कोल्हापूर टाइम्स टीम
अपंगांना स्वावलंबीपणे जगता यावे तसेच त्यांना विनाअडथळा वातावरण मिळावे यासाठी कृत्रिम साधनांसह अवयवरोपणासाठी प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची सुगम्य योजना आहे. मात्र ही योजना केवळ कागदावरच असून गेल्या दोन वर्षांपासून कृत्रिम साधनांच्या मागणीचा प्रस्ताव बारगळला आहे. सरकारकडून अपंगांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वदिनी अपंगांनी जिल्हा प्रशासनकडे रांगत व्यथा मांडल्या. कृत्रिम साधनांच्या पुरवठ्यासंदर्भातील प्रस्ताव मार्गी लागले नाहीत तर आमच्यावर रांगण्याचीच वेळ येणार आहे का? असा सवाल उपस्थित करत अपंगांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. शुक्रवारी दुपारी भर उन्हात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास अपंग व्यक्ती एकत्र आल्या. कृत्रिम साधने तातडीने मिळाली पाहिजेत, अवयवरोपणासाठी प्राधान्याने अस्थिव्यंग अपंगांचा विचार झाला पाहिजे, अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या अपंगांनी आपल्या कृत्रिम साधनांना जमिनीवर ठेवले आणि भर दुपारी तापलेल्या रस्त्यावरून अपंग बांधव रांगत गेटच्या आत आले.
प्रहार संघटनेच्यावतीने देवदत्त माने, शर्मिली इनामदार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रांगतच निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या कक्षापर्यंत आंदोलन केले. शिंदे यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले. लवकरात लवकर अपंगांच्या कृत्रिम साधनांची प्रस्तावित यादी मार्गी लावली जाईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
असे वेधले लक्ष
अपंगांच्या आंदोलनावेळीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचेही आंदोलन होते. दरम्यान आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी अपंगांशी संपर्क साधून रांगत न येण्याची विनंती केली होती. मात्र अपंग आंदोलक रांगत येऊन निवेदन देण्यावर ठाम होते. दरम्यान पोलिसांकडून आंदोलनाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर गनिमी कावा करून अपंगांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले.
अपंगांना स्वावलंबीपणे जगता यावे तसेच त्यांना विनाअडथळा वातावरण मिळावे यासाठी कृत्रिम साधनांसह अवयवरोपणासाठी प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची सुगम्य योजना आहे. मात्र ही योजना केवळ कागदावरच असून गेल्या दोन वर्षांपासून कृत्रिम साधनांच्या मागणीचा प्रस्ताव बारगळला आहे. सरकारकडून अपंगांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वदिनी अपंगांनी जिल्हा प्रशासनकडे रांगत व्यथा मांडल्या. कृत्रिम साधनांच्या पुरवठ्यासंदर्भातील प्रस्ताव मार्गी लागले नाहीत तर आमच्यावर रांगण्याचीच वेळ येणार आहे का? असा सवाल उपस्थित करत अपंगांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. शुक्रवारी दुपारी भर उन्हात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास अपंग व्यक्ती एकत्र आल्या. कृत्रिम साधने तातडीने मिळाली पाहिजेत, अवयवरोपणासाठी प्राधान्याने अस्थिव्यंग अपंगांचा विचार झाला पाहिजे, अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या अपंगांनी आपल्या कृत्रिम साधनांना जमिनीवर ठेवले आणि भर दुपारी तापलेल्या रस्त्यावरून अपंग बांधव रांगत गेटच्या आत आले.
प्रहार संघटनेच्यावतीने देवदत्त माने, शर्मिली इनामदार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रांगतच निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या कक्षापर्यंत आंदोलन केले. शिंदे यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले. लवकरात लवकर अपंगांच्या कृत्रिम साधनांची प्रस्तावित यादी मार्गी लावली जाईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
असे वेधले लक्ष
अपंगांच्या आंदोलनावेळीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचेही आंदोलन होते. दरम्यान आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी अपंगांशी संपर्क साधून रांगत न येण्याची विनंती केली होती. मात्र अपंग आंदोलक रांगत येऊन निवेदन देण्यावर ठाम होते. दरम्यान पोलिसांकडून आंदोलनाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर गनिमी कावा करून अपंगांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले.