उसाची एफआरपी रक्कम न दिल्याप्रकारणी १४ कारखान्यांना नोटिसा पाठविल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकाकडून दुसऱ्या टप्प्यात २२ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १४ कारखान्यांना दिलेल्या नोटिसांप्रकरणी मंगळवारी (ता. १८) सुनावणी होणार आहे.
Maharashtra Times18 Dec 2018, 2:05 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम२२ कारखान्यांना नोटिसा
उसाची एफआरपी रक्कम न दिल्याप्रकारणी १४ कारखान्यांना नोटिसा पाठविल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकाकडून दुसऱ्या टप्प्यात २२ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १४ कारखान्यांना दिलेल्या नोटिसांप्रकरणी मंगळवारी (ता. १८) सुनावणी होणार आहे. सुनावणीत एफआरपीची रक्कम दिल्याचा अहवाल कारखान्यांना द्यावा लागणार आहे. सांगलीतील एका कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा केली आहे.
कोल्हापूर विभागात ३७ कारखाने असून ७५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीनुसार उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा कायदा आहे. पण हा कायद्याचे पालन न केल्याने १४ डिसेंबर रोजी प्रादेशिक साखर संचालकांनी १४ कारखान्यांना नोटिसा बजावल्या. त्यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी सात कारखाने आहेत. या कारखान्यांनी थकीत एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करुन त्याचा अहवाल मंगळवारी जमा करण्याचे आदेश दिले आहे. सहसंचालक सचिन रावळ यांच्यासमोर याची मंगळवारी सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. कारखान्यांना मंगळवारी अथवा बुधवारी नोटीस पाठवण्यात येणार आहे. राज्यात १६ डिसेंबरपर्यंत ३०१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ३०८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी ३५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. प्रत्येक कारखान्याने सरासरी सव्वा लाख ते दीड लाख टन उसाचे गाळप केले असूनही एफआरपी दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव गडगडले असल्याने एफआरपी देणे अशक्य असल्याचे सांगत कारखानदारांनी हंगामाच्या सुरवातीला कारखाने बंद ठेवले होते. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात एफआरपी देण्यावर तोडगा निघाल्यानंतर कारखाने सुरू झाले. तोडग्यानुसार तब्बल एक महिना उलटूनही सांगली जिल्ह्यातील एक कारखाना वगळता एकाही कारखान्याने एफआरपी न दिल्याने साखर सहसंचालकांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर गाळप झालेले उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखान्यांना निघणार नोटिसा
कोल्हापूर : आजरा शेतकरी, भोगावती, राजाराम, नलवडे गडहिंग्जल, मंडलिक कारखाना, कुंभी कासारी, पंचगंगा, वारणा, गायकवाड बांबवडे, डी. वाय. पाटील, गुरुदत्त, इको केन, हेमरस, महाडिक शुगर, सेनापती घोरपडे, इंदिरा गांधी तांबाळे. सांगली : महाकाली, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, सर्वोदय, माणगंगा, केएन अॅग्रो, निनाईदेवी, उदगिरी शुगर.
कारखानदारांची शुक्रवारी बैठक
एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. २१) जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक बोलावण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले साखरेचे दर, त्यावर आधारित बँकाकडून मिळणारा कर्जपुरवठा याचे गणित जुळत नसल्याने एफआरपी देण्यात कारखानदारांना अडचणी येत आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठीच्या बैठकीस कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक उपस्थित राहणार आहेत.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.