म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीत युतीला रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आघाडी केल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरून नेत्यांनाच आव्हान दिले आहे. शरद पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, शनिवारी आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कडक शब्दांत सूचना दिल्या. काँग्रेसमधील बंडखोरांसाठी ते सोनिया गांधींशीही चर्चा करणार आहेत.
वाचा: केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: पवार
विधानसभा निवडणुकीत खासदार शरद पवार हे आघाडीच्या नेतृत्वाची धुरा एकहाती सांभाळत आहेत. युतीला रोखण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी चर्चा करून आघाडीची मोट बांधली. यासाठी जागावाटपात काही ठिकाणी तडजोडीचीही भूमिका स्वीकारली. ते स्वत: दिवस-रात्र प्रचारात व्यग्र आहेत. आघाडीला तरुणांचा प्रतिसाद वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांनी उसळी घेतल्याने पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. शुक्रवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीच्या बंडखोरांबाबत पवार यांच्याकडे तक्रार केली होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील आमदार भारत भालके यांनीही कॉँग्रेसच्या नेत्यांसोबत तक्रार केली होती. याबाबत पवार यांनी शनिवारी सकाळी आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बंडखोरांना रोखण्याच्या सूचना केल्या. आघाडीतील प्रत्येक नेत्याने त्यांच्या जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालावी, असे त्यांनी सांगितले. जे आघाडीसोबत राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यासाठी स्वत: सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
वाचा: युतीचे सरकार जनताच उलथवेलः शरद पवार
राज्यात आघाडीच्या बंडखोरांची यादीच त्यांनी मागवून घेतली आहे. त्यांना वैयक्तिक फोन करून माघार घेण्याचे आवाहन केले जात आहे. शिरोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बंडखोरीची गंभीर दखल त्यांनी घेतली. त्यांनी स्वत: बैठकीतूनच यड्रावकर यांना फोन लावला. मात्र, यड्रावकरांशी संपर्क झाला नाही. त्यांना निरोप पोहोचवून माघार घेण्यास सांगितले जाईल. यानंतरही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास पक्षाकडून कारवाई होईल. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारासोबत राहतील, असे त्यांनी माजी खासदार शेट्टी यांना सांगितले. काही अपक्षांना भाजपची अप्रत्यक्ष मदत मिळण्याची शक्यता असल्याने आशा अपक्षांवरही नजर ठेवण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले.
विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर
विधानसभा निवडणुकीत युतीला रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आघाडी केल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरून नेत्यांनाच आव्हान दिले आहे. शरद पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, शनिवारी आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कडक शब्दांत सूचना दिल्या. काँग्रेसमधील बंडखोरांसाठी ते सोनिया गांधींशीही चर्चा करणार आहेत.
वाचा: केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: पवार
विधानसभा निवडणुकीत खासदार शरद पवार हे आघाडीच्या नेतृत्वाची धुरा एकहाती सांभाळत आहेत. युतीला रोखण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी चर्चा करून आघाडीची मोट बांधली. यासाठी जागावाटपात काही ठिकाणी तडजोडीचीही भूमिका स्वीकारली. ते स्वत: दिवस-रात्र प्रचारात व्यग्र आहेत. आघाडीला तरुणांचा प्रतिसाद वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांनी उसळी घेतल्याने पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. शुक्रवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीच्या बंडखोरांबाबत पवार यांच्याकडे तक्रार केली होती. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील आमदार भारत भालके यांनीही कॉँग्रेसच्या नेत्यांसोबत तक्रार केली होती. याबाबत पवार यांनी शनिवारी सकाळी आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बंडखोरांना रोखण्याच्या सूचना केल्या. आघाडीतील प्रत्येक नेत्याने त्यांच्या जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालावी, असे त्यांनी सांगितले. जे आघाडीसोबत राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यासाठी स्वत: सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
वाचा: युतीचे सरकार जनताच उलथवेलः शरद पवार
राज्यात आघाडीच्या बंडखोरांची यादीच त्यांनी मागवून घेतली आहे. त्यांना वैयक्तिक फोन करून माघार घेण्याचे आवाहन केले जात आहे. शिरोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बंडखोरीची गंभीर दखल त्यांनी घेतली. त्यांनी स्वत: बैठकीतूनच यड्रावकर यांना फोन लावला. मात्र, यड्रावकरांशी संपर्क झाला नाही. त्यांना निरोप पोहोचवून माघार घेण्यास सांगितले जाईल. यानंतरही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास पक्षाकडून कारवाई होईल. राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारासोबत राहतील, असे त्यांनी माजी खासदार शेट्टी यांना सांगितले. काही अपक्षांना भाजपची अप्रत्यक्ष मदत मिळण्याची शक्यता असल्याने आशा अपक्षांवरही नजर ठेवण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केले.
विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर