मुंबई : ज्यांच्या मागील पिढ्यांना साधी अक्षर ओळख नव्हती, ज्यांना इंग्रजी माध्यमांतील शाळेत शिकणंही मोठं स्वप्न वाटायचं, ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली पोरं महाराष्ट्राची बाराखडी गिरवल्यानंतर आज सातासमुद्रापार जाऊन विदेशात जगाची एबीसीडी शिकणार आहेत. जागतिक शिक्षण विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकते, म्हणूनच लाखो विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्या दिशेने पावलं टाकत असतात. त्यातून त्यांना नव्या संधी आणि जगण्याचे नवे आयाम मिळतात. विदेशात उच्च शिक्षण घेऊन आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने यंदा महाराष्ट्रातली ७ मुलं लंडनला निघाली आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या ७ मुलांनी परिस्थितीशी दोन हात करत ब्रिटीश सरकारची मानाची 'चेवनिंग स्कॉलरशीप' मिळवली आहे. उद्याच्या भारताचं भविष्य असलेली ही ७ मुलं ब्रिटनमध्ये जाऊन पदव्युत्तर शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी आणि विद्या वेतनासाठी जवळपास ४० ते ४५ लाखांचा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च ब्रिटीश सरकार 'चेवनिंग स्कॉलरशीप'च्या माध्यमातून करणार आहे. डॉ. ऋषिकेश आंधळकर, दीक्षा दिंडे, लक्ष्यदीप पेंढारकर, सनीश कुलकर्णी, वैभव वाळुंज, दीपक चटप, आकाश नवघरे या मुलांना मानाची 'चेवनिंग' शिष्यवृत्ती मिळाली आहे. यातील काही मुलं इंग्लंडला रवाना झाली आहेत तर काही मुलं येत्या आठवड्यात इंग्लंडला जाणार आहेत. पण तत्पूर्वी चेवनिंग स्कॉलरशीप काय आहे? ती कुणाला मिळू शकते? त्यासाठी काय पात्रता असावी लागते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊयात. इंग्लंडला रवाना होत असलेल्या डॉ. ऋषिकेश आंधळकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
'चेवनिंग' स्कॉलरशीप ही एक आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे जी ब्रिटिश फॉरेन आणि कॉमनवेल्थ ऑफिसद्वारे अनुदानित आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विविध देशातल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते, ज्याचे वेगवेगळे निकष असतात. या स्कॉलरशीपसाठी दरवर्षी भारतातून ४० च्या आसपास विद्यार्थ्यांची निवड होते. परंतु यंदा भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यावर्षी देशातल्या ७५ मुलांना परदेशी शिक्षणाची संधी ब्रिटीश सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. उद्याच्या विकसित राष्ट्राचं भविष्य म्हणजे विविध देशातले तरुण, जे तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असतील तेच तरुण आपल्या ब्रिटीश सरकारचे मित्र असावेत, या उद्देशातून ही स्कॉलरशीप दिली जाते. या स्कॉलरशीपसाठी जगभरातून जवळपास १ लाख मुलं अर्ज करतात. परंतु लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्रांची छाननी यामधून सरतेशेवटी दीड हजार विद्यार्थ्यांची निवड या स्कॉलरशीपसाठी केली जाते.
** साधारण ही स्कॉलरशीप कुणाला मिळते, निकष काय असतात? स्वरुप काय असतं?
या स्कॉलरशीपसाठी अर्ज करण्यासाठी अमुक तमुक वयाची मर्यादा नसते. अगदी ४५-४७ वयाच्या व्यक्तीलाही अर्ज करता येऊ शकतो. फक्त त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं आणि ज्या क्षेत्रात त्याला विदेशात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे, त्या क्षेत्रात त्याने १ ते २ वर्ष काम केलेलं असावं. स्कॉलरशीप मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ३ टप्प्यांमधून जावं लागतं.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'चेवनिंग'साठी आपण जर अर्ज करत असाल तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की आपण यावर्षी जर अर्ज केला तर तर ती सगळी प्रोसेस पुढच्या वर्षासाठीची असते, म्हणजेच २०२२ मध्ये अर्ज करत असाल तर ती २०२३ च्या स्कॉलरशीपसाठी असते.
