म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेवराई (तांडा) येथील डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेजातील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी चौकशी केली. कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना शनिवारी विभागात बोलावून शिवणकर यांनी घडलेला प्रकार ऐकला. दोघांचे लेखी जबाब घेतले असून कारवाईचा अहवाल संस्थेला पाठवण्यात येणार आहे.
डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेजातील द्वितीय वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांना प्राचार्य विकास राजूरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 'फार्मासिटीक्स' विषयाचे प्रात्यक्षिक न करता विद्यार्थी मैदानावर बसल्यामुळे प्राचार्य राजूरकर यांनी तिघांना केबिनमध्ये बोलावून मारहाण केली. लॅबमध्ये संबंधित विषयाचे प्रा. विनायक मुंडे आले नसल्यामुळे मैदानावर बसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. चापट -बुक्क्याने मारहाण केल्यामुळे एका विद्यार्थ्याचे नाक फुटले, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी घटनेची तातडीने दखल घेतली. घटनाक्रमाचा अहवाल घेऊन प्राचार्य राजूरकर यांना कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. या चौकशी दरम्यान पीडित विद्यार्थी उपस्थित होते. दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर शिवणकर यांनी लेखी जबाब घेतला. या चौकशीतही मारहाण केली नसल्याचे प्राचार्य राजूरकर यांनी सांगितले. मात्र विद्यार्थी खोटे बोलणार नाहीत. केवळ तास बुडवला म्हणून विद्यार्थ्यांना बुटाने मारणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना मारहाण का करता' असा सवाल शिवणकर यांनी प्राचार्यांना केला. यावेळी पीडित विद्यार्थ्यांनी अॅप्रनवरील रक्ताचे डाग दाखवले. 'प्राचार्यांची नियुक्ती संबंधित संस्थेने केली असून संस्थेला कारवाईचा अधिकार आहे. चौकशी अहवाल संस्थेकडे पाठवणार आहे. घडलेला प्रकार वाईट आहे' असे डॉ. शिवणकर यांनी 'मटा'ला सांगितले.
'अभाविप'चे निवेदन
डॉ. वेदप्रकाश पाटील कॉलेजचे संबंधित विद्यार्थी व प्राचार्य यांचा चौकशी सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी संघटनेने डॉ. शिवणकर यांना निवेदन देण्यात आले. प्राचार्यांवर कडक कारवाई करावी, विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये असे निवेदनात म्हटेल आहे. अन्यथा, संघटना तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक गोविंद देशपांडे, भानुदास दोबाले, गजानन वाबळे, सुबोध सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.
गेवराई (तांडा) येथील डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेजातील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी चौकशी केली. कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना शनिवारी विभागात बोलावून शिवणकर यांनी घडलेला प्रकार ऐकला. दोघांचे लेखी जबाब घेतले असून कारवाईचा अहवाल संस्थेला पाठवण्यात येणार आहे.
डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेजातील द्वितीय वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांना प्राचार्य विकास राजूरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 'फार्मासिटीक्स' विषयाचे प्रात्यक्षिक न करता विद्यार्थी मैदानावर बसल्यामुळे प्राचार्य राजूरकर यांनी तिघांना केबिनमध्ये बोलावून मारहाण केली. लॅबमध्ये संबंधित विषयाचे प्रा. विनायक मुंडे आले नसल्यामुळे मैदानावर बसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. चापट -बुक्क्याने मारहाण केल्यामुळे एका विद्यार्थ्याचे नाक फुटले, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी घटनेची तातडीने दखल घेतली. घटनाक्रमाचा अहवाल घेऊन प्राचार्य राजूरकर यांना कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. या चौकशी दरम्यान पीडित विद्यार्थी उपस्थित होते. दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर शिवणकर यांनी लेखी जबाब घेतला. या चौकशीतही मारहाण केली नसल्याचे प्राचार्य राजूरकर यांनी सांगितले. मात्र विद्यार्थी खोटे बोलणार नाहीत. केवळ तास बुडवला म्हणून विद्यार्थ्यांना बुटाने मारणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना मारहाण का करता' असा सवाल शिवणकर यांनी प्राचार्यांना केला. यावेळी पीडित विद्यार्थ्यांनी अॅप्रनवरील रक्ताचे डाग दाखवले. 'प्राचार्यांची नियुक्ती संबंधित संस्थेने केली असून संस्थेला कारवाईचा अधिकार आहे. चौकशी अहवाल संस्थेकडे पाठवणार आहे. घडलेला प्रकार वाईट आहे' असे डॉ. शिवणकर यांनी 'मटा'ला सांगितले.
'अभाविप'चे निवेदन
डॉ. वेदप्रकाश पाटील कॉलेजचे संबंधित विद्यार्थी व प्राचार्य यांचा चौकशी सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी संघटनेने डॉ. शिवणकर यांना निवेदन देण्यात आले. प्राचार्यांवर कडक कारवाई करावी, विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये असे निवेदनात म्हटेल आहे. अन्यथा, संघटना तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक गोविंद देशपांडे, भानुदास दोबाले, गजानन वाबळे, सुबोध सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.