म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत अंबरनाथ नगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली आहे. मात्र यातील अनेक शौचालयांचा बोजवारा उडाला असून, स्टेशन परिसरातील एका सार्वजनिक शौचालयासमोरच फळविक्रेत्यांनी दुकान थाटल्याने नागरिकांना शौचालयात जाता येत नाही. त्यामुळे केवळ शौचालय बांधण्यात पुढाकार घेणाऱ्या पालिकेला फेरीवाल्यांवर कारवाईत अपयश येत असल्याने हे शौचालय नागरिकांसाठी आहे की फेरीवाल्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेला नुकताच राज्य सरकारकडून स्वच्छ शहराचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हागणदारीमुक्त शहर आणि शौचालयांच्या वापरासाठीही पालिकेला गुण मिळाले आहेत. मात्र स्वच्छ भारत अभियानात बांधलेल्या त्या शौचालयांचा वापर खरेच नागरिक करता आहेत का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानकातील पूर्व भागात पालिकेचे शौचालय उभारले होते. मात्र पश्चिम भागात नागरिक उतरताच या परिसरात शौचालयांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची अडचण होत असे. नागरिकांची ही गरज लक्षात घेता, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत पश्चिम भागातील स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वेच्या पुलाखाली सुसज्ज शौचालय बांधले आहे. या शौचालयाच्या उभारणीने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांशी अर्थपूर्ण संबंध असलेल्या पालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांना हटवण्यात अपयशी ठरत असतानाच, या शौचालयाच्या प्रवेशद्वारावरच फळविक्रेत्याने आपले भव्य दुकान मांडले आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात उतरलेल्या नागरिकांना शौचालयामध्ये जायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच शौचालयाच्या बाजूला काही अनधिकृत गाळेही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे फेरीवाले तर बाजूला अनधिकृत गाळे त्यामुळे नागरिकांना शौचालयाचा वापरच करता येत नाही.
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत अंबरनाथ नगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली आहे. मात्र यातील अनेक शौचालयांचा बोजवारा उडाला असून, स्टेशन परिसरातील एका सार्वजनिक शौचालयासमोरच फळविक्रेत्यांनी दुकान थाटल्याने नागरिकांना शौचालयात जाता येत नाही. त्यामुळे केवळ शौचालय बांधण्यात पुढाकार घेणाऱ्या पालिकेला फेरीवाल्यांवर कारवाईत अपयश येत असल्याने हे शौचालय नागरिकांसाठी आहे की फेरीवाल्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेला नुकताच राज्य सरकारकडून स्वच्छ शहराचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हागणदारीमुक्त शहर आणि शौचालयांच्या वापरासाठीही पालिकेला गुण मिळाले आहेत. मात्र स्वच्छ भारत अभियानात बांधलेल्या त्या शौचालयांचा वापर खरेच नागरिक करता आहेत का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानकातील पूर्व भागात पालिकेचे शौचालय उभारले होते. मात्र पश्चिम भागात नागरिक उतरताच या परिसरात शौचालयांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची अडचण होत असे. नागरिकांची ही गरज लक्षात घेता, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत पश्चिम भागातील स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वेच्या पुलाखाली सुसज्ज शौचालय बांधले आहे. या शौचालयाच्या उभारणीने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांशी अर्थपूर्ण संबंध असलेल्या पालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांना हटवण्यात अपयशी ठरत असतानाच, या शौचालयाच्या प्रवेशद्वारावरच फळविक्रेत्याने आपले भव्य दुकान मांडले आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात उतरलेल्या नागरिकांना शौचालयामध्ये जायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच शौचालयाच्या बाजूला काही अनधिकृत गाळेही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे फेरीवाले तर बाजूला अनधिकृत गाळे त्यामुळे नागरिकांना शौचालयाचा वापरच करता येत नाही.