म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
सातारा मेडिकल कॉलेजचा घोटाळा ६५.७० कोटी रुपयांचा आहे. यामध्ये ३५० विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आले आहे. 'ईडी'च्या मुंबई क्षेत्रीय संचालनालयांतर्गत हा तपास सुरू आहे.
'हा घोटाळा साधारण २०१६पासून सुरू झाला. त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या संस्थेत एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आश्वासन घोटाळेबाजांकडून सुमारे ३५० विद्यार्थ्यांना देण्यात आले. ही वैद्यकीय संस्था साताऱ्याच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे चालवली जाते. विद्यार्थ्यांकडून रक्कम घेण्यात आली. या रकमेचा आकडा ६५.७० कोटी रुपये होता,' असे 'ईडी'तील सूत्रांनी सांगितले. या संदर्भात 'ईडी'ने अलीकडेच आरोपपत्रही दाखल केले. त्यानुसार सातारा मेडिकल कॉलेजचे तत्कालीन प्रमुख; तसेच त्यांच्या मित्रांनी मिळून हा घोटाळा केला. कुठल्याही वैद्यकीय संस्थेत भारतीय वैद्यक परिषद व महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषदेच्या परवानगीखेरीज थेट प्रवेश देता येत नाही, हे घोटाळेबाजांना माहीत होते. तरीही त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाख रुपये ते ४५ लाख रुपये उकळले. यांतील बहुतांश रक्कम रोखीने घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही; तसेच पैसेही परत मिळाले नाहीत. घोटाळेबाजांनी ६५.७० कोटी रुपये घेऊन पोबारा केला. या रकमेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत या प्रकरणात कारवाई केली जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सातारा मेडिकल कॉलेजचा घोटाळा ६५.७० कोटी रुपयांचा आहे. यामध्ये ३५० विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आले आहे. 'ईडी'च्या मुंबई क्षेत्रीय संचालनालयांतर्गत हा तपास सुरू आहे.
'हा घोटाळा साधारण २०१६पासून सुरू झाला. त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या संस्थेत एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आश्वासन घोटाळेबाजांकडून सुमारे ३५० विद्यार्थ्यांना देण्यात आले. ही वैद्यकीय संस्था साताऱ्याच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे चालवली जाते. विद्यार्थ्यांकडून रक्कम घेण्यात आली. या रकमेचा आकडा ६५.७० कोटी रुपये होता,' असे 'ईडी'तील सूत्रांनी सांगितले. या संदर्भात 'ईडी'ने अलीकडेच आरोपपत्रही दाखल केले. त्यानुसार सातारा मेडिकल कॉलेजचे तत्कालीन प्रमुख; तसेच त्यांच्या मित्रांनी मिळून हा घोटाळा केला. कुठल्याही वैद्यकीय संस्थेत भारतीय वैद्यक परिषद व महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषदेच्या परवानगीखेरीज थेट प्रवेश देता येत नाही, हे घोटाळेबाजांना माहीत होते. तरीही त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाख रुपये ते ४५ लाख रुपये उकळले. यांतील बहुतांश रक्कम रोखीने घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही; तसेच पैसेही परत मिळाले नाहीत. घोटाळेबाजांनी ६५.७० कोटी रुपये घेऊन पोबारा केला. या रकमेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळेच मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत या प्रकरणात कारवाई केली जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.