गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठीतून विज्ञान प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेला विज्ञान प्रसारासाठी वापरलेल्या मराठी भाषेसाठी राज्य शासनाने गौरविले. यानिमित्ताने विज्ञान परिषदेची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांची विशेष मुलाखत.
प्रश्न - विज्ञान परिषदेच्या स्थापनेची नेमकी काय उद्दिष्टे होती?
उत्तर - १९५७मध्ये रशियाने स्पुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडला. तेव्हा सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. काय आहे स्पुटनिक, अवकाशात यान सोडण्यासाठी एवढा पैसा का खर्च करायचा, असे एक ना अनेक प्रश्न सामान्यांना पडत होते. त्याची उत्तरे देण्यास देशातील शास्त्रज्ञ कमी पडत होते. यानंतर १९६२मध्ये चीनसोबतच्या युद्धात रणगाडे वापरण्यात आले, ते काय आहे, त्यात कोणते तंत्रज्ञान आहे, असे प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर १९६४मध्ये लालबहादूर शास्त्री यांनी हरितक्रांतीची सुरुवात केली. मग ही हरितक्रांती कशासाठी, याने नेमके काय साध्य होणार, असे प्रश्न सामान्यांमधून विचारले जाऊ लागले. त्यावेळेस सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे देणाऱ्या एखाद्या संस्थेची गरज निर्माण झाली. तेव्हा १९६४मध्ये केरळ येथे शास्त्र परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर १९६५मध्ये मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली. यात राज्यातील शाास्त्रज्ञ, इंजिनीअर्स एकत्र आले आणि त्यांनी विज्ञानप्रसाराची सुरुवात केली.
प्रश्न - सरकारने दिलेला सन्मान संस्थेला पाच दशकांनी मिळाला. याला वेळ लागला का?
उत्तर - सरकारने विज्ञान परिषदेला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. विज्ञान संवादासाठी परिषदेने ज्या सोप्या मराठी भाषेचा वापर केला, त्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. कोणताही देश हा विज्ञानानेच समृद्ध होतो, हे आजपर्यंत अनेक उदाहरणावरून सांगता येईल. पण आपल्याकडे ते भान अजून आलेले नाही. एक पारंपरिक म्हण आहे, लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली. पण हा विचार बदलून धट्टीकट्टी श्रीमंती कशी येईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी समाजात सोप्या भाषेतून विज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक आहे.
प्रश्न - १९६५मध्ये जेव्हा तुम्ही विज्ञानप्रसाराचे काम सुरू केले, तेव्हा काय अडचणी आल्या? त्या आजही जाणवतात का?
उत्तर - त्यावेळेस आपल्या देशात अंधश्रद्धेचा विलक्षण पगडा होता. आजही तो आहे. पण त्यावेळस खूपच जास्त होता. लोकांकडे पैसा नव्हता. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे मनाला शांती मिळावी, या उद्देशाने ते कुठेतरी संत-महंतांकडे जात असत. पण ही शांती क्षणिक असते, हे पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. १९८३मध्ये आम्ही वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तयार केलेल्या स्लाइड शो काही जणांना अश्लील वाटला. यामुळे अनेक शाळांमधून आम्हाला हे शिक्षण देण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला. आता ही परिस्थिती थोडीफार बदललेली आहे. लोक आमच्याकडून या शिक्षणाच्या सीडी विकत घेऊन जाऊ लागलेत आणि मुलांना पाहायला सांगून त्यात काही अडचणी आहेत का याबाबत आम्हाला विचारा, असे सांगू लागले आहेत.
प्रश्न - समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी सरकारी पातळीवर काही होणे आवश्यक आहे का?
