म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महापालिकेने जाहीर केलेल्या फेरीवाला क्षेत्राबाबत मनसेने प्रशासनाला १९ हरकती आणि सूचना केल्या आहेत. बेकायदा फेरीवाल्यांकडून माल खरेदी केल्यास ग्राहकाला मार्शलकरवी दंड आकारावा, अशी सूचना केली असून फेरीवाल्यांना महाराष्ट्रातील वास्तव्याचा १५ वर्षांचा अधिवास सक्तीचा करावा, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीआधी पालिकेने मुंबई शहर आणि उपनगरांतील फेरीवाला क्षेत्र निश्चित केले असून संपूर्ण मुंबईत २२ हजार ओटे ठरवले आहेत. तसेच, शहर फेरीवाला समितीत सदस्य नेमण्यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार मनसेचे दादर-माहीम विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी गुरूवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन मनसेच्या हरकती आणि सूचनांचे पत्र दिले.
मुंबईसह महाराष्ट्रात कोठेही नोकरी, व्यवसाय करताना महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या अधिवासाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पालिकेने फेरीवाला सर्वेक्षण करताना अधिवास प्रमाणपत्राचा विचार केलेला नाही, याची आठवण करून देत फेरीवाल्यांना परवाना देण्यापूर्वी प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची सूचना करण्यात आली आहे. दिव्यांग फेरीवाल्यांचे परवाने त्यांच्या हयातीपर्यंतच द्यावेत. एखाद्या दिव्यांगाच्या निधनानंतर त्याच्या परवान्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने मनसेने ही
सूचना केली आहे. ज्या भागात फेरीवाला क्षेत्र नसेल तिथे आठवडी बाजार भरविण्यास परवानगी द्यावी, असे मनसेने म्हटले आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या फेरीवाला क्षेत्राबाबत मनसेने प्रशासनाला १९ हरकती आणि सूचना केल्या आहेत. बेकायदा फेरीवाल्यांकडून माल खरेदी केल्यास ग्राहकाला मार्शलकरवी दंड आकारावा, अशी सूचना केली असून फेरीवाल्यांना महाराष्ट्रातील वास्तव्याचा १५ वर्षांचा अधिवास सक्तीचा करावा, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीआधी पालिकेने मुंबई शहर आणि उपनगरांतील फेरीवाला क्षेत्र निश्चित केले असून संपूर्ण मुंबईत २२ हजार ओटे ठरवले आहेत. तसेच, शहर फेरीवाला समितीत सदस्य नेमण्यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार मनसेचे दादर-माहीम विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी गुरूवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन मनसेच्या हरकती आणि सूचनांचे पत्र दिले.
मुंबईसह महाराष्ट्रात कोठेही नोकरी, व्यवसाय करताना महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या अधिवासाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पालिकेने फेरीवाला सर्वेक्षण करताना अधिवास प्रमाणपत्राचा विचार केलेला नाही, याची आठवण करून देत फेरीवाल्यांना परवाना देण्यापूर्वी प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची सूचना करण्यात आली आहे. दिव्यांग फेरीवाल्यांचे परवाने त्यांच्या हयातीपर्यंतच द्यावेत. एखाद्या दिव्यांगाच्या निधनानंतर त्याच्या परवान्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने मनसेने ही
सूचना केली आहे. ज्या भागात फेरीवाला क्षेत्र नसेल तिथे आठवडी बाजार भरविण्यास परवानगी द्यावी, असे मनसेने म्हटले आहे.