** पहिली अर्ज करण्याची प्रक्रिया
दिलेल्या वेळेत विद्यार्थ्याला विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यत ही सगळी प्रक्रिया सुरु असते. दोन अडीच महिन्यांचा कालावधी जवळपास अर्ज प्रक्रियेला असतो. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करावा लागतो. chevening.org या संकेतस्थळावर जाऊन हा अर्ज करावा लागतो. अर्जात असलेल्या सगळ्या बाबींची पुर्तता करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचंय, त्या क्षेत्रात कमीत कमी २ वर्षांच्या कामाचा अनुभव असावा, ही अट आहे. मात्र जर फ्रेश अॅप्लाय करत असाल तर अशावेळी २ अॅकॅडमिक रेफरन्स द्यावे लागतील, अशीही पूर्वअट घालण्यात आली आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यवृत्तीला पात्र होण्यासाठी एकूण ४ निबंध लिहायला लागतात.
-तुमचं नेटवर्किंग स्कील, लोकांना कशा पद्धतीने जोडू शकाल?
-तुमच्यामध्ये असलेल्या लीडरशीप क्वालिटी
-तुमचा फ्युचर प्लॅन काय, भविष्यात काय करु इच्छिता, भविष्यात स्वत:ला कुठे पाहता?
-तुम्हाला तुमचं शिक्षण ब्रिटन (यूके) मध्येच का करायचंय, त्याची कारणे कोणती?
** अर्जासोबत कोणती कागदपत्रे?
बारावीचं मार्कशीट, अंडर ग्रॅज्युएट मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, वर्क रेफरन्स
जिथे कुठे तुम्ही काम करत आहात, त्यांनी तुमच्याबद्दल रेफरन्स सांगावा, तुमच्या ओव्हरऑल कामाबद्दल माहिती द्यावी, तुमच्या क्वालिटीबद्दल संबंधितांनी सांगणं आवश्यक आहे. तसेच अॅकॅडमिक रेफरन्स द्यावा लागेल- ज्यामध्ये तुमच्या शिक्षकांनी तुमच्याबद्दल अधिकाधिक गोष्टी सांगाव्यात, ज्यात तुम्ही कॉलेजमध्ये कसे होतात? तुमचा समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभाग असायचा का? अभ्यासेतर उपक्रमांमध्ये भाग असायचा का? अशा गोष्टींवर संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्याची माहिती ब्रिटनमधील विद्यापीठाला द्यावी.
या सगळ्या प्रोसेस नंतर रिडिंग कमिटीमार्फत वर्गवारी केली जाते. पडताळणी (स्क्रुटिनी) होते, अर्जांमधून ५ ते ८ हजार लोकांना ऑनलाईन मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीची ही प्रक्रिया फेब्रुवारी मध्यापासून एप्रिलपर्यंत चालते.
पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे, युकेमधल्या कुठल्या विद्यापीठात तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. अशा ३ विद्यापीठांची निवड करणे, त्या विद्यापीठांची माहिती घेणे विद्यार्थ्याला कर्मप्राप्त आहे. कुठल्या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे त्यापद्धतीने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ शोधावं. अखेर विद्यापीठांच्या जागांनुसार आणि मेरिटनुसार संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रवेश दिला जातो.
**अभ्यासक्रमाचा कालावधी काय असतो?
आपल्याकडे जसा जून ते-एप्रिल असा अभ्यासक्रमाचा कालावधी असतो तसा इंग्लंडमध्ये सप्टेंबर ते सप्टेंबर असा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'चेवनिंग'साठी आपण जर अर्ज करत असाल तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की आपण यावर्षी जर अर्ज केला तर ती सगळी प्रोसेस पुढच्या वर्षासाठीची असते, म्हणजेच २०२२ मध्ये अर्ज करत असाल तर ती २०२३ च्या स्कॉलरशीपसाठी असते.
* निवड झाल्यानंतर स्कॉलरशीपचे पैसे कसे मिळतात?
पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर ब्रिटीश सरकार चेवनिंग स्कॉलरशीपच्या अंतर्गत विद्यार्थ्याची फी संबंधित विद्यापाठीत वर्ग करते. एवढंच नव्हे तर पात्र विद्यार्थ्याला लंडनला जाण्याचं तिकीट पाठवलं जातं. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर प्रत्येक महिन्याचं विद्यावेतन बँकेत जमा होतं. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परतीचं तिकीटही दिलं जातं.
स्कॉलर शिक्षण घेत असताना 'चेवनिंग'मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या देशांच्या स्कॉलरने एकमेकांना भेटावं, तरुणांचं नेटवर्क उभं राहावं. सोशल अॅक्टिव्हिटीसंदर्भात प्लॅनिंग करावं, यासाठी विद्यापीठ वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी प्लॅन करत असतं. यादरम्यान ब्रिटनमध्ये अभ्यास दौरे आखले जातात, याचा सर्व खर्चही 'चेवनिंग' करतं.
चेवनिंगचा नियम- 'चेवनिंग'तर्फे शिक्षण घेतलं असलं तरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देशात कमीत कमी २ वर्ष काम करावं. शेवटी दोन वर्षे मायदेशात काम केल्यानंतर तुमची इच्छा असेल तर यूकेमध्ये जाऊ शकता.
* भारतात परत आल्यानंतर नोकरीच्या संधी कोणत्या? पैसे किती मिळतात?
तुम्ही ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे, त्या विषयांत शेकडो नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतात, तसेच त्यातून चांगले पैसेही मिळू शकतात. शेवटी तुमच्या गुणवत्ता आणि नेतृत्वगुणावर सगळं काही अवलंबून असतं.
डॉ. ऋषीकेश आंधळकर यांचा प्रवास
डॉ. ऋषीकेश आंधळकर यांचं मूळगाव राशीन (ता. कर्जत, जि- अ.नगर). आई-वडील दोघेही डॉक्टर असल्याने लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राकडे ऋषिकेश यांचा ओढा होता. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण तालुक्याच्या गावी पूर्ण केले. नंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी सांगलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. शिक्षण घेत असताना समाजसेवेची प्रचंड उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी 'ज्योत' (Joint Youth Orgnising Team) नावाचा उपक्रम सुरु केला. वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना समाजाची दुसरी बाजू समजावी, असा त्या उपक्रमाचा उद्देश होता. त्याअंतर्गत मेळघाटात बालमृत्यूंवर काम करणाऱ्या 'मैत्री' संस्थेशी त्यांच्यासह ज्योत उपक्रमातले विद्यार्थी जोडले गेले. दरवर्षी त्यांचा ६० विद्यार्थ्यांचा चमू मेळघाटात जाऊन काम करु लागला. तसेच सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागात 'ज्योत'च्या सदस्यांनी चाईल्ड होम तसेच वृद्धाश्रम, झोपडपट्टीतल्या लोकांसाठी देखील काम केलं.
अनेक वेळा डॉक्टर ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून लोकांना रक्तदानाचं आवाहन करतात. पण डॉक्टरांनी स्वता:हून पुढे येऊन रक्तदान केलं तर तो समाजासमोर वेगळा मेसेज जाईल, अशा हेतूने डॉ. ऋषीकेश यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह अनेक रक्तदान शिबीरं आयोजित करुन स्वत: रक्तदान केलं. त्यातून खरोखर समाजासमोर वेगळा संदेश गेला. त्यानंतर सांगलीच्या ग्रामीण भागांतल्या लोकांकडून रक्तदान मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.
डॉ. ऋषिकेश यांचे सन्मित्र नितीन सोनवणे यांनी महात्मा गांधीजींच्या शांती-अहिंसेच्या प्रचार आणि प्रचारासाठी जगातल्या ४७ देशांत पायी पदयात्रा काढली होती. आशिया खंडातले देश संपवून, नितीन ज्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत आले ते वर्ष होतं महात्मा गांधींजींचं १५० वे जयंती वर्ष. योगायोग म्हणजे तेच वर्ष नेल्सन मंडेला यांच्या जयंतीचं १०० वे वर्ष होते. माझ्या एकट्याच्या या प्रवासात मला अनेक साथी मिळावेत, अशा उद्देशातून नितीनने डॉ. ऋषिकेश यांना फोन केला. त्यानंतर डॉ. ऋषिकेश यांनी दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे ऋषिकेश यांनी दक्षिण आफ्रिकेच्या ग्रामीण भागाची भ्रमंती केली. तिथून परल्यानंतर काही काळ डॉ. ऋषिकेश यांनी पुण्यातील 'ससून' हॉस्पिटलमध्ये काम केलं. त्याचदरम्यान सांगली-कोल्हापूरमध्ये पूर आला होता. पुन्हा डॉ. ऋषिकेश यांनी कर्मभूमीची सेवा करण्यासाठी तेथील ग्रामीण भाग गाठला. पूरग्रस्त भागातल्या लोकांच्या आरोग्यासाठी पुढील दोन-तीन महिने त्यांनी काही उपक्रम राबवले.
कोरोना काळात लोकांचं मानसिक आरोग्य ठीक राहावं, यासाठी डॉ. ऋषिकेश यांनी 'मोकळा संवाद' नावाने एक हेल्पलाईन सुरु केली. देशातली कदाचित पहिली हेल्पलाईन असावी ज्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात लोकांचं समुपदेशन केलं गेलं. त्यानंतर काही दिवसांनी भारत सरकारच्या वतीने अशी हेल्पलाईन सुरु झाली.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात 'आयसीएमआर' या संस्थेतही डॉ. ऋषिकेश यांनी काम केलंय. कोरोना काळात 'आयसीएमआर' या संस्थेत काम करण्याची संधी डॉ. ऋषिकेश यांना मिळाली. भारतात कोरोनाचा फैलाव कश्या पद्धतीने झाला, याचं संशोधन करताना महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा झाला? त्याची कारणं कोणती? यावर संशोधन करण्याची जबाबदारी डॉ. ऋषिकेश यांच्यावर होती.
कोरोना काळात डॉ. ऋषिकेश यांच्या मातोश्री डॉ. महानंदा आंधळकर यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉ. ऋषिकेश यांनी 'नंदा फाऊंडेशन'ची स्थापना केली. त्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रांतल्या लोकांनी, विविध पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन समग्र दृष्टीकोन ठेऊन रुग्णांसाठी भरीव काम करावं, यासाठी नंदा फाऊंडेशन काम करणार आहे, अशी माहिती डॉ. ऋषिकेश यांनी दिली.
यावर्षी डॉ. ऋषिकेश यांना ब्रिटीश सरकारची मानाची 'चेवनिंग' शिष्यवृत्ती मिळाली आहे. डॉ. ऋषिकेश यांना त्यांचे मित्र अॅड. प्रवीण निकम यांचं सातत्याने मार्गदर्शन मिळालं. वैद्यकीय अभ्यासासाठी त्यांना ही शिष्यवृत्ती दिली गेली आहे. 'ग्लोबल पब्लिक हेल्थ अँड पॉलिसी' यावरील अभ्यासासाठी यूकेमधील 'क्वीन मेरी' विद्यापीठात डॉ. ऋषिकेश शिक्षण घेणार आहे. यासाठी ते आज लंडनला रवाना होत आहेत. महाराष्ट्र टाइम्सकडून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...!
'चेवनिंग' स्कॉलरशीप ही एक आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे जी ब्रिटिश फॉरेन आणि कॉमनवेल्थ ऑफिसद्वारे अनुदानित आहे. ब्रिटनच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विविध देशातल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते, ज्याचे वेगवेगळे निकष असतात. या स्कॉलरशीपसाठी दरवर्षी भारतातून ४० च्या आसपास विद्यार्थ्यांची निवड होते. परंतु यंदा भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यावर्षी देशातल्या ७५ मुलांना परदेशी शिक्षणाची संधी ब्रिटीश सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. उद्याच्या विकसित राष्ट्राचं भविष्य म्हणजे विविध देशातले तरुण, जे तिथल्या विविध क्षेत्रात कार्यरत असतील तेच तरुण आपल्या ब्रिटीश सरकारचे मित्र असावेत, या उद्देशातून ही स्कॉलरशीप दिली जाते. या स्कॉलरशीपसाठी जगभरातून जवळपास १ लाख मुलं अर्ज करतात. परंतु लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्रांची छाननी यामधून सरतेशेवटी दीड हजार विद्यार्थ्यांची निवड या स्कॉलरशीपसाठी केली जाते.
