शाहूपुरीतील चौथी गल्ली आणि बागल चौकातील ड्यूक कॉर्नरला झालेल्या दोन गटातील राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. दोन्ही गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दोन गटातील वादाने बागल चौक आणि शाहूपुरी परिसरातील तणाव पुन्हा वाढला आहे.
Maharashtra Times29 Nov 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉमदगडफेक प्रकरणी सातजण अटकेत
शाहूपुरीतील चौथी गल्ली आणि बागल चौकातील ड्यूक कॉर्नरला झालेल्या दोन गटातील राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. दोन्ही गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दोन गटातील वादाने बागल चौक आणि शाहूपुरी परिसरातील तणाव पुन्हा वाढला आहे.
शाहूपुरीच्या चौथ्या गल्लीतील कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या शेजारी डीडी ग्रुप आहे. बागल चौकातील ड्यूक कॉर्नर परिसरात बागल चौक मंडळ आहे. या दोन गटात गेल्या काही वर्षांपासून वर्चस्ववाद धुमसत आहे. चार दिवसांपूर्वी डीडी ग्रुपच्या काही तरुणांनी बागल चौकातील मंडळाचा लोखंडी फलक कापल्याने वादाला सुरुवात झाली. रविवारी हा वाद शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचला, मात्र परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला होता. यानंतरही हा वाद मिटला नाही. फेसबूकवरून परस्परविरोधी प्रतिक्रिया टाकल्याने सोमवारी रात्री शाहूपुरीच्या चौथ्या गल्लीत आणि बागल चौकातील ड्यूक कॉर्नरला राडा झाला होता. हल्लेखोरांनी प्रचंड दहशत माजवत दुकानांची आणि दुचाकींची मोडतोड केली होती. याबाबत मंगळवारी पहाटे शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
दत्तात्रय धोंडिराम पाटील (वय ३३, रा. ड्यूक कॉर्नर, बागल चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय पटकारे (वाड्या), प्रमोद पाटील, ओंकार पाटील, साईराज पाटील, आशिष चव्हाण, नीलेश चौगुले (सर्व रा. शाहूपुरी, ५ वी गल्ली), विजय पटकारे (रा. कदमवाडी रोड, विचारेमाळ) आणि रितेश पाटील (रा. लोहिया गल्ली, साईक्स एक्स्टेंशन) या आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन दगड आणि काचेच्या बाटल्यांसह ड्यूक कॉर्नर येथील तरुणांवर हल्ला केला होता. संजय पटकारे याने केलेल्या तलवार हल्ल्यात रोहित शिवाजी भडाळे (२३, रा. बागल चौक) हा तरुण जखमी झाला आहे.
स्नेहा शशिकांत पाटील (४१, रा. शाहूपुरी, ४ थी गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमित खत्री, संजय वाईकर, दत्ता पाटील, सचिन पाटील, संजय जाधव, सागर कारांडे (सर्व रा. बागल चौक) यांच्यासह अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्हीकडून दहशत माजवण्यासाठी तलवार, दगड आणि काचेच्या बाटल्यांचा वापर झाला. दोन गटातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पुन्हा वाद उफाळून आल्याने परिसरातील तणाव वाढला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. लवकरच हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.