म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नसभारंभात होणारी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्न बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एका लग्नसमारंभात अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. भोजनप्रसंगी कार्यकर्त्यांनी, ‘ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवे तेवढेच वाढून घ्यावे’ अशा पाट्या हाती घेऊन उपस्थितांचे प्रबोधन केले. त्यास वऱ्हाडमंडळीकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
लग्नकार्य, अन्य कार्यक्रमांत अनेकदा मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. गरजेपेक्षा अन्न ताटात घेतले जाते व नंतर ते उष्टे अन्न फेकून देण्याची वेळ येते. दुसरीकडे अनेक गरजूंना एक वेळचे पोटभर अन्न मिळत नाही. या पार्श्वभूमीवर अन्न बचाव समिती गेल्या काही वर्षांपासून कार्य करत आहेत. लग्नकार्यातील उरलेले अन्न गरजूंपर्यंत पोचविण्याचे काम समिती रोटी बँकेच्या माध्यमातूनही करत आहे.
समर्थ नगर येथील वरद विनायक मंगल कार्यालयात धर्माधिकारी यांच्या मुलीचे लग्न होते. समितीचे प्रमुख अनंत मोताळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधत उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी होकार देताच कार्यकर्ते कामाला लागले. विवाहसोहळ्याला मोठ्या संख्येने वऱ्हाडमंडळी, पाहुणे उपस्थित होते. लग्न लागल्यानंतर वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर जेवणावळी सुरू झाल्या. त्यावेळी मोताळे यांच्यासह राजेंद्र वाहुळे, रुपाली वाहुळे, किरण शर्मा आदी कार्यकर्त्यांनी हातात घेतल्या पाट्याकडे साऱ्यांचाचे लक्ष वेधल्या गेले. ‘ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवे तेवढेच वाढून घ्यावे’ असा संदेश देत या कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
उपस्थितांचा प्रतिसाद
त्याला वऱ्हाडींनी मोठा प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील काही लोकांनी गावी असा उपक्रम राबविला जाईल, असा शब्दाही समितीला दिल्याचे मोताळे यांनी सांगितले. काही तरुणांनी, ‘ताटात अन्न उष्टे टाकले नाही, हवे तेवढेच घेतले,’ असे सांगत समितीच्या स्वयंसेवकांसोबत सेल्फी काढून त्याचा पुरावाही दिल्याचे मोताळे यांनी सांगितले. लग्नसराई सुरू झाल्याने अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
लग्नसभारंभात होणारी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्न बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एका लग्नसमारंभात अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. भोजनप्रसंगी कार्यकर्त्यांनी, ‘ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवे तेवढेच वाढून घ्यावे’ अशा पाट्या हाती घेऊन उपस्थितांचे प्रबोधन केले. त्यास वऱ्हाडमंडळीकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
लग्नकार्य, अन्य कार्यक्रमांत अनेकदा मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. गरजेपेक्षा अन्न ताटात घेतले जाते व नंतर ते उष्टे अन्न फेकून देण्याची वेळ येते. दुसरीकडे अनेक गरजूंना एक वेळचे पोटभर अन्न मिळत नाही. या पार्श्वभूमीवर अन्न बचाव समिती गेल्या काही वर्षांपासून कार्य करत आहेत. लग्नकार्यातील उरलेले अन्न गरजूंपर्यंत पोचविण्याचे काम समिती रोटी बँकेच्या माध्यमातूनही करत आहे.
समर्थ नगर येथील वरद विनायक मंगल कार्यालयात धर्माधिकारी यांच्या मुलीचे लग्न होते. समितीचे प्रमुख अनंत मोताळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधत उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी होकार देताच कार्यकर्ते कामाला लागले. विवाहसोहळ्याला मोठ्या संख्येने वऱ्हाडमंडळी, पाहुणे उपस्थित होते. लग्न लागल्यानंतर वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर जेवणावळी सुरू झाल्या. त्यावेळी मोताळे यांच्यासह राजेंद्र वाहुळे, रुपाली वाहुळे, किरण शर्मा आदी कार्यकर्त्यांनी हातात घेतल्या पाट्याकडे साऱ्यांचाचे लक्ष वेधल्या गेले. ‘ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवे तेवढेच वाढून घ्यावे’ असा संदेश देत या कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
उपस्थितांचा प्रतिसाद
त्याला वऱ्हाडींनी मोठा प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील काही लोकांनी गावी असा उपक्रम राबविला जाईल, असा शब्दाही समितीला दिल्याचे मोताळे यांनी सांगितले. काही तरुणांनी, ‘ताटात अन्न उष्टे टाकले नाही, हवे तेवढेच घेतले,’ असे सांगत समितीच्या स्वयंसेवकांसोबत सेल्फी काढून त्याचा पुरावाही दिल्याचे मोताळे यांनी सांगितले. लग्नसराई सुरू झाल्याने अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.