** साधारण ही स्कॉलरशीप कुणाला मिळते, निकष काय असतात? स्वरुप काय असतं?
या स्कॉलरशीपसाठी अर्ज करण्यासाठी अमुक तमुक वयाची मर्यादा नसते. अगदी ४५-४७ वयाच्या व्यक्तीलाही अर्ज करता येऊ शकतो. फक्त त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं आणि ज्या क्षेत्रात त्याला विदेशात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे, त्या क्षेत्रात त्याने १ ते २ वर्ष काम केलेलं असावं. स्कॉलरशीप मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ३ टप्प्यांमधून जावं लागतं.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'चेवनिंग'साठी आपण जर अर्ज करत असाल तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की आपण यावर्षी जर अर्ज केला तर तर ती सगळी प्रोसेस पुढच्या वर्षासाठीची असते, म्हणजेच २०२२ मध्ये अर्ज करत असाल तर ती २०२३ च्या स्कॉलरशीपसाठी असते.
** पहिली अर्ज करण्याची प्रक्रिया
दिलेल्या वेळेत विद्यार्थ्याला विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यत ही सगळी प्रक्रिया सुरु असते. दोन अडीच महिन्यांचा कालावधी जवळपास अर्ज प्रक्रियेला असतो. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करावा लागतो. chevening.org या संकेतस्थळावर जाऊन हा अर्ज करावा लागतो. अर्जात असलेल्या सगळ्या बाबींची पुर्तता करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचंय, त्या क्षेत्रात कमीत कमी २ वर्षांच्या कामाचा अनुभव असावा, ही अट आहे. मात्र जर फ्रेश अॅप्लाय करत असाल तर अशावेळी २ अॅकॅडमिक रेफरन्स द्यावे लागतील, अशीही पूर्वअट घालण्यात आली आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यवृत्तीला पात्र होण्यासाठी एकूण ४ निबंध लिहायला लागतात.
-तुमचं नेटवर्किंग स्कील, लोकांना कशा पद्धतीने जोडू शकाल?
-तुमच्यामध्ये असलेल्या लीडरशीप क्वालिटी
-तुमचा फ्युचर प्लॅन काय, भविष्यात काय करु इच्छिता, भविष्यात स्वत:ला कुठे पाहता?
-तुम्हाला तुमचं शिक्षण ब्रिटन (यूके) मध्येच का करायचंय, त्याची कारणे कोणती?
** अर्जासोबत कोणती कागदपत्रे?
बारावीचं मार्कशीट, अंडर ग्रॅज्युएट मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, वर्क रेफरन्स
जिथे कुठे तुम्ही काम करत आहात, त्यांनी तुमच्याबद्दल रेफरन्स सांगावा, तुमच्या ओव्हरऑल कामाबद्दल माहिती द्यावी, तुमच्या क्वालिटीबद्दल संबंधितांनी सांगणं आवश्यक आहे. तसेच अॅकॅडमिक रेफरन्स द्यावा लागेल- ज्यामध्ये तुमच्या शिक्षकांनी तुमच्याबद्दल अधिकाधिक गोष्टी सांगाव्यात, ज्यात तुम्ही कॉलेजमध्ये कसे होतात? तुमचा समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभाग असायचा का? अभ्यासेतर उपक्रमांमध्ये भाग असायचा का? अशा गोष्टींवर संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्याची माहिती ब्रिटनमधील विद्यापीठाला द्यावी.
या सगळ्या प्रोसेस नंतर रिडिंग कमिटीमार्फत वर्गवारी केली जाते. पडताळणी (स्क्रुटिनी) होते, अर्जांमधून ५ ते ८ हजार लोकांना ऑनलाईन मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीची ही प्रक्रिया फेब्रुवारी मध्यापासून एप्रिलपर्यंत चालते.
पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे, युकेमधल्या कुठल्या विद्यापीठात तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. अशा ३ विद्यापीठांची निवड करणे, त्या विद्यापीठांची माहिती घेणे विद्यार्थ्याला कर्मप्राप्त आहे. कुठल्या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे त्यापद्धतीने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ शोधावं. अखेर विद्यापीठांच्या जागांनुसार आणि मेरिटनुसार संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रवेश दिला जातो.
