राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या ‘नीट’बाबतच्या निर्णयाबाबत फेरविचार याचिका सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. या याचिकेत राज्य सरकार नेमके कोणते मुद्दे मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातील काही मुद्दे खालील प्रमाणे असू शकतील
Maharashtra Times30 Apr 2016, 4:07 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉमफेरविचार याचिकेचे मुद्दे
राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या ‘नीट’बाबतच्या निर्णयाबाबत फेरविचार याचिका सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. या याचिकेत राज्य सरकार नेमके कोणते मुद्दे मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातील काही मुद्दे खालील प्रमाणे असू शकतील
१. राज्याने सरकारी आणि खासगी वैद्यकीय कॉलेजात प्रवेशासाठी एकच सीईटी असावी असा कायदा केला असल्याने महाराष्ट्रात खेडोपाडी आणि गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
२. याशिवाय एमएच-सीईटी परीक्षा आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अभ्यासक्रमावर (एसएससी आणि एचएससी बोर्ड) आधारीत असेल. आतापर्यंत फक्त सीबीएसई/आयसीएसई बोर्डावर आधारीत अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षा घेण्यात येत होती. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि गरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करणे कठीण जात असे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक विदयार्थ्यांना सीईटी परीक्षेची संधी मिळावी यासाठी एमएच-सीईटी परीक्षा आता एसएससी आणि एचएससी बोर्ड अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या तळागाळातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे. नीटच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या धर्तीवर आहे. परंतु राज्यातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त विद्यार्थी हे एचएससी बोर्डाचे असतात. या दोन्ही अभ्यासक्रमामध्ये तफावत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या धर्तीवरील परीक्षा अचानक देण्यास सांगितल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. ३. २०१३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नीट परीक्षा रद्द केली होती. या परीक्षेत बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच महाराष्ट्रात एमएचसीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
४. सीबीएसई मार्फत नीट परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. १ मे आणि २४ जुलै रोजी दोन वेगळ्या परीक्षा होतील. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील त्यामुळे दोन्ही परीक्षाचे गुणांकन वेगवेगळे होईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता यादी एकच कशी असू शकेल, असा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्यात येईल.
५. राज्याच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एमएचसीईटी परीक्षेसाठी एचएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला आहे. आता जर सीईटी परीक्षा अचानक रद्द झाल्यास विदयार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या फेरविचार याचिकेत करण्यात येणार आहे.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.