उत्तर - अर्थात, हे प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने शहरातील कचरा समस्येवर तोडगा म्हणून ४ हजार ३३८ सोसायट्यांना त्यांच्याच आवारात कचरा विघटन करण्यास सांगितले आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र यातून खतनिर्मिती करण्यास सांगितली आहे. मग मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या या खताच्या विक्रीची काय व्यवस्था आहे? जर विक्रीची व्यवस्था झाली नाही, तर ते हवेत उडून जाईल आणि शहरातील प्रदूषण आणखी वाढेल, याचा विचार होणे आवश्यक आहे. याचबरोबर शालेय शिक्षणपद्धतीत बदल करणे अपेक्षित आहे. तेथे मुलांना प्रश्न विचारण्यासाठी वाव दिला पाहिजे. मी शाळेत असताना मला माझ्या शिक्षकांनी विं. दा. करंदीकरांची कविता शिकवायला सांगितले होते. ती मी चांगल्या प्रकारे शिकवली आणि तेव्हाच माझा सर्वांसमोर बालेण्याचा आत्मविश्वास वाढला. असे प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळत गेले, तर चांगले विज्ञान संवादक बनू शकतील.
प्रश्न - तुम्ही आत्ता विज्ञान संवादकांचा उल्लेख केला, आपल्या समाजात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आजही आपण कुठेतरी कमी पडत आहोत का?
उत्तर - नक्कीच. विज्ञान संवादात आजही आपण अपुरे आहोत. आज मराठी विज्ञान परिषदेचे राज्यात ७२ आणि राज्याबाहेर चार विभाग कार्यरत आहेत. मात्र तरीही हे प्रयत्न अपुरे आहेत. तालुका स्तरावर हे विभाग सुरू व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. संस्था लोकांपर्यंत पोहचेल, तशी विज्ञान संवादकांची संख्या वाढत जाईल, समाजातील तळागाळात विज्ञान पोहचेल.
प्रश्न - सध्या छद्म विज्ञानावर बरीच चर्चा होत आहे. एक विज्ञान संवादक म्हणून आपण याकडे कसे पाहता?
उत्तर - आपल्या पुराणात पुष्पक विमान उडविले, वगेवेगळ्या बाणांचा प्रयोग करण्यात आला असे उल्लेख आहेत. ते कुठेतरी विज्ञानशी जोडण्याचा आपल्याकडे प्रयत्न होत आहे. ते होते-नव्हते याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि असले तरी ते आता सिद्ध करणे शक्य नाही. यामुळे या विषयांमध्ये पडून आपला वेळ दवडण्यापेक्षा वर्तमानात आपण काय करतो याकडे लक्ष पुरविणे महत्त्वाचे आहे.
- मुलाखत - नीरज पंडित
प्रश्न - विज्ञान परिषदेच्या स्थापनेची नेमकी काय उद्दिष्टे होती?
उत्तर - १९५७मध्ये रशियाने स्पुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडला. तेव्हा सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. काय आहे स्पुटनिक, अवकाशात यान सोडण्यासाठी एवढा पैसा का खर्च करायचा, असे एक ना अनेक प्रश्न सामान्यांना पडत होते. त्याची उत्तरे देण्यास देशातील शास्त्रज्ञ कमी पडत होते. यानंतर १९६२मध्ये चीनसोबतच्या युद्धात रणगाडे वापरण्यात आले, ते काय आहे, त्यात कोणते तंत्रज्ञान आहे, असे प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर १९६४मध्ये लालबहादूर शास्त्री यांनी हरितक्रांतीची सुरुवात केली. मग ही हरितक्रांती कशासाठी, याने नेमके काय साध्य होणार, असे प्रश्न सामान्यांमधून विचारले जाऊ लागले. त्यावेळेस सामान्यांच्या प्रश्नांची त्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे देणाऱ्या एखाद्या संस्थेची गरज निर्माण झाली. तेव्हा १९६४मध्ये केरळ येथे शास्त्र परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर १९६५मध्ये मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली. यात राज्यातील शाास्त्रज्ञ, इंजिनीअर्स एकत्र आले आणि त्यांनी विज्ञानप्रसाराची सुरुवात केली.
प्रश्न - सरकारने दिलेला सन्मान संस्थेला पाच दशकांनी मिळाला. याला वेळ लागला का?
उत्तर - सरकारने विज्ञान परिषदेला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. विज्ञान संवादासाठी परिषदेने ज्या सोप्या मराठी भाषेचा वापर केला, त्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. कोणताही देश हा विज्ञानानेच समृद्ध होतो, हे आजपर्यंत अनेक उदाहरणावरून सांगता येईल. पण आपल्याकडे ते भान अजून आलेले नाही. एक पारंपरिक म्हण आहे, लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली. पण हा विचार बदलून धट्टीकट्टी श्रीमंती कशी येईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी समाजात सोप्या भाषेतून विज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक आहे.
प्रश्न - १९६५मध्ये जेव्हा तुम्ही विज्ञानप्रसाराचे काम सुरू केले, तेव्हा काय अडचणी आल्या? त्या आजही जाणवतात का?
उत्तर - त्यावेळेस आपल्या देशात अंधश्रद्धेचा विलक्षण पगडा होता. आजही तो आहे. पण त्यावेळस खूपच जास्त होता. लोकांकडे पैसा नव्हता. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे मनाला शांती मिळावी, या उद्देशाने ते कुठेतरी संत-महंतांकडे जात असत. पण ही शांती क्षणिक असते, हे पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. १९८३मध्ये आम्ही वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तयार केलेल्या स्लाइड शो काही जणांना अश्लील वाटला. यामुळे अनेक शाळांमधून आम्हाला हे शिक्षण देण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला. आता ही परिस्थिती थोडीफार बदललेली आहे. लोक आमच्याकडून या शिक्षणाच्या सीडी विकत घेऊन जाऊ लागलेत आणि मुलांना पाहायला सांगून त्यात काही अडचणी आहेत का याबाबत आम्हाला विचारा, असे सांगू लागले आहेत.
प्रश्न - समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी सरकारी पातळीवर काही होणे आवश्यक आहे का?
उत्तर - अर्थात, हे प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने शहरातील कचरा समस्येवर तोडगा म्हणून ४ हजार ३३८ सोसायट्यांना त्यांच्याच आवारात कचरा विघटन करण्यास सांगितले आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र यातून खतनिर्मिती करण्यास सांगितली आहे. मग मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या या खताच्या विक्रीची काय व्यवस्था आहे? जर विक्रीची व्यवस्था झाली नाही, तर ते हवेत उडून जाईल आणि शहरातील प्रदूषण आणखी वाढेल, याचा विचार होणे आवश्यक आहे. याचबरोबर शालेय शिक्षणपद्धतीत बदल करणे अपेक्षित आहे. तेथे मुलांना प्रश्न विचारण्यासाठी वाव दिला पाहिजे. मी शाळेत असताना मला माझ्या शिक्षकांनी विं. दा. करंदीकरांची कविता शिकवायला सांगितले होते. ती मी चांगल्या प्रकारे शिकवली आणि तेव्हाच माझा सर्वांसमोर बालेण्याचा आत्मविश्वास वाढला. असे प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळत गेले, तर चांगले विज्ञान संवादक बनू शकतील.
प्रश्न - तुम्ही आत्ता विज्ञान संवादकांचा उल्लेख केला, आपल्या समाजात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आजही आपण कुठेतरी कमी पडत आहोत का?
उत्तर - नक्कीच. विज्ञान संवादात आजही आपण अपुरे आहोत. आज मराठी विज्ञान परिषदेचे राज्यात ७२ आणि राज्याबाहेर चार विभाग कार्यरत आहेत. मात्र तरीही हे प्रयत्न अपुरे आहेत. तालुका स्तरावर हे विभाग सुरू व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. संस्था लोकांपर्यंत पोहचेल, तशी विज्ञान संवादकांची संख्या वाढत जाईल, समाजातील तळागाळात विज्ञान पोहचेल.
प्रश्न - सध्या छद्म विज्ञानावर बरीच चर्चा होत आहे. एक विज्ञान संवादक म्हणून आपण याकडे कसे पाहता?
उत्तर - आपल्या पुराणात पुष्पक विमान उडविले, वगेवेगळ्या बाणांचा प्रयोग करण्यात आला असे उल्लेख आहेत. ते कुठेतरी विज्ञानशी जोडण्याचा आपल्याकडे प्रयत्न होत आहे. ते होते-नव्हते याचे कोणतेही पुरावे नाहीत आणि असले तरी ते आता सिद्ध करणे शक्य नाही. यामुळे या विषयांमध्ये पडून आपला वेळ दवडण्यापेक्षा वर्तमानात आपण काय करतो याकडे लक्ष पुरविणे महत्त्वाचे आहे.
- मुलाखत - नीरज पंडित