म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांनी घेतला आहे. तटकरेंच्या मुखातून भाजप बोलत असल्याची टीका करून तटकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करू नये, असा पवित्रा प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी घेतला आहे.
काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत तटकरेंचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ‘तटकरे यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध तर्कहीन आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. चव्हाण यांनी आपल्या तीन वर्षांच्या कालावधीत पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. राज्य सहकारी बँकेपासून राज्याच्या आर्थिक हिताचे निर्णय निर्भिडपणे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक मंडळीची अडचण झाली आहे,’ अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे महासमिती सदस्य गोपाळ तिवारी यांनी केली.
बालगुडे यांनी चव्हाण यांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तटकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आघाडीची बोलणी करू नये, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला आलेले अपयश त्यांना झोंबत आहे. चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट फायलींवर सह्या केल्या नाहीत, त्याचा काढण्यात येत असल्याचेही बालगुडे यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांनी घेतला आहे. तटकरेंच्या मुखातून भाजप बोलत असल्याची टीका करून तटकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करू नये, असा पवित्रा प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी घेतला आहे.
काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत तटकरेंचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ‘तटकरे यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध तर्कहीन आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. चव्हाण यांनी आपल्या तीन वर्षांच्या कालावधीत पारदर्शक, लोकाभिमुख कारभार केला. राज्य सहकारी बँकेपासून राज्याच्या आर्थिक हिताचे निर्णय निर्भिडपणे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक मंडळीची अडचण झाली आहे,’ अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे महासमिती सदस्य गोपाळ तिवारी यांनी केली.
बालगुडे यांनी चव्हाण यांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये तटकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आघाडीची बोलणी करू नये, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला आलेले अपयश त्यांना झोंबत आहे. चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट फायलींवर सह्या केल्या नाहीत, त्याचा काढण्यात येत असल्याचेही बालगुडे यांनी नमूद केले.