म. टा. प्रतिनिधी, नागपूर
दररोज वाढत जाणाऱ्या नागपूर शहरात शववाहिनीसारख्या अत्यंत आवश्यक सुविधेचा तुटवडा जाणवू लागला आहे. कमी संख्येने उपलब्ध असणाऱ्या शववाहिन्यांमुळे अंत्यसंस्कारासाठी लागणारा प्रतीक्षेचा कालावधी वाढू लागला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी लोकनिधी उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. समाजाने दिलेल्या योगदानातून शहराला शववाहिन्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
घरातल्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतरचा प्रत्येक क्षण कुटुंबीयांसाठी जड असतो. अंत्ययात्रेची पूर्ण तयारी झाली असते आणि कुटुंबीयांच्या भावना अनावर झालेल्या असतात. नेमक्या अशा वेळी शववाहिनी येण्यास उशीर होत जातो. आता येईल, मग येईल करीत शववाहिनी घरापर्यंतच लवकर पोहोचत नाही. कधी एक तास तर कधी दोन तास उशिरानेही शववाहिनी पोहोचते आणि मग कुठे अंत्ययात्रा सुरू होते. मात्र, शेवटचा प्रवास सुरू होण्याआधीचा हा प्रतीक्षेचा काळ सर्वांसाठीच कठीण असतो. अलीकडे नागपुरात सातत्याने हा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे, शहराला शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी ‘इकोफ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे, तसेच शहराच्या सीमा ही वाढत आहेत. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात मृत्यूदर ही वाढतो आहे. दहा वर्षांपूर्वी नागपूरचा परीघ १० किमी होता, तो आता २० किमीपेक्षा जास्त झाला आहे. लोक दूरवर राहण्यास गेले असले तरी त्या भागात अद्याप स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाहीत. अंत्यविधीसाठी त्यांना शहरातील निवडक स्मशानभूमींवरच जावे लागते. नागपुरात सध्या केवळ १० ते १२ शववाहिनी उपलब्ध आहेत. त्यामुळे, लोकांची अडचण दूर करण्यासाठी आम्ही शहरात आणखी शववाहिन्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे फाउंडेशनचे विजय लिमये यांनी सांगितले.
एक शववाहिनी १० लाखांची
अंत्यसंस्कार करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही, तर ती समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे, शवावाहिनी उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही समाजाकडून मदत मागत आहोत. एक शववाहिनी खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये खर्च येतो. हा निधी लोकसहभागातून उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजवर सुमारे ६० हजार रुपये जमा झाले आहेत. यासाठी एक स्वतंत्र बँक खाते तयार करण्यात आले आहे. इच्छुकांना या बँक खात्यात रक्कम जमा करता येईल, असेही लिमये यांनी सांगितले.
दररोज वाढत जाणाऱ्या नागपूर शहरात शववाहिनीसारख्या अत्यंत आवश्यक सुविधेचा तुटवडा जाणवू लागला आहे. कमी संख्येने उपलब्ध असणाऱ्या शववाहिन्यांमुळे अंत्यसंस्कारासाठी लागणारा प्रतीक्षेचा कालावधी वाढू लागला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी लोकनिधी उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. समाजाने दिलेल्या योगदानातून शहराला शववाहिन्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
घरातल्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतरचा प्रत्येक क्षण कुटुंबीयांसाठी जड असतो. अंत्ययात्रेची पूर्ण तयारी झाली असते आणि कुटुंबीयांच्या भावना अनावर झालेल्या असतात. नेमक्या अशा वेळी शववाहिनी येण्यास उशीर होत जातो. आता येईल, मग येईल करीत शववाहिनी घरापर्यंतच लवकर पोहोचत नाही. कधी एक तास तर कधी दोन तास उशिरानेही शववाहिनी पोहोचते आणि मग कुठे अंत्ययात्रा सुरू होते. मात्र, शेवटचा प्रवास सुरू होण्याआधीचा हा प्रतीक्षेचा काळ सर्वांसाठीच कठीण असतो. अलीकडे नागपुरात सातत्याने हा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे, शहराला शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी ‘इकोफ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे, तसेच शहराच्या सीमा ही वाढत आहेत. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात मृत्यूदर ही वाढतो आहे. दहा वर्षांपूर्वी नागपूरचा परीघ १० किमी होता, तो आता २० किमीपेक्षा जास्त झाला आहे. लोक दूरवर राहण्यास गेले असले तरी त्या भागात अद्याप स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाहीत. अंत्यविधीसाठी त्यांना शहरातील निवडक स्मशानभूमींवरच जावे लागते. नागपुरात सध्या केवळ १० ते १२ शववाहिनी उपलब्ध आहेत. त्यामुळे, लोकांची अडचण दूर करण्यासाठी आम्ही शहरात आणखी शववाहिन्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे फाउंडेशनचे विजय लिमये यांनी सांगितले.
एक शववाहिनी १० लाखांची
अंत्यसंस्कार करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही, तर ती समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे, शवावाहिनी उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही समाजाकडून मदत मागत आहोत. एक शववाहिनी खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये खर्च येतो. हा निधी लोकसहभागातून उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजवर सुमारे ६० हजार रुपये जमा झाले आहेत. यासाठी एक स्वतंत्र बँक खाते तयार करण्यात आले आहे. इच्छुकांना या बँक खात्यात रक्कम जमा करता येईल, असेही लिमये यांनी सांगितले.