म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
सिंगापूरमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्रिकुटाने १७ बेरोजगार तरुणांकडून तब्बल २३ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सहा महिन्यांपूर्वी सीवूड्स सेक्टर ४४मध्ये पॅसिफिक ऑफशोअर नावाचे कार्यालय थाटून क्विकर डॉट कॉमवर सिंगापूरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तरुणांनी संपर्क साधून नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी त्रिकुटाने या तरुणांना सीवूड्स येथील कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी सव्वा ते दीड लाख रुपयांची रक्कम घेतली. तसेच, त्यांचे पासपोर्ट आणि मूळ शैक्षणिक कागदपत्रेदेखील घेतली होती. त्यानंतर या त्रिकुटाने सर्व तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन त्यांना १५ मार्च रोजी कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर या त्रिकुटाने कार्यालय बंद करून पलायन केले.
१५ मार्च रोजी हे तरुण आले असता हे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मोबाइलफोनसुद्धा बंद होते. त्यामुळे तरुणांनी एकत्र येऊन एनआरआय पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सिंगापूरमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्रिकुटाने १७ बेरोजगार तरुणांकडून तब्बल २३ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सहा महिन्यांपूर्वी सीवूड्स सेक्टर ४४मध्ये पॅसिफिक ऑफशोअर नावाचे कार्यालय थाटून क्विकर डॉट कॉमवर सिंगापूरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तरुणांनी संपर्क साधून नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी त्रिकुटाने या तरुणांना सीवूड्स येथील कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी सव्वा ते दीड लाख रुपयांची रक्कम घेतली. तसेच, त्यांचे पासपोर्ट आणि मूळ शैक्षणिक कागदपत्रेदेखील घेतली होती. त्यानंतर या त्रिकुटाने सर्व तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन त्यांना १५ मार्च रोजी कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर या त्रिकुटाने कार्यालय बंद करून पलायन केले.
१५ मार्च रोजी हे तरुण आले असता हे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मोबाइलफोनसुद्धा बंद होते. त्यामुळे तरुणांनी एकत्र येऊन एनआरआय पोलिस ठाण्यात धाव घेतली.