म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
महावितरण, जलसंपदा विभाग आणि सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अनिल कदम यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांसह या अधिकाऱ्यांची पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली. या बैठकीत तीनही विभागाबाबात शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या.
पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांनी वीजेचे भारनियमन, गैरसोयीचे वेळापत्रक, पालखेड कालव्याचे आवर्तन, शिवार रस्ते आदी प्रश्नांबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अनिल कदम यांनी पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली.
वीजवितरण कंपनीने तत्काळ शेतकऱ्यांच्या सोयीचे वेळापत्रक तयार करून वजिेचा दिवसा व अंखडीत पुरवठा करावा. तसेच कृषीपंपांचे वाजवी व निर्दोष बिले घ्यावे, असे फर्मान आमदार कदम यांनी काढले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच पालखेड कालव्याच्या आर्वतनाचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदारांसह शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पालखेड, शिरवाडासह दावचवाडी, लोणवाडी परिसरात अनेक दिवसांपासून भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचे आणि धोक्याचे आहे. तसेच वीजबिलातही तीन अश्वशक्तीच्या कृषी पंपास पाच अश्वशक्तीचे, तर पाच अश्व शक्तीच्या कृषीपंपास साडेसात अश्वशक्तीचे बिल आकारून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. आमदार कदम यांनी दखल घेत अधिकाऱ्यांसमवेत पालखेड येथे शेतकरी दरबारच भरविला आणि सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी अशोक आहेर, सभापती पंडतिराव आहेर, जि. प. सदस्य दीपक शिरसाठ, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, लोणवाडीचे सरपंच सुभाष चोपडे, पालखेडच्या सरपंच शकंतला जाधव आदींसह महावितरण, जलंसपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महावितरण, जलसंपदा विभाग आणि सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अनिल कदम यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांसह या अधिकाऱ्यांची पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली. या बैठकीत तीनही विभागाबाबात शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या.
पालखेड, शिरवाडा, कुभांरी, वावी, गौरठाण, लोणवाडी, दावचवाडी, आहेरगाव आदी भागातील शेतकऱ्यांनी वीजेचे भारनियमन, गैरसोयीचे वेळापत्रक, पालखेड कालव्याचे आवर्तन, शिवार रस्ते आदी प्रश्नांबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार अनिल कदम यांनी पालखेड मिरचीचे येथे बैठक बोलावली.
वीजवितरण कंपनीने तत्काळ शेतकऱ्यांच्या सोयीचे वेळापत्रक तयार करून वजिेचा दिवसा व अंखडीत पुरवठा करावा. तसेच कृषीपंपांचे वाजवी व निर्दोष बिले घ्यावे, असे फर्मान आमदार कदम यांनी काढले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच पालखेड कालव्याच्या आर्वतनाचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदारांसह शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पालखेड, शिरवाडासह दावचवाडी, लोणवाडी परिसरात अनेक दिवसांपासून भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचे आणि धोक्याचे आहे. तसेच वीजबिलातही तीन अश्वशक्तीच्या कृषी पंपास पाच अश्वशक्तीचे, तर पाच अश्व शक्तीच्या कृषीपंपास साडेसात अश्वशक्तीचे बिल आकारून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. आमदार कदम यांनी दखल घेत अधिकाऱ्यांसमवेत पालखेड येथे शेतकरी दरबारच भरविला आणि सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी अशोक आहेर, सभापती पंडतिराव आहेर, जि. प. सदस्य दीपक शिरसाठ, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, लोणवाडीचे सरपंच सुभाष चोपडे, पालखेडच्या सरपंच शकंतला जाधव आदींसह महावितरण, जलंसपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.