसेंबर ही यासाठी शेवटची तारीख ठरविण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी पाटील यांनी राज्यातील खड्ड्यांची स्थिती जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यात ४५५६ किलोमीटर लांबीचे राज्य व जिल्हा मार्ग असून त्यावर ३५५९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. खासगीकरणातून २७८ किलोमीटरचा रस्ता असून त्यावर ५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. यातील सर्व मिळून ९२.५५ टक्के खड्डे शुक्रवारअखेरपर्यंत बुजविण्यात आले असून अन्य खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
ही मोहीम केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांसाठी होती. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती यांच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
बायपास खड्डेयुक्तच
नगरच्या बायपासवरील खड्डे ही प्रमुख समस्या मात्र, सुटलेली नाही. यासाठी अनेक आंदोलने झाली, घोषणा झाल्या प्रत्यक्षात काम झाले नाही. विशेष म्हणजे या रस्त्याच्या हस्तांतराच्या प्रश्नामुळे खड्डेमुक्त अभियानातही याचे काम होऊ शकले नाही. या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी तो केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचे घाटत आहे. त्यामुळे या अभियानात त्यावर काम झाले नसल्याने जिल्हा खड्डेमुक्त झाला तरी बायपास मात्र खड्डेयुक्तच राहणार आहे. यासंबंधी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खड्डेमुक्त बायपास समितीतर्फे शनिवारी दुपारी तीन वाजता नगरच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे.