म. टा. प्रतिनिधी, नगर
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेली थंडीची लाट अद्याप कायम असून आता दिवसाचे तापमानही घटले आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असून थंडीमुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. आणखी काही दिवस थंडी राहण्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहेत.
गेल्या आठवड्यापासून नगरचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. एकदा ते ४ अशांपर्यंत खाली येऊन विक्रमही नोंदला गेला. उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी सुरूच आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांनी इथपर्यंत थंडी आणली आहे. त्यामुळे आता दिवसाचे तापमानही घसरले आहे. जानेवारी महिन्यात कमाल तापमान सरासरी ३१ ते ३२ असते. बुधवारी आणि गुरुवारी ते घसरून २७ अंशापर्यंत खाली आले आहे. तर किमान तापमान ६ अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा झोंबरणारा गारठा असे हवामान आहे. त्यामुळे भरदुपारीही उबदार कपडे घालून बसावे लागत आहे.
या हवामानाचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. याबद्दल माहिती देताना येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एस. एस. दीपक यांनी सांगितले की, 'या बोचऱ्या थंडीमुळे निमोनियासारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे. उबदार कपडे घातल्याशिवाय थंडीत जाऊ नये. थंडीचा हृदयावरही परिणाम होत असल्याची निरीक्षणे आहेत. त्यामुळे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी आणि पातळ पदार्थांचे सेवन करावे. खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे आढळतात, डॉक्टरांना भेटून शंका निरसन करून घ्यावे. थंडीचा त्वचेशी आणि कान, नाक, डोळे यांच्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.'
थंडीचा पिकांवरही विपरित परिणाम होत आहे. यासंबंधी पुण्यातील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, तापमान आठ अंश सेल्सिअसच्या खाली आल्यानंतर पिकांना अपायकारक ठरू शकते. द्राक्ष, केळी आणि अन्य फळ पिकांनाही अपाय होऊ शकतो. पहाटे ४ ते ६ ही वेळ पिकांसाठी धोकादायक असते. त्यामुळे या काळात फळबागांजवळ शेकोट्या पेटविल्यास धोका कमी करता येईल.
रात्री बागांना पाणी देऊन ठेवण्याचाही उपयोग होऊ शकतो. याशिवाय कोंबडीपालन आणि दुग्ध व्यवसायिकांनीही काळजी घ्यावी. कोंबड्या आणि जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल अशा शेडमध्ये ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेली थंडीची लाट अद्याप कायम असून आता दिवसाचे तापमानही घटले आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असून थंडीमुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. आणखी काही दिवस थंडी राहण्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहेत.
गेल्या आठवड्यापासून नगरचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. एकदा ते ४ अशांपर्यंत खाली येऊन विक्रमही नोंदला गेला. उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी सुरूच आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांनी इथपर्यंत थंडी आणली आहे. त्यामुळे आता दिवसाचे तापमानही घसरले आहे. जानेवारी महिन्यात कमाल तापमान सरासरी ३१ ते ३२ असते. बुधवारी आणि गुरुवारी ते घसरून २७ अंशापर्यंत खाली आले आहे. तर किमान तापमान ६ अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा झोंबरणारा गारठा असे हवामान आहे. त्यामुळे भरदुपारीही उबदार कपडे घालून बसावे लागत आहे.
या हवामानाचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. याबद्दल माहिती देताना येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एस. एस. दीपक यांनी सांगितले की, 'या बोचऱ्या थंडीमुळे निमोनियासारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे. उबदार कपडे घातल्याशिवाय थंडीत जाऊ नये. थंडीचा हृदयावरही परिणाम होत असल्याची निरीक्षणे आहेत. त्यामुळे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी आणि पातळ पदार्थांचे सेवन करावे. खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे आढळतात, डॉक्टरांना भेटून शंका निरसन करून घ्यावे. थंडीचा त्वचेशी आणि कान, नाक, डोळे यांच्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.'
थंडीचा पिकांवरही विपरित परिणाम होत आहे. यासंबंधी पुण्यातील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, तापमान आठ अंश सेल्सिअसच्या खाली आल्यानंतर पिकांना अपायकारक ठरू शकते. द्राक्ष, केळी आणि अन्य फळ पिकांनाही अपाय होऊ शकतो. पहाटे ४ ते ६ ही वेळ पिकांसाठी धोकादायक असते. त्यामुळे या काळात फळबागांजवळ शेकोट्या पेटविल्यास धोका कमी करता येईल.
रात्री बागांना पाणी देऊन ठेवण्याचाही उपयोग होऊ शकतो. याशिवाय कोंबडीपालन आणि दुग्ध व्यवसायिकांनीही काळजी घ्यावी. कोंबड्या आणि जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल अशा शेडमध्ये ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.