म. टा. वृत्तसेवा, ठाणे
जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी मोटारसायकलने वाड्यावरून ठाण्याला येणाऱ्या एका इस्टेट एजंटला भिवंडीतील ओवळी खिंडीत चौघा लुटारूंनी अडवले आणि एजंटकडील दोन लाख २० हजारांची रोकड आणि धनादेश लुटून चोरांनी पलायन केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
वाडा येथील सुभाष राऊत (३५) इस्टेट एजंटचे काम करतात. त्यांच्या एका नातेवाईकाने जमीन खरेदी केली होती. या नातेवाईकाने जमिनीच्या व्यवहाराचे पैसे जमीनमालकाला ठाण्यात जाऊन देण्याविषयी राऊत यांना सांगितले होते. त्यानुसार पैसे आणि ५० हजारांचा क्रॉस धनादेश घेऊन दुपारी मोटारसायकलवरून राऊत यांनी ठाण्याच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी ६ वाजता रांजणोली नाक्यावर आल्यानंतर या ठिकाणी वाहनांची गर्दी होती. त्यामुळे पाइपलाइन रोडने जात असताना ओवळी खिंड येथे पाठीमागून चार चोरटे दोन मोटारसायकवरून आले. चोरांनी राऊत यांना कुठे चालला आहे, अशी विचारणा केली. तसेच, तुमच्याकडे पैसे आहेत आहेत का, असेही विचारले. त्यानंतर हे चोरटे राऊत यांची झडती घेऊ लागले. तर, तोंडावर रुमाल बांधलेल्या एका चोराने त्यांच्याकडील बॅग खेचली आणि चौघेही चोर रांजणोली नाक्याच्या दिशेने पळून गेले. राऊत यांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र चोरांनी वेगाने नाशिकच्या दिशेने धूम ठोकल्याने हाती लागले नाहीत. बॅगेत रोख रक्कम आणि धनादेश होता.
राऊत यांच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिस ठाण्यात चौघा चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ ते ३० वर्षे वयोगटातील या चोरांचा पोलिस शोध घेत आहेत.
जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी मोटारसायकलने वाड्यावरून ठाण्याला येणाऱ्या एका इस्टेट एजंटला भिवंडीतील ओवळी खिंडीत चौघा लुटारूंनी अडवले आणि एजंटकडील दोन लाख २० हजारांची रोकड आणि धनादेश लुटून चोरांनी पलायन केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
वाडा येथील सुभाष राऊत (३५) इस्टेट एजंटचे काम करतात. त्यांच्या एका नातेवाईकाने जमीन खरेदी केली होती. या नातेवाईकाने जमिनीच्या व्यवहाराचे पैसे जमीनमालकाला ठाण्यात जाऊन देण्याविषयी राऊत यांना सांगितले होते. त्यानुसार पैसे आणि ५० हजारांचा क्रॉस धनादेश घेऊन दुपारी मोटारसायकलवरून राऊत यांनी ठाण्याच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी ६ वाजता रांजणोली नाक्यावर आल्यानंतर या ठिकाणी वाहनांची गर्दी होती. त्यामुळे पाइपलाइन रोडने जात असताना ओवळी खिंड येथे पाठीमागून चार चोरटे दोन मोटारसायकवरून आले. चोरांनी राऊत यांना कुठे चालला आहे, अशी विचारणा केली. तसेच, तुमच्याकडे पैसे आहेत आहेत का, असेही विचारले. त्यानंतर हे चोरटे राऊत यांची झडती घेऊ लागले. तर, तोंडावर रुमाल बांधलेल्या एका चोराने त्यांच्याकडील बॅग खेचली आणि चौघेही चोर रांजणोली नाक्याच्या दिशेने पळून गेले. राऊत यांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र चोरांनी वेगाने नाशिकच्या दिशेने धूम ठोकल्याने हाती लागले नाहीत. बॅगेत रोख रक्कम आणि धनादेश होता.
राऊत यांच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिस ठाण्यात चौघा चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ ते ३० वर्षे वयोगटातील या चोरांचा पोलिस शोध घेत आहेत.