**अभ्यासक्रमाचा कालावधी काय असतो?
आपल्याकडे जसा जून ते-एप्रिल असा अभ्यासक्रमाचा कालावधी असतो तसा इंग्लंडमध्ये सप्टेंबर ते सप्टेंबर असा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'चेवनिंग'साठी आपण जर अर्ज करत असाल तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की आपण यावर्षी जर अर्ज केला तर ती सगळी प्रोसेस पुढच्या वर्षासाठीची असते, म्हणजेच २०२२ मध्ये अर्ज करत असाल तर ती २०२३ च्या स्कॉलरशीपसाठी असते.
* निवड झाल्यानंतर स्कॉलरशीपचे पैसे कसे मिळतात?
पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर ब्रिटीश सरकार चेवनिंग स्कॉलरशीपच्या अंतर्गत विद्यार्थ्याची फी संबंधित विद्यापाठीत वर्ग करते. एवढंच नव्हे तर पात्र विद्यार्थ्याला लंडनला जाण्याचं तिकीट पाठवलं जातं. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर प्रत्येक महिन्याचं विद्यावेतन बँकेत जमा होतं. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परतीचं तिकीटही दिलं जातं.
स्कॉलर शिक्षण घेत असताना 'चेवनिंग'मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या देशांच्या स्कॉलरने एकमेकांना भेटावं, तरुणांचं नेटवर्क उभं राहावं. सोशल अॅक्टिव्हिटीसंदर्भात प्लॅनिंग करावं, यासाठी विद्यापीठ वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी प्लॅन करत असतं. यादरम्यान ब्रिटनमध्ये अभ्यास दौरे आखले जातात, याचा सर्व खर्चही 'चेवनिंग' करतं.
चेवनिंगचा नियम- 'चेवनिंग'तर्फे शिक्षण घेतलं असलं तरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देशात कमीत कमी २ वर्ष काम करावं. शेवटी दोन वर्षे मायदेशात काम केल्यानंतर तुमची इच्छा असेल तर यूकेमध्ये जाऊ शकता.
* भारतात परत आल्यानंतर नोकरीच्या संधी कोणत्या? पैसे किती मिळतात?
तुम्ही ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे, त्या विषयांत शेकडो नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतात, तसेच त्यातून चांगले पैसेही मिळू शकतात. शेवटी तुमच्या गुणवत्ता आणि नेतृत्वगुणावर सगळं काही अवलंबून असतं.
डॉ. ऋषीकेश आंधळकर यांचा प्रवास
डॉ. ऋषीकेश आंधळकर यांचं मूळगाव राशीन (ता. कर्जत, जि- अ.नगर). आई-वडील दोघेही डॉक्टर असल्याने लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राकडे ऋषिकेश यांचा ओढा होता. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण तालुक्याच्या गावी पूर्ण केले. नंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी सांगलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. शिक्षण घेत असताना समाजसेवेची प्रचंड उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी 'ज्योत' (Joint Youth Orgnising Team) नावाचा उपक्रम सुरु केला. वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना समाजाची दुसरी बाजू समजावी, असा त्या उपक्रमाचा उद्देश होता. त्याअंतर्गत मेळघाटात बालमृत्यूंवर काम करणाऱ्या 'मैत्री' संस्थेशी त्यांच्यासह ज्योत उपक्रमातले विद्यार्थी जोडले गेले. दरवर्षी त्यांचा ६० विद्यार्थ्यांचा चमू मेळघाटात जाऊन काम करु लागला. तसेच सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागात 'ज्योत'च्या सदस्यांनी चाईल्ड होम तसेच वृद्धाश्रम, झोपडपट्टीतल्या लोकांसाठी देखील काम केलं.
अनेक वेळा डॉक्टर ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून लोकांना रक्तदानाचं आवाहन करतात. पण डॉक्टरांनी स्वता:हून पुढे येऊन रक्तदान केलं तर तो समाजासमोर वेगळा मेसेज जाईल, अशा हेतूने डॉ. ऋषीकेश यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह अनेक रक्तदान शिबीरं आयोजित करुन स्वत: रक्तदान केलं. त्यातून खरोखर समाजासमोर वेगळा संदेश गेला. त्यानंतर सांगलीच्या ग्रामीण भागांतल्या लोकांकडून रक्तदान मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.
