म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा
माटरगाव गेरू हा ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील आदिवासींचा पाडा. अभयारण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आल्याने उपजिविकेचे हक्काचे साधन हिरावले गेले. गावाला जाण्यासाठी १२ किमी रस्ताच नाही. म्हणून विकासही पोहचला नाही. गावात आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. साडेतीनशे विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. पुढचे शिक्षण घेण्यासाठी १५ किमी दूर अंतरावर जावे लागते. म्हणून मुलींचे शिक्षण त्यानंतर बंद होते. पाणी, आरोग्याच्या सोयीही गावात नाही. सरकारकडे आर्जव, विनंत्या करून मागण्या मांडल्या. दखल मात्र कुणीच घेतली नाही. गावकरी संवाद यात्रेसमोर आपल्या व्यथा मांडत होते. आमच्या मागण्या सोडवा म्हणून सांगत होते.
ग्रामीण भागातील समस्या संवादातून जाणून घेत व्यवस्थेकडून सोडविण्यासाठी शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजता सिंदखेडराजा येथून संवाद यात्रा काढण्यात आली. आपुलकी सामाजिक संस्था, संत गाडगे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अनिल गावंडे मित्रमंडळ, टिच वन, किसानपुत्र आंदोलन, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा काढण्यात आली आहे. माटरगाव गेरू, आडेगाव राजा, शेलसूर आणि चिचोली येथील गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेण्यात आल्या. यात्रेच्या प्रारंभी शेतकरी नेते अमर हबीब यांनी शेतकरीविरोधी कायदे समजावून सांगितले. तर ‘आपुलकी’चे अभिजित फाळके यांनी संवाद यात्रेची भूमिका मांडली. मातृतीर्थ फाउंडेशनचे प्रदीप बिल्होरे म्हणाले, शेतकरी आणि ग्रामविकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील समस्या, अडचणी, प्रश्न समजावून घेऊन प्रत्यक्ष त्या सोडविण्यासाठी संवाद यात्रेच्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न करणार आहोत. या यात्रेस सर्व संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. साडेदहा वाजता यात्रेला प्रत्यक्षात सुरुवात झाली.
आडेगाव राजानंतर यात्रा शेलसूरला निघाली. गावात जलयुक्त शिवार अभियानच राबविण्यात आले नसल्याचे समोर आले. पांदण रस्ता, मृत तलाव, कर्जमाफीतून वगळले अशा अनेकानेक बाबी गावकऱ्यांनी निवेदनातून मांडल्या. रात्री शेगावात चिचोली येथील गावकऱ्यांनी भेट घेत यात्रेसमोर समस्यांचा पाढा वाचला.
आडेगावात रंगला पहिला टप्पा
आडेगाव राजा येथील ग्रामपंचायतमध्ये पहिला संवाद झाला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असतानाच गावात जाधव राजांचा किल्ला असल्याचे सांगण्यात आले. पर्यटनदृष्ट्या गावाचा विकास होऊ शकत असतानाही दुर्लक्ष करण्यात आले होते. सिंदखेडराजा विकास आराखडा रखडल्याचा फटका या गावाला बसला. गावात मोबाइलची रेंज नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही धावाधाव सुरू असल्याची व्यथाही मांडली.
माटरगाव गेरू हा ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील आदिवासींचा पाडा. अभयारण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आल्याने उपजिविकेचे हक्काचे साधन हिरावले गेले. गावाला जाण्यासाठी १२ किमी रस्ताच नाही. म्हणून विकासही पोहचला नाही. गावात आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. साडेतीनशे विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. पुढचे शिक्षण घेण्यासाठी १५ किमी दूर अंतरावर जावे लागते. म्हणून मुलींचे शिक्षण त्यानंतर बंद होते. पाणी, आरोग्याच्या सोयीही गावात नाही. सरकारकडे आर्जव, विनंत्या करून मागण्या मांडल्या. दखल मात्र कुणीच घेतली नाही. गावकरी संवाद यात्रेसमोर आपल्या व्यथा मांडत होते. आमच्या मागण्या सोडवा म्हणून सांगत होते.
ग्रामीण भागातील समस्या संवादातून जाणून घेत व्यवस्थेकडून सोडविण्यासाठी शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजता सिंदखेडराजा येथून संवाद यात्रा काढण्यात आली. आपुलकी सामाजिक संस्था, संत गाडगे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, अनिल गावंडे मित्रमंडळ, टिच वन, किसानपुत्र आंदोलन, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा काढण्यात आली आहे. माटरगाव गेरू, आडेगाव राजा, शेलसूर आणि चिचोली येथील गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेण्यात आल्या. यात्रेच्या प्रारंभी शेतकरी नेते अमर हबीब यांनी शेतकरीविरोधी कायदे समजावून सांगितले. तर ‘आपुलकी’चे अभिजित फाळके यांनी संवाद यात्रेची भूमिका मांडली. मातृतीर्थ फाउंडेशनचे प्रदीप बिल्होरे म्हणाले, शेतकरी आणि ग्रामविकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील समस्या, अडचणी, प्रश्न समजावून घेऊन प्रत्यक्ष त्या सोडविण्यासाठी संवाद यात्रेच्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न करणार आहोत. या यात्रेस सर्व संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले. साडेदहा वाजता यात्रेला प्रत्यक्षात सुरुवात झाली.
आडेगाव राजानंतर यात्रा शेलसूरला निघाली. गावात जलयुक्त शिवार अभियानच राबविण्यात आले नसल्याचे समोर आले. पांदण रस्ता, मृत तलाव, कर्जमाफीतून वगळले अशा अनेकानेक बाबी गावकऱ्यांनी निवेदनातून मांडल्या. रात्री शेगावात चिचोली येथील गावकऱ्यांनी भेट घेत यात्रेसमोर समस्यांचा पाढा वाचला.
आडेगावात रंगला पहिला टप्पा
आडेगाव राजा येथील ग्रामपंचायतमध्ये पहिला संवाद झाला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असतानाच गावात जाधव राजांचा किल्ला असल्याचे सांगण्यात आले. पर्यटनदृष्ट्या गावाचा विकास होऊ शकत असतानाही दुर्लक्ष करण्यात आले होते. सिंदखेडराजा विकास आराखडा रखडल्याचा फटका या गावाला बसला. गावात मोबाइलची रेंज नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही धावाधाव सुरू असल्याची व्यथाही मांडली.