>> ऋतुजा गवस
मी एफ. वाय बीएला असतानाची म्हणजे १९९७ सालची ही गोष्ट. माझी परीक्षा एलफिस्टन कॉलेजला होती. सकाळी अकरा वाजताचा पेपर होता. सकाळी ८.३० लाच वाशी रेल्वे स्टेशनला गेले. वाशी रेल्वेस्टेश्नला गेले तर भरपूर गर्दी होती. तशी गर्दीचीच वेळ होती पण त्यात ट्रेनचा काहीतरी गोंधळ होता. मी स्टेशनला पोहोचल्यानंतर अर्धा-पाऊण तास ट्रेन आलीच नव्हती. मी सारखे घड्याळ बघत होते. बऱ्याच वेळाने ट्रेन आली. कशीतरी गर्दीत चढले. कारण समोर परीक्षा आणि पेपर दिसत होता. पुढे पुन्हा ट्रेनमध्येच थांबली. ती १५-२० मिनिटांनी ट्रेन चालू झाली. घड्याळ धावत होतं. पण वेळ तिथंच थांबावी असं मला वाटत होतं. मजल दरमजल करत ट्रेन सीएसटीला पोहोचली. ब्रम्हांड आठवतं म्हणतात तसं त्यावेळी माझ्याबाबतीत झालं होतं. मला उशीर झाला होता. अशा परिस्थितीत टॅक्सी पण लगेच मिळेना. भीती, टेन्शन पायी काहीच सुचत नव्हतं. एक टॅक्सी आली. त्याला कॉलेजचं नाव सांगितलं आणि बसले. तोपर्यंत अकरा वाजले होते. मला उशीर झाला होता. माझी परीक्षा, माझा पेपर कोणता मला काहीच आठवेना. डोळ्यापुढे काजवे चमकायला लागले. अचानक गरगरायला लागलं. टॅक्सी कॉलजसमोर थांबली. कॉलजमध्ये पाऊल टाकता क्षणी माझ्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शांतता होती. मला काहीच समजत नव्हतं. धावतच पहिल्या मजल्यावर गेले. तिथंही कोणीच नव्हतं. पुन्हा खाली आले. प्रत्येक मिनिटांगणिक माझ्या काळजाचा ठोका चुकतच होता. तितक्यात तेथील एका फळ्याकडे माझं लक्ष गेलं अन् मी भानावर आले. फळ्यावर ठळक अक्षरात परीक्षेसंदर्भात सूचना लिहिली होती. पेपर काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. पुढील तारिख वेळ देण्यात आली होती. पुन्हा एकदा फळा वाचून स्वत:चीच खात्री करून घेतली. सुटकेचा निश्वास टाकत मी मनोमन देवाचे आभार मानले. त्यावेळी मी नोकरी करून शिक्षण पूर्ण करत होते. त्यादिवशी पेपर लिहायला मिळाला नसता तर एक वर्ष फुकट गेलं असतं. खरंच तो कसोटीचाच क्षण होता. पण त्या कसोटीतून पास झाले.
मी एफ. वाय बीएला असतानाची म्हणजे १९९७ सालची ही गोष्ट. माझी परीक्षा एलफिस्टन कॉलेजला होती. सकाळी अकरा वाजताचा पेपर होता. सकाळी ८.३० लाच वाशी रेल्वे स्टेशनला गेले. वाशी रेल्वेस्टेश्नला गेले तर भरपूर गर्दी होती. तशी गर्दीचीच वेळ होती पण त्यात ट्रेनचा काहीतरी गोंधळ होता. मी स्टेशनला पोहोचल्यानंतर अर्धा-पाऊण तास ट्रेन आलीच नव्हती. मी सारखे घड्याळ बघत होते. बऱ्याच वेळाने ट्रेन आली. कशीतरी गर्दीत चढले. कारण समोर परीक्षा आणि पेपर दिसत होता. पुढे पुन्हा ट्रेनमध्येच थांबली. ती १५-२० मिनिटांनी ट्रेन चालू झाली. घड्याळ धावत होतं. पण वेळ तिथंच थांबावी असं मला वाटत होतं. मजल दरमजल करत ट्रेन सीएसटीला पोहोचली. ब्रम्हांड आठवतं म्हणतात तसं त्यावेळी माझ्याबाबतीत झालं होतं. मला उशीर झाला होता. अशा परिस्थितीत टॅक्सी पण लगेच मिळेना. भीती, टेन्शन पायी काहीच सुचत नव्हतं. एक टॅक्सी आली. त्याला कॉलेजचं नाव सांगितलं आणि बसले. तोपर्यंत अकरा वाजले होते. मला उशीर झाला होता. माझी परीक्षा, माझा पेपर कोणता मला काहीच आठवेना. डोळ्यापुढे काजवे चमकायला लागले. अचानक गरगरायला लागलं. टॅक्सी कॉलजसमोर थांबली. कॉलजमध्ये पाऊल टाकता क्षणी माझ्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शांतता होती. मला काहीच समजत नव्हतं. धावतच पहिल्या मजल्यावर गेले. तिथंही कोणीच नव्हतं. पुन्हा खाली आले. प्रत्येक मिनिटांगणिक माझ्या काळजाचा ठोका चुकतच होता. तितक्यात तेथील एका फळ्याकडे माझं लक्ष गेलं अन् मी भानावर आले. फळ्यावर ठळक अक्षरात परीक्षेसंदर्भात सूचना लिहिली होती. पेपर काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. पुढील तारिख वेळ देण्यात आली होती. पुन्हा एकदा फळा वाचून स्वत:चीच खात्री करून घेतली. सुटकेचा निश्वास टाकत मी मनोमन देवाचे आभार मानले. त्यावेळी मी नोकरी करून शिक्षण पूर्ण करत होते. त्यादिवशी पेपर लिहायला मिळाला नसता तर एक वर्ष फुकट गेलं असतं. खरंच तो कसोटीचाच क्षण होता. पण त्या कसोटीतून पास झाले.