डॉ. ऋषिकेश यांचे सन्मित्र नितीन सोनवणे यांनी महात्मा गांधीजींच्या शांती-अहिंसेच्या प्रचार आणि प्रचारासाठी जगातल्या ४७ देशांत पायी पदयात्रा काढली होती. आशिया खंडातले देश संपवून, नितीन ज्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत आले ते वर्ष होतं महात्मा गांधींजींचं १५० वे जयंती वर्ष. योगायोग म्हणजे तेच वर्ष नेल्सन मंडेला यांच्या जयंतीचं १०० वे वर्ष होते. माझ्या एकट्याच्या या प्रवासात मला अनेक साथी मिळावेत, अशा उद्देशातून नितीनने डॉ. ऋषिकेश यांना फोन केला. त्यानंतर डॉ. ऋषिकेश यांनी दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे ऋषिकेश यांनी दक्षिण आफ्रिकेच्या ग्रामीण भागाची भ्रमंती केली. तिथून परल्यानंतर काही काळ डॉ. ऋषिकेश यांनी पुण्यातील 'ससून' हॉस्पिटलमध्ये काम केलं. त्याचदरम्यान सांगली-कोल्हापूरमध्ये पूर आला होता. पुन्हा डॉ. ऋषिकेश यांनी कर्मभूमीची सेवा करण्यासाठी तेथील ग्रामीण भाग गाठला. पूरग्रस्त भागातल्या लोकांच्या आरोग्यासाठी पुढील दोन-तीन महिने त्यांनी काही उपक्रम राबवले.
कोरोना काळात लोकांचं मानसिक आरोग्य ठीक राहावं, यासाठी डॉ. ऋषिकेश यांनी 'मोकळा संवाद' नावाने एक हेल्पलाईन सुरु केली. देशातली कदाचित पहिली हेल्पलाईन असावी ज्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात लोकांचं समुपदेशन केलं गेलं. त्यानंतर काही दिवसांनी भारत सरकारच्या वतीने अशी हेल्पलाईन सुरु झाली.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात 'आयसीएमआर' या संस्थेतही डॉ. ऋषिकेश यांनी काम केलंय. कोरोना काळात 'आयसीएमआर' या संस्थेत काम करण्याची संधी डॉ. ऋषिकेश यांना मिळाली. भारतात कोरोनाचा फैलाव कश्या पद्धतीने झाला, याचं संशोधन करताना महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा झाला? त्याची कारणं कोणती? यावर संशोधन करण्याची जबाबदारी डॉ. ऋषिकेश यांच्यावर होती.
कोरोना काळात डॉ. ऋषिकेश यांच्या मातोश्री डॉ. महानंदा आंधळकर यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉ. ऋषिकेश यांनी 'नंदा फाऊंडेशन'ची स्थापना केली. त्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रांतल्या लोकांनी, विविध पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन समग्र दृष्टीकोन ठेऊन रुग्णांसाठी भरीव काम करावं, यासाठी नंदा फाऊंडेशन काम करणार आहे, अशी माहिती डॉ. ऋषिकेश यांनी दिली.
यावर्षी डॉ. ऋषिकेश यांना ब्रिटीश सरकारची मानाची 'चेवनिंग' शिष्यवृत्ती मिळाली आहे. डॉ. ऋषिकेश यांना त्यांचे मित्र अॅड. प्रवीण निकम यांचं सातत्याने मार्गदर्शन मिळालं. वैद्यकीय अभ्यासासाठी त्यांना ही शिष्यवृत्ती दिली गेली आहे. 'ग्लोबल पब्लिक हेल्थ अँड पॉलिसी' यावरील अभ्यासासाठी यूकेमधील 'क्वीन मेरी' विद्यापीठात डॉ. ऋषिकेश शिक्षण घेणार आहे. यासाठी ते आज लंडनला रवाना होत आहेत. महाराष्ट्र टाइम्सकडून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...!