कोल्हापूर: गेल्या दहा वर्षात यंदा प्रथमच साखर उद्योगाला अच्छे दिन आले आहेत. साखर आणि इथेनॉलचे भाव वाढल्याने यंदा ऊसाला चांगला दर देणे कारखान्यांना शक्य होणार आहे. यामुळे चांगला दर देतानाच एकरकमी एफआरपी देण्यासाठी घोषणा करण्याची दक्षिण महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात स्पर्धाच सुरू झाली आहे. एकमेकांवर कुरघोडी करत दर जाहीर केले जात असल्याने राजकीय वातावरण तापत आहे. ऊसाला एकरकमी एफआरपी न देता ती तीन तुकड्यात द्यावी अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली. त्याला विरोध झाल्याने केंद्राने हात झटकत आपला याच्याशी काही संबंध नाही असे म्हणत एफआरपी एकरकमी देण्याचे निर्देश दिले. मुळात ही रक्कम एकरकमी देण्यास कारखानदारांचा विरोध होता. पण सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने ती देणे बंधनकारक आहे. शिवाय केंद्रानेही अचानक हात वर केल्याने कारखानदारांना दर जाहीर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण या निमित्ताने सध्या महाविकास आघाडी व भाजप नेत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. दराच्या घोषणेत भाजपने आघाडी घेताच महाविकास आघाडीचे नेते खडबडून जागे झाले. सर्वांनी दोन तीन दिवसात धडाधड एफआरपी बाबत घोषणा सुरू केली. सर्वाधिक दर देण्यात दुधगंगा वेदगंगा कारखाना पुढे आहे. या कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी यंदा टनाला ३०५६ रुपये दर जाहीर केला आहे. हा कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरकेही मैदानात उतरले. त्यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ चा नारा दिला. तीन पक्षाच्या नेत्यांनी दराची घोषणा करताच सर्वांनी एकापाठोपाठ एक असे करत आपआपले दर जाहीर केले.
कारखाने एकीकडे दर जाहीर करताना सर्वाधिक दर हा ३०५६ आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ३३०० रुपये दर मागितला आहे. याशिवाय साखरेचा दर पाहून आणखी दर मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या जाहीर केलेला दर त्यांच्या मागणीनुसार नाही. यातून कारखानदार व संघटना यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. तरीही सध्या जो दर जाहीर झाला आहे, तो चांगला असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या हातात नोटांचा पाऊस पडणार आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मात्र यंदा संकटाला सामोरे जावे लागेल. कारण दहा वर्षांत प्रथमच ऊसाला सोन्याचा भाव आला असताना यावेळी पुराने बराच ऊस कुजून गेला आहे. हे सारे असले तरी गेल्या आठ दिवसांत जाहीर होत असलेल्या दरामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केलेले दर
दुधगंगा वेदगंगा साखर कारखाना - ३०५६
भोगावती सहकारी साखर कारखाना - ३००३
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना - ३०४५
छत्रपती राजाराम कारखाना - २८४०
दत्त सहकारी साखर कारखाना - २९००
जवाहर सहकारी साखर कारखाना - २८६१
सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना - २९६९
शरद सहकारी साखर कारखाना - ३०२८
तात्यासाहेब कोरे साखर कारखाना - २९७८
डी. वाय. पाटील साखर कारखाना - २९४५
संताजी घोरपडे कारखाना - २८५१
कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. दराच्या घोषणेत भाजपने आघाडी घेताच महाविकास आघाडीचे नेते खडबडून जागे झाले. सर्वांनी दोन तीन दिवसात धडाधड एफआरपी बाबत घोषणा सुरू केली. सर्वाधिक दर देण्यात दुधगंगा वेदगंगा कारखाना पुढे आहे. या कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी यंदा टनाला ३०५६ रुपये दर जाहीर केला आहे. हा कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरकेही मैदानात उतरले. त्यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ चा नारा दिला. तीन पक्षाच्या नेत्यांनी दराची घोषणा करताच सर्वांनी एकापाठोपाठ एक असे करत आपआपले दर जाहीर केले.
कारखाने एकीकडे दर जाहीर करताना सर्वाधिक दर हा ३०५६ आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ३३०० रुपये दर मागितला आहे. याशिवाय साखरेचा दर पाहून आणखी दर मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या जाहीर केलेला दर त्यांच्या मागणीनुसार नाही. यातून कारखानदार व संघटना यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. तरीही सध्या जो दर जाहीर झाला आहे, तो चांगला असल्याने यंदा शेतकऱ्यांच्या हातात नोटांचा पाऊस पडणार आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मात्र यंदा संकटाला सामोरे जावे लागेल. कारण दहा वर्षांत प्रथमच ऊसाला सोन्याचा भाव आला असताना यावेळी पुराने बराच ऊस कुजून गेला आहे. हे सारे असले तरी गेल्या आठ दिवसांत जाहीर होत असलेल्या दरामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केलेले दर
दुधगंगा वेदगंगा साखर कारखाना - ३०५६
भोगावती सहकारी साखर कारखाना - ३००३
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना - ३०४५
छत्रपती राजाराम कारखाना - २८४०
दत्त सहकारी साखर कारखाना - २९००
जवाहर सहकारी साखर कारखाना - २८६१
सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना - २९६९
शरद सहकारी साखर कारखाना - ३०२८
तात्यासाहेब कोरे साखर कारखाना - २९७८
डी. वाय. पाटील साखर कारखाना - २९४५
संताजी घोरपडे कारखाना - २८५१