म. टा. वृत्तसेवा, ठाणे
घरात गॅसजोडणी नाही, अशाच रेशनिंग कार्डधारकांना अनुदानित केरोसीनचा लाभ दिला जात असून गॅस नसल्याबाबत हमीपत्रही लाभार्थ्यांकडून भरून घेण्यात येत आहे. मात्र चुकीची आणि खोटी हमीपत्र दिल्यास अशा लाभार्थ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यात ई पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून धान्याचे वितरण करण्यात येत असून रेशनिंगच्या ठाणे परिमंडळच्या हद्दीत एकूण ७ लाख ४ हजार ४७१ तर जिल्ह्याच्या ग्रामीण रेशनिंग कार्डधारकांची संख्या १ लाख ३९ हजार ७९९ आहे. या योजनेमुळे अन्नधान्याच्या वाटपामध्ये पारदर्शकता आल्याचा दावा रेशनिंग विभागाकडून करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची बचत झालेली आहे. अन्नधान्यानंतर ई पॉस मशिनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केरोसीनची वितरण करण्यात येत असून यामुळे उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोबरमध्ये ८८६ किलो लिटरची करोसीनची बचत झालेली आहे. मे मध्ये २०१९ किलो इतके केरोसीन विक्रीचे प्रमाण होते. मात्र आता ११३३ किलो लिटरवर आलेले आहे. तर ग्रामीण भागात ऑगस्टपासून ७२ किलो लिटर करोसीनची गरज कमी झाली आहे. म्हणजेच तितक्या केरोसीनची बचत झालेली असल्याचे रेशनिंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बिगर गॅसधारकांनाच केरोसीनचा लाभ देण्यात येत असून एका व्यक्तीला दोन लिटर, दोन व्यक्तीला तीन लिटर आणि तीन किंवा तीनपेक्षा अधिक व्यक्तीला चार लिटर केरोसीन देण्यात येत आहे. घरात गॅस असूनही लाभार्थ्यांनी खोटे हमीपत्र सादर केल्यास अशा लाभार्थ्यावर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. हमीपत्राची तलाठ्यांमार्फत तसेच रेशनिंग अधिकारी तपासणी करणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोबरमध्ये ८८.४२ टक्के इतक्या कार्डधारकांना ई पॉसद्वारे धान्य वाटप करण्यात आले असून फ परिमंडळ कार्यालयाच्या हद्दीत हेच प्रमाण ७० टक्के इतके आहे. दरम्यान, रेशनिंग दुकानातून चणाडाळ आणि उडीदडाळचेही वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून फ परिमंडळ कार्यालयासाठी ३ हजार ३३० क्विटल चणाडाळ आणि १६७० क्विंटळ उडीदडाळ आलेली आहे.
घरात गॅसजोडणी नाही, अशाच रेशनिंग कार्डधारकांना अनुदानित केरोसीनचा लाभ दिला जात असून गॅस नसल्याबाबत हमीपत्रही लाभार्थ्यांकडून भरून घेण्यात येत आहे. मात्र चुकीची आणि खोटी हमीपत्र दिल्यास अशा लाभार्थ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यात ई पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून धान्याचे वितरण करण्यात येत असून रेशनिंगच्या ठाणे परिमंडळच्या हद्दीत एकूण ७ लाख ४ हजार ४७१ तर जिल्ह्याच्या ग्रामीण रेशनिंग कार्डधारकांची संख्या १ लाख ३९ हजार ७९९ आहे. या योजनेमुळे अन्नधान्याच्या वाटपामध्ये पारदर्शकता आल्याचा दावा रेशनिंग विभागाकडून करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची बचत झालेली आहे. अन्नधान्यानंतर ई पॉस मशिनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केरोसीनची वितरण करण्यात येत असून यामुळे उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोबरमध्ये ८८६ किलो लिटरची करोसीनची बचत झालेली आहे. मे मध्ये २०१९ किलो इतके केरोसीन विक्रीचे प्रमाण होते. मात्र आता ११३३ किलो लिटरवर आलेले आहे. तर ग्रामीण भागात ऑगस्टपासून ७२ किलो लिटर करोसीनची गरज कमी झाली आहे. म्हणजेच तितक्या केरोसीनची बचत झालेली असल्याचे रेशनिंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बिगर गॅसधारकांनाच केरोसीनचा लाभ देण्यात येत असून एका व्यक्तीला दोन लिटर, दोन व्यक्तीला तीन लिटर आणि तीन किंवा तीनपेक्षा अधिक व्यक्तीला चार लिटर केरोसीन देण्यात येत आहे. घरात गॅस असूनही लाभार्थ्यांनी खोटे हमीपत्र सादर केल्यास अशा लाभार्थ्यावर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. हमीपत्राची तलाठ्यांमार्फत तसेच रेशनिंग अधिकारी तपासणी करणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोबरमध्ये ८८.४२ टक्के इतक्या कार्डधारकांना ई पॉसद्वारे धान्य वाटप करण्यात आले असून फ परिमंडळ कार्यालयाच्या हद्दीत हेच प्रमाण ७० टक्के इतके आहे. दरम्यान, रेशनिंग दुकानातून चणाडाळ आणि उडीदडाळचेही वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून फ परिमंडळ कार्यालयासाठी ३ हजार ३३० क्विटल चणाडाळ आणि १६७० क्विंटळ उडीदडाळ आलेली आहे.