Hindu Becomes Impotent On Issue Of Nationalism Says Sambhaji Bhide
'राष्ट्रीयत्वा'वर हिंदू नपुंसक होतात : संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं (सीएए) समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा वेडेपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम26 Dec 2019, 1:29 pm
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं (सीएए) समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा वेडेपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर बोलताना भिडे यांनी स्त्रीत्वाचा अनादर करणारे उद्गार काढले. 'जसं नपुंसकात पुरुषत्व कमी असतं, वांझेस स्त्रीत्व कमी असतं... मग त्यांना आपण नपुंसक आणि वांझ असे शब्द वापरतो... तसंच हिंदूंचं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे', असे विधान भिडे यांनी केले.
‘जगभरातील १८७ देशांमध्ये सीएएसारखा कायदा अस्तित्वात आहे. मग भारतातच हा कायदा का चालत नाही? माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून ते ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत सर्वांनी या कायद्याची मागणी केली होती. पण आता विरोध केला जात आहे. सीएएविषयी हिंदू जास्त उत्सुक दिसत नाहीत. जे मुस्लीम अगोदर हिंदू होते, तेच आता सीएएला विरोध करत आहेत. भारतीय आत्मकेंद्रित आहेत. देशाचं हित त्यांच्या लक्षात येत नाही. हा कायदा आपल्या देशासाठी अत्यंत योग्य आहे’, असं ते म्हणाले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन काही लोक या कायद्याविरोधात संभ्रम निर्माण करत आहेत. हा विरोध स्वार्थासाठी आहे. सध्याच्या घडीला स्वतःला जी लोक शिक्षित म्हणवून घेतात, तेच या कायद्याला विरोध करत आहेत. मुस्लीम समाजही आपल्या देशाचा नागरिक आहे. मात्र त्यांच्यातही राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे. मुळात हिंदूंमध्येच राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे, तर मुस्लिमांकडून काय अपेक्षा ठेवायची?’ असंही ते म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असं वक्तव्य नुकतंच संभाजी भिडे यांनी केलं होतं. ‘या कायद्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक भारतीयाला आनंद झाला पाहिजे. पण आपला देश माणसांचा असला तरी देशभक्तांचा नाही हे दुर्दैवं आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे लोक कायद्याला विरोध करत आहेत’, असं म्हणत त्यांनी भाष्य केलं होतं.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.