म. टा. वृत्तसेवा, कल्याण
डोंबिवलीकरांना चालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून बांधण्यात आलेल्या फूटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून या दुकानदारांवर कारवाई करत फूटपाथ मोकळे करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहे. यात अतिक्रमण
करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी नव्हे तर दुकानदारांना आंदण दिल्याची परिस्थिती आहे. केवळ दुकानासमोरील फूटपाथच नव्हे तर त्यापुढील रस्तेदेखील दुकानदारांनी गिळंकृत केले आहेत. मात्र दुकानदारांच्या या अतिक्रमणाला पालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. व्यापाऱ्यांच्या या अतिक्रमणाला पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप थरवळ यांनी केला आहे.
म्हणूनच अशा प्रकारे अतिक्रमण करणारे दोषी दुकानदार, व्यावसायिकांवर तातडीने कारवाई न केल्यास सेनेच्या पद्धतीने धडक मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे. डोंबिवलीतील बहुतेक महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांवर दुकानदारांनी फुटपाथापर्यंत आपली दुकाने वाढविली आहेत. इतके करून न थांबता दुकानदारांनी फुटपाथ व त्यापुढे रस्त्यावरदेखील आपले सामान ठेवण्यास सुरुवात केली आहे. फुटपाथवरून पादचाऱ्यांना चालणे कठीण होते व नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते.
त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तरी प्रभाग अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जातीने लक्ष देऊन कडक कारवाई करावी व फुटपाथ चालण्यासाठी मोकळे करावेत अन्यथा जनहितासाठी प्रसंगी नागरिकांना प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढून न्याय मागावा लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका अधिकाऱ्यांची असेल, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
डोंबिवलीकरांना चालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून बांधण्यात आलेल्या फूटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून या दुकानदारांवर कारवाई करत फूटपाथ मोकळे करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहे. यात अतिक्रमण
करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी नव्हे तर दुकानदारांना आंदण दिल्याची परिस्थिती आहे. केवळ दुकानासमोरील फूटपाथच नव्हे तर त्यापुढील रस्तेदेखील दुकानदारांनी गिळंकृत केले आहेत. मात्र दुकानदारांच्या या अतिक्रमणाला पालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. व्यापाऱ्यांच्या या अतिक्रमणाला पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप थरवळ यांनी केला आहे.
म्हणूनच अशा प्रकारे अतिक्रमण करणारे दोषी दुकानदार, व्यावसायिकांवर तातडीने कारवाई न केल्यास सेनेच्या पद्धतीने धडक मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे. डोंबिवलीतील बहुतेक महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांवर दुकानदारांनी फुटपाथापर्यंत आपली दुकाने वाढविली आहेत. इतके करून न थांबता दुकानदारांनी फुटपाथ व त्यापुढे रस्त्यावरदेखील आपले सामान ठेवण्यास सुरुवात केली आहे. फुटपाथवरून पादचाऱ्यांना चालणे कठीण होते व नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते.
त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तरी प्रभाग अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जातीने लक्ष देऊन कडक कारवाई करावी व फुटपाथ चालण्यासाठी मोकळे करावेत अन्यथा जनहितासाठी प्रसंगी नागरिकांना प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढून न्याय मागावा लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका अधिकाऱ्यांची असेल, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.