बंगळुरु : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने अर्धा सामना जिंकल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताने पहिल्या दिवशी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही नेत्रदीपक कामगिरी करत १६६ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावा करतो, यावर त्यांचा विजय किती लवकर होईल हे अवलंबून असेल. पहिल्या डावात भारताने २५२ धावा केल्या आणि दिवसअखेर श्रीलंकेची ६ बाद ८६ अशी स्थिती होती.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला मयांक अगरवालच्या रुपात पहिला धक्का बसला. विश्वा फर्नांडो श्रीलंकेसाठी डावातील दुसरे षटक टाकत होता. मयंक अग्रवाल क्रीजवर होता आणि त्याच्या दुसऱ्या षटकातील चौथा चेंडूवर श्रीलंकेकडून जबरदस्त अपील करण्यात आले. पंचांनी पायचितचे अपील फेटाळले असले तरी मयंक अग्रवालने धाव घेण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माही आधी धावताना दिसला, पण तो थांबला आणि मयंक अग्रवाल जवळपास दुसऱ्या टोकाला पोहोचला होता. मयंक परत येईपर्यंत श्रीलंकेच्या यष्टीरक्षक आणि खेळाडूंनी पायचितसाठी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला, परंतु जयविक्रमाने यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याच्याकडे चेंडू फेकला, आणि त्याने स्टंपच्या बेल्स उडवल्या. त्यानंतर रोहित शर्मा, हनुमा विहारी आणि विराट कोहलीही मोठी खेळी साकारू शकले नाहीत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंनाही मोठी खेळी साकारता आली नाही. पण श्रेयस अय्यरने मात्र भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. श्रेयसने यावेळी १० चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ९२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. श्रेयसच्या या दमदार खेळीच्या जोरावरच भारताला पहिल्या डावात २५२ धावा उभारता आल्या.
भारताच्या २५२ धावा या सुरुवातील फारच कमी वाटत होत्या. पण भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत श्रीलंकेला पहिल्याच दिवशी एकामागून एक धक्के दिले आणि त्यांचा अर्धा संघ गारद केला. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी सुरुवातीला प्रत्येकी दोन बळी मिळवत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्यामुळेच पहिल्या दिवसअखेर त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला मयांक अगरवालच्या रुपात पहिला धक्का बसला. विश्वा फर्नांडो श्रीलंकेसाठी डावातील दुसरे षटक टाकत होता. मयंक अग्रवाल क्रीजवर होता आणि त्याच्या दुसऱ्या षटकातील चौथा चेंडूवर श्रीलंकेकडून जबरदस्त अपील करण्यात आले. पंचांनी पायचितचे अपील फेटाळले असले तरी मयंक अग्रवालने धाव घेण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माही आधी धावताना दिसला, पण तो थांबला आणि मयंक अग्रवाल जवळपास दुसऱ्या टोकाला पोहोचला होता. मयंक परत येईपर्यंत श्रीलंकेच्या यष्टीरक्षक आणि खेळाडूंनी पायचितसाठी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला, परंतु जयविक्रमाने यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याच्याकडे चेंडू फेकला, आणि त्याने स्टंपच्या बेल्स उडवल्या. त्यानंतर रोहित शर्मा, हनुमा विहारी आणि विराट कोहलीही मोठी खेळी साकारू शकले नाहीत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंनाही मोठी खेळी साकारता आली नाही. पण श्रेयस अय्यरने मात्र भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. श्रेयसने यावेळी १० चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ९२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. श्रेयसच्या या दमदार खेळीच्या जोरावरच भारताला पहिल्या डावात २५२ धावा उभारता आल्या.
भारताच्या २५२ धावा या सुरुवातील फारच कमी वाटत होत्या. पण भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत श्रीलंकेला पहिल्याच दिवशी एकामागून एक धक्के दिले आणि त्यांचा अर्धा संघ गारद केला. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी सुरुवातीला प्रत्येकी दोन बळी मिळवत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्यामुळेच पहिल्या दिवसअखेर त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.