म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'संपूर्ण जग करोना संसर्गाचा सामना करत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. राज्य सरकार संसर्गाचा सक्षमपणे सामना करत आहे. परंतु, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही, अशी खंत व्यक्त करून केंद्र सरकारने राज्याचा 'जीएसटी'चा परतावा, अनुदान द्यावे,' अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार बारणे यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या होत असलेल्या आर्थिक कोंडीकडे लक्ष वेधले. शून्य काळात बोलताना बारणे म्हणाले, 'संपूर्ण जग करोनाचा सामना करीत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकार या साथीचा सक्षमपणे सामना करीत आहे. परंतु, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही.'
'केंद्र सरकारकडून 'जीएसटी'चे जेवढे अनुदान राज्य सरकारला देणे अपेक्षित आहे. ते केंद्र सरकारकडून अद्याप मिळाले नाही. महाराष्ट्रातून सर्वांत जास्त कर केंद्राला मिळतो. तरीदेखील राज्य सरकार जेवढी मागणी करत आहे, ती पूर्ण होत नाही. प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मदत महाराष्ट्र सरकारला करण्यात यावी. 'जीएसटी'चा महाराष्ट्र सरकारचा परतावा पूर्णपणे तत्काळ देण्यात यावा,' अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
'संपूर्ण जग करोना संसर्गाचा सामना करत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. राज्य सरकार संसर्गाचा सक्षमपणे सामना करत आहे. परंतु, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही, अशी खंत व्यक्त करून केंद्र सरकारने राज्याचा 'जीएसटी'चा परतावा, अनुदान द्यावे,' अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार बारणे यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या होत असलेल्या आर्थिक कोंडीकडे लक्ष वेधले. शून्य काळात बोलताना बारणे म्हणाले, 'संपूर्ण जग करोनाचा सामना करीत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकार या साथीचा सक्षमपणे सामना करीत आहे. परंतु, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जेवढे सहकार्य करणे आवश्यक आहे. तेवढे केले जात नाही.'
'केंद्र सरकारकडून 'जीएसटी'चे जेवढे अनुदान राज्य सरकारला देणे अपेक्षित आहे. ते केंद्र सरकारकडून अद्याप मिळाले नाही. महाराष्ट्रातून सर्वांत जास्त कर केंद्राला मिळतो. तरीदेखील राज्य सरकार जेवढी मागणी करत आहे, ती पूर्ण होत नाही. प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त मदत महाराष्ट्र सरकारला करण्यात यावी. 'जीएसटी'चा महाराष्ट्र सरकारचा परतावा पूर्णपणे तत्काळ देण्यात यावा,' अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.