म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख असल्याने दहशतवाद्यांनी कायम मुंबईला लक्ष्य केले आहे. असे दहशतवादी हल्ले थोपवण्यासाठी सर्वच सुरक्षा यंत्रणांची मदत घेतली जात आहे. नुकताच ‘आयएस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा कट उधळून लावत १० संशयितांच्या मुसक्या सुरक्षा यंत्रणांनी आवळल्या असून, या संशयिताच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून सुरक्षा यंत्रणांनी ही पाऊले उचलली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील तपास पथकांनी केलेल्या या कारवाईत १० संशयितांना देशभरातून अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीत देशात घातपात घडवण्यासाठी तीन महत्त्वाच्या संघटना प्रयत्नात असल्याचे पुढे आले.
त्यासाठी या मुलांनी दोन महिन्यात शहरातील आणि इतर राज्यात रेकी देखील केल्याची कबुली तपास अधिकाऱ्यांना दिली. प्रत्येक दहशतवादी हल्यात पंचतारांकित हॅाटेल, परदेशी नागरिक किंवा स्थानिक सुरक्षा केंद्रांना लक्ष केले जाते. त्यामुळे असे दहशतवादी हल्ले थोपवण्यासाठी फोर्स वन, एनएसजी, एटीएस, मुंबई पोलिस, क्यूआरटी आणि तपास यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे पंचतारांकित हॅाटेलची सुरक्षा, येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती, संशयित हालचाली यांवर लक्ष ठेवून असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नुकतेच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅाकड्रिलचे आयोजन केले होते. त्यामध्ये या पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख असल्याने दहशतवाद्यांनी कायम मुंबईला लक्ष्य केले आहे. असे दहशतवादी हल्ले थोपवण्यासाठी सर्वच सुरक्षा यंत्रणांची मदत घेतली जात आहे. नुकताच ‘आयएस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा कट उधळून लावत १० संशयितांच्या मुसक्या सुरक्षा यंत्रणांनी आवळल्या असून, या संशयिताच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून सुरक्षा यंत्रणांनी ही पाऊले उचलली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील तपास पथकांनी केलेल्या या कारवाईत १० संशयितांना देशभरातून अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीत देशात घातपात घडवण्यासाठी तीन महत्त्वाच्या संघटना प्रयत्नात असल्याचे पुढे आले.
त्यासाठी या मुलांनी दोन महिन्यात शहरातील आणि इतर राज्यात रेकी देखील केल्याची कबुली तपास अधिकाऱ्यांना दिली. प्रत्येक दहशतवादी हल्यात पंचतारांकित हॅाटेल, परदेशी नागरिक किंवा स्थानिक सुरक्षा केंद्रांना लक्ष केले जाते. त्यामुळे असे दहशतवादी हल्ले थोपवण्यासाठी फोर्स वन, एनएसजी, एटीएस, मुंबई पोलिस, क्यूआरटी आणि तपास यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे पंचतारांकित हॅाटेलची सुरक्षा, येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती, संशयित हालचाली यांवर लक्ष ठेवून असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नुकतेच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मॅाकड्रिलचे आयोजन केले होते. त्यामध्ये या पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.