म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भूखंड घोटाळ्याचे लोण सातपूर औद्योगिक वसाहतीतही असून, मोठा उद्योग सुरू करण्यासाठी ७५ पैशांनी घेतलेले मोठे प्लॉट आज छोटे छोटे तुकडे करून तब्बल २० हजार रुपये चौरस मीटरप्रमाणे विक्री होत असल्याचा आरोप एका ज्येष्ठ उद्योजकाने केला आहे. मोठे भूखंड राहिले नाहीत तर मोठे उद्योग येणार नाहीत. मग लहान उद्योगांना काम कसे मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत जयप्रकाश जोशी यांनी उद्योजकांच्या सोशल मीडिया ग्रुपवर याबाबतच्या चर्चेला तोंड फोडले आहे. सातपूर औद्योगिक वसाहत निर्माण झाली तेव्हापासूनच औद्योगिक भूखंडांचा दुरुपयोग सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या काळात काहींनी ७५ पैसे प्रतिचौरस मीटरने घेतलेली जमीन आज तुकडे पाडून २० हजार रुपये चौरस मीटरने विकली जात आहे. या मोठ्या भूखंडांचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र एमआयडीसीचे अधिकारी व मंत्रालयाच्या सहमतीने सुरू असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. विशेष म्हणजे यावर उद्योग संघटनांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. अंबडमध्ये आयटीसाठी राखीव असलेल्या एस ब्लॉकमधील भूखंड घोटाळाही मोठा असून, या सर्व प्रकारावर सखोल चौकशी व्हावी, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यात लक्ष घालावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे. लघु उद्योजकांना भूखंड मिळणे चांगली बाब आहे. मात्र, मोठे उद्योगच राहिले नाहीत, नव्याने त्यांना भूखंड मिळाले नाहीत तर लहान उद्योगांना काम कुठून मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
प्लॉटवर रहिवासी इमारती
सातपूरला पूर्वी मोठ्या उद्योगांना प्लॉटचे वाटप करण्यात आले व नंतर लहान उद्योगांसाठी नाइस वसाहत निर्माण करण्यात आली. त्यामुळे नाशिकचा कायापालट झाला. मोठ्या उद्योगांमुळे सातपूरमध्ये लहान उद्योगांची जास्त गरज भासू लागली. त्यामुळे एमआयडीसीने डब्लू शेड बांधले. आणखी गरज भासू लागल्यानंतर सहकारी संस्थांना गाळे उभारण्यास परवानगी देण्यात आली. शेकडो गाळे त्या वेळी रास्त दरात उपलब्ध झाले. मात्र, आता आद्योगिक भूखंडांवर निवासी बंगले उभे राहिले आहेत. चारचाकी वाहनांचे शो-रूम सुरू झाले आहेत. सुविधा प्लॉटवर दुकाने व हॉटेल उघडण्यात आली आहेत.
एमआयडीसीकडून स्वस्तात भूखंड पदरात पाडून घेऊन नंतर त्याचे तुकडे करून अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.
- जयप्रकाश जोशी, ज्येष्ठ उद्योजक
भूखंड घोटाळ्याचे लोण सातपूर औद्योगिक वसाहतीतही असून, मोठा उद्योग सुरू करण्यासाठी ७५ पैशांनी घेतलेले मोठे प्लॉट आज छोटे छोटे तुकडे करून तब्बल २० हजार रुपये चौरस मीटरप्रमाणे विक्री होत असल्याचा आरोप एका ज्येष्ठ उद्योजकाने केला आहे. मोठे भूखंड राहिले नाहीत तर मोठे उद्योग येणार नाहीत. मग लहान उद्योगांना काम कसे मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत जयप्रकाश जोशी यांनी उद्योजकांच्या सोशल मीडिया ग्रुपवर याबाबतच्या चर्चेला तोंड फोडले आहे. सातपूर औद्योगिक वसाहत निर्माण झाली तेव्हापासूनच औद्योगिक भूखंडांचा दुरुपयोग सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या काळात काहींनी ७५ पैसे प्रतिचौरस मीटरने घेतलेली जमीन आज तुकडे पाडून २० हजार रुपये चौरस मीटरने विकली जात आहे. या मोठ्या भूखंडांचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र एमआयडीसीचे अधिकारी व मंत्रालयाच्या सहमतीने सुरू असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. विशेष म्हणजे यावर उद्योग संघटनांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. अंबडमध्ये आयटीसाठी राखीव असलेल्या एस ब्लॉकमधील भूखंड घोटाळाही मोठा असून, या सर्व प्रकारावर सखोल चौकशी व्हावी, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यात लक्ष घालावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे. लघु उद्योजकांना भूखंड मिळणे चांगली बाब आहे. मात्र, मोठे उद्योगच राहिले नाहीत, नव्याने त्यांना भूखंड मिळाले नाहीत तर लहान उद्योगांना काम कुठून मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
प्लॉटवर रहिवासी इमारती
सातपूरला पूर्वी मोठ्या उद्योगांना प्लॉटचे वाटप करण्यात आले व नंतर लहान उद्योगांसाठी नाइस वसाहत निर्माण करण्यात आली. त्यामुळे नाशिकचा कायापालट झाला. मोठ्या उद्योगांमुळे सातपूरमध्ये लहान उद्योगांची जास्त गरज भासू लागली. त्यामुळे एमआयडीसीने डब्लू शेड बांधले. आणखी गरज भासू लागल्यानंतर सहकारी संस्थांना गाळे उभारण्यास परवानगी देण्यात आली. शेकडो गाळे त्या वेळी रास्त दरात उपलब्ध झाले. मात्र, आता आद्योगिक भूखंडांवर निवासी बंगले उभे राहिले आहेत. चारचाकी वाहनांचे शो-रूम सुरू झाले आहेत. सुविधा प्लॉटवर दुकाने व हॉटेल उघडण्यात आली आहेत.
एमआयडीसीकडून स्वस्तात भूखंड पदरात पाडून घेऊन नंतर त्याचे तुकडे करून अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.
- जयप्रकाश जोशी, ज्येष्ठ उद्योजक