मटा ऑनलाइन वृत्त । कल्याण
'कल्याण-नेवाळी येथील 'ती' जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची आहे. सरकार दरबारीही तशी नोंद असून त्या जमिनीचा सातबाराही संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाकडं आहे,' असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षण खात्यानं संपादित केलेल्या नेवाळी येथील १६०० एकर जमिनीवरून सध्या वाद सुरू आहे. नेवाळी येथील शेतकऱ्यांनी जमीन परत मिळवण्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केलं असून पोलिसांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळं या जमिनीची मालकी नेमकी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संरक्षण खात्याच्या जनसंपर्क कार्यालयानं या प्रकरणी पत्रक प्रसिद्धीस देऊन खुलासा केला आहे. 'नेवाळीतील जमीन संरक्षण खात्यानं संपादित केली आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून भारतीय नौदलाकडून या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची पूर्ण कल्पना असून त्यांनी त्यासाठी पोलीस संरक्षणही दिलं आहे,' असं संरक्षण खात्याचे मुंबई विभागीय जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.
'कल्याण-नेवाळी येथील 'ती' जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची आहे. सरकार दरबारीही तशी नोंद असून त्या जमिनीचा सातबाराही संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाकडं आहे,' असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षण खात्यानं संपादित केलेल्या नेवाळी येथील १६०० एकर जमिनीवरून सध्या वाद सुरू आहे. नेवाळी येथील शेतकऱ्यांनी जमीन परत मिळवण्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केलं असून पोलिसांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळं या जमिनीची मालकी नेमकी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संरक्षण खात्याच्या जनसंपर्क कार्यालयानं या प्रकरणी पत्रक प्रसिद्धीस देऊन खुलासा केला आहे. 'नेवाळीतील जमीन संरक्षण खात्यानं संपादित केली आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून भारतीय नौदलाकडून या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची पूर्ण कल्पना असून त्यांनी त्यासाठी पोलीस संरक्षणही दिलं आहे,' असं संरक्षण खात्याचे मुंबई विभागीय जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.