म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'गेल्या ५० वर्षांत मराठवाड्याचे पाणी पळविले. आता आमच्या हक्काचे पाणी मिळविणारच,' असा निर्धार राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांनी येथे व्यक्त केला. भूम-परांडा-वाशी येथील पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांचा आकुर्डी येथे नुकताच मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. मेळाव्यात डॉ. सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. माजी खासदार गजानन बाबर, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, सुरेश कांबळे, अशोक हरणावळ, रोमी संधू उपस्थित होते.
'मागील ५०-६० वर्षांत जाणता राजाने मराठवाड्याचे पाणी पळविले. आता आमच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळविणार,' असे नमूद करून डॉ. सावंत म्हणाले, 'मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्याला भाजपने अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकविले होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना गाफील राहणार नाही. वेळप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जागा लढवून `एकला चलो रे`चीही आमची तयारी आहे.' प्रास्ताविक युवराज कोकाटे यांनी केले. चंद्रकांत सरडे यांनी आभार मानले. दीपक गटकळ, कैलास कुदळे, सचिन शिंदे, भाऊ हरणावळ, सुजाता गजरमल, पप्पू वायसे, सुर्यकांत देशमुख, रामराजे सावंत, प्रवीण चव्हाण, अंकुश गायकवाड आदींनी संयोजन केले.
'गेल्या ५० वर्षांत मराठवाड्याचे पाणी पळविले. आता आमच्या हक्काचे पाणी मिळविणारच,' असा निर्धार राज्याचे जलसंधारण मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांनी येथे व्यक्त केला. भूम-परांडा-वाशी येथील पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांचा आकुर्डी येथे नुकताच मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. मेळाव्यात डॉ. सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. माजी खासदार गजानन बाबर, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, सुरेश कांबळे, अशोक हरणावळ, रोमी संधू उपस्थित होते.
'मागील ५०-६० वर्षांत जाणता राजाने मराठवाड्याचे पाणी पळविले. आता आमच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळविणार,' असे नमूद करून डॉ. सावंत म्हणाले, 'मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्याला भाजपने अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकविले होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना गाफील राहणार नाही. वेळप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जागा लढवून `एकला चलो रे`चीही आमची तयारी आहे.' प्रास्ताविक युवराज कोकाटे यांनी केले. चंद्रकांत सरडे यांनी आभार मानले. दीपक गटकळ, कैलास कुदळे, सचिन शिंदे, भाऊ हरणावळ, सुजाता गजरमल, पप्पू वायसे, सुर्यकांत देशमुख, रामराजे सावंत, प्रवीण चव्हाण, अंकुश गायकवाड आदींनी संयोजन केले.