यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा पहिल्याच आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, जळगावचा पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे महावितरणनेही तब्बल चार-चार तास वीजपुरवठा खंडित केल्याने जळगावकर हैराण झाले आहेत.
Maharashtra Times4 May 2016, 4:00 am
उन्हाच्या झळा तीव्र, शहरात तापमानाचा पारा ४४ अंशांवर; उकाड्याने नागरिक त्रस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉमजळगावकरांना मे हीटचा तडाखा
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा पहिल्याच आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, जळगावचा पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे महावितरणनेही तब्बल चार-चार तास वीजपुरवठा खंडित केल्याने जळगावकर हैराण झाले आहेत.
यंदा हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा तीव्र असून, दिवसेंदिवस तापणाऱ्या उन्हांमुळे शहरामध्ये राहणे अनेकांना नकोसे झाले आहे. जळगावच्या पाऱ्याने मंगळवारी ४४ अंश तापमान गाठले होते. अजून मे महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू झाला आहे. त्यात ही अवस्था आहे, पुढे अजून परिस्थिती बिकट होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अजुन दोन-तीन आठवडे उन्हाची तीव्रता जाणवणार आहे. जबरदस्त उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जळगावकरांना एकीकडे पावासाची प्रतीक्षा आहे. शहरातील नेहमी गजबजणारे रस्ते सध्या ओस पडले आहेत. सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. तसेच किमान तापमानातदेखील वाढ झाल्याने रात्री प्रचंड उकाळा जाणवतो आहे. तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्णतेची लाट असल्याचा अनुभव जळगावकर सध्या घेत आहेत.
महावितरणचा ‘शॉक’ दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उकाळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील विविध भागात पाच-पाच तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना महावितरणकडून लोडशेडींगचा शॉक बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दुपारच्या वेळेस घरी पंख्याशिवाय थांबणे कठीण आहे. त्याचवेळी वीजपुरवठा खंडित असल्याने त्यांना बाहेर निघणे कठीण होत आहे.
तापमान कायम राहणार
तसेच अजून दोन आठवडे तरी हेच तापमान कायम राहणार आहे. त्यामुळे मान्सुनपूर्व पाऊस झाल्यास उकाळ्यात काही प्रमाणात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो, अशी माहिती हवामान तज्ज्ञ अजय कुमार यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. तसेच पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता ‘स्कायमेट’ या हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान जैन हिल्स येथील हवामान खात्याकडून घेण्यात आलेल्या तापमानाच्या आधारे जळगाव शहराचे कमाल तापमान मंगळवारी ४४ अंश तर किमान २८ अंश इतके होते. त्यामुळे यंदाच्या हंगामातील हे सार्वाधिक तापमान असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.