म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
सरकारी नियमांचा भंग करून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंबिवलीत अनधिकृत टॉवरची बांधकामे जोरात आहेत. अशाच एका टॉवरमध्ये सदनिका घेऊन सामान्य डोंबिवलीकराची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर भागातील जुन्या ‘आई’ बंगल्याच्या जागी सहा मजली टॉवरचे बांधकाम सुरू केले. येथे मुलांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने पांडुरंग भोईर यांनी ९३ लाख रुपये कर्ज काढून सदनिका नोंदणी केली. २०१६मध्ये त्याचा ताबा मिळणे अपेक्षित होते, परंतू तो मिळण्यास विलंब झाल्याने भोईर यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर ही जमीन डोंबिवली को. ऑप. हौ. सोसायटीच्या सदस्यांना चाळीस वर्षांपूर्वी अटीशर्तींवर कब्जाहक्क रक्कम भरून फक्त राहण्यासाठी देण्यात आली होती. येथे बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय येथे बांधकाम करता येत नाही, असा अहवाल पाठपुराव्यानंतर तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामूळे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
विकासक व अधिकारी यांच्या संगनमताने हजारो डोंबिवलीकरांची फसवणूक झाली असण्याची शक्यता व्यक्त करून भोईर यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून न्याय द्यावा व अनधिकृत बांधकाम तातडीने पाडावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांच्याकडे केली. मंडल अधिकारी ठाकुर्ली यांच्या अहवालानुसार, तसेच तहसीलदार, कल्याण यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार याप्रकरणी अटी व शर्तींचा भंग झाला, हे स्पष्ट होते. त्यामुळे सर्व संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
सरकारी नियमांचा भंग करून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंबिवलीत अनधिकृत टॉवरची बांधकामे जोरात आहेत. अशाच एका टॉवरमध्ये सदनिका घेऊन सामान्य डोंबिवलीकराची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत त्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर भागातील जुन्या ‘आई’ बंगल्याच्या जागी सहा मजली टॉवरचे बांधकाम सुरू केले. येथे मुलांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने पांडुरंग भोईर यांनी ९३ लाख रुपये कर्ज काढून सदनिका नोंदणी केली. २०१६मध्ये त्याचा ताबा मिळणे अपेक्षित होते, परंतू तो मिळण्यास विलंब झाल्याने भोईर यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर ही जमीन डोंबिवली को. ऑप. हौ. सोसायटीच्या सदस्यांना चाळीस वर्षांपूर्वी अटीशर्तींवर कब्जाहक्क रक्कम भरून फक्त राहण्यासाठी देण्यात आली होती. येथे बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय येथे बांधकाम करता येत नाही, असा अहवाल पाठपुराव्यानंतर तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामूळे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
विकासक व अधिकारी यांच्या संगनमताने हजारो डोंबिवलीकरांची फसवणूक झाली असण्याची शक्यता व्यक्त करून भोईर यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून न्याय द्यावा व अनधिकृत बांधकाम तातडीने पाडावे, अशी मागणी विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांच्याकडे केली. मंडल अधिकारी ठाकुर्ली यांच्या अहवालानुसार, तसेच तहसीलदार, कल्याण यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार याप्रकरणी अटी व शर्तींचा भंग झाला, हे स्पष्ट होते. त्यामुळे सर